शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

जलवाहिनी फुटल्याने पनवेलकर त्रस्त; कंपनीवर कारवाईची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2020 23:28 IST

खांदा वसाहतीत महानगर गॅसवाहिनीचे काम सुरू

कळंबोली : पनवेल महापालिका हद्दीतील शहर आणि सिडको वसाहतींतील नागरिक सध्या पाणीटंचाईने त्रासले आहेत. यासंदर्भात प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात संबंधित यंत्रणांना अपयश आले आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या जलवाहिनीला फुटीचे ग्रहण लागले आहे. त्यामुळे रहिवासी संकुलांमध्ये तीव्र पाणीटंचाई भेडसावत आहे.

खांदा वसाहतीत महानगर गॅसलाइन टाकण्याचे काम सुरू आहे. मात्र, हे काम सुरू असताना जलवाहिनी फुटल्याने महिन्याभरात अनेकदा पाणीटंचाईला सामोरे जावे लागले, त्यामुळे सिडको महापालिका आणि एमजीपीविरोधात तीव्र नाराजीचा सूर उमटत आहे.पनवेल शहराला देहरंग धरणाचे पाणी येते; परंतु ते पुरेसे नसल्याने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून पाणी विकत घेतले जाते.

नवीन पनवेल, खांदा वसाहत, कळंबोली आणि करंजाडे हा परिसर पूर्णपणे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या पाण्यावर अवलंबून आहे. भोकरपाडा येथील जलशुद्धीकरण केंद्रापासून जी जलवाहिनी पनवेल आणि न्हावाशेवा परिसरात पाणीपुरवठा करते, ती अतिशय जुनी आणि जीर्ण झाली आहे. त्यामुळे त्यातून ४० टक्के पाणीगळती होत आहे. जलामृत योजनेअंतर्गत ही जलवाहिनी बदलण्याचा निर्णय घेण्यात आला होता; परंतु पुढे काय झाले हे एमजेपीच्या अधिकाऱ्यांनासुद्धा माहीत नाही, तसेच महापालिकासुद्धा अनभिज्ञ आहे.

सिडको मात्र एमजीपीकडे बोट दाखवत आहे. त्यामुळे पनवेल परिसरात तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने पाइपलाइन दुरुस्तीकरिता ३६ तासांचा शटडाउन जाहीर केला होता; परंतु हे काम ४८ तासांपेक्षा जास्त काळ गेल्याने नवीन पनवेल आणि कळंबोलीमध्ये तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागले. रहिवाशांना पिण्यासाठीसुद्धा पाणी मिळाले नाही.

खांदा वसाहतीत या समस्येबरोबरच सेक्टर ९ येथे महानगर गॅसची पाइपलाइन टाकण्यासाठी जे खोदकाम करण्यात आले, त्यामुळे सिडकोची अंतर्गत जलवाहिनी फुटली. वसाहतीला पाणीटंचाई निर्माण झाली. त्यातच एमजेपीने शटडाउन घेतल्याने पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही. त्यातच सेक्टर ६ येथे खोदकाम करताना सिडकोची पुन्हा अंतर्गत पाइपलाइन फुटली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात असल्याने, ती दुरुस्त करण्याचे काम पाणीपुरवठा विभागाने हाती घेतले. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून खांदा वसाहतीमध्ये पाणीपुरवठा होत नसल्याच्या तक्रारी येत आहेत.

खांदा वसाहत पाणीपुरवठा सुरळीतपणे होत नाही. याला जबाबदार सिडको आहे. मध्यंतरी महानगर गॅसचे काम सुरू असताना जलवाहिनी फोडण्यात आली. आता सेक्टर ६ येथे दुसऱ्यांदा ही घटना घडली. वसाहतीला गेल्या काही दिवसांपासून पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असल्याचे नगरसेविका सीता पाटील यांनी सांगितले. पाणीटंचाईमुळे खांदा रहिवासी त्रस्त आहेत, याबाबत सिडको आणि पालिकेकडून उपाययोजना करण्याची गरज असल्याचे शिवसेना शहरप्रमुख सदानंद शिर्के यांनी सांगितले.

साठवणूक क्षमता अपुरी

नवीन पनवेल, खांदा वसाहतीत सिडकोच्या इमारती मोठ्या प्रमाणात आहेत. अनेक इमारतींमध्ये साठवणूक टाक्या नाहीत. किंवा असलेली साठवणूक क्षमता अपुरी आहे. तसेच सिडकोकडेसुद्धा पाणी साठवून ठेवण्यासाठी कोणतीही व्यवस्था नाही.परिसरातील लोकसंख्या वाढल्याने जलकुंभांची संख्या वाढविण्याचीही गरज आहे. अडचणीच्या काळात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून पाणी आले नाही, तर मोठी तारांबळ उडत आहे. पनवेल शहरातच दिवसाआड पाण्याचे नियोजन करण्यात आल्याने पाणी कसे पुरवावे, हा प्रश्न महापालिकेला पडला आहे.

नवीन पनवेल मागणीप्रमाणे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून कमी पाणी मिळते; परंतु सिडकोने योग्य नियोजन केले आहे. खांदा वसाहत, सेक्टर- ६ येथे जलवाहिनी फुटली होती. ती दुरुस्त करण्याचे काम रविवारी हाती घेतले. त्यामुळे काही प्रमाणात पाणीपुरवठा बंद होता; परंतु तो त्वरित सुरळीत करण्यात येईल.- राहुल सरवदे, सहायक अभियंता, पाणीपुरवठा विभाग, नवीन पनवेल सिडको

मागणीपेक्षा पाणीपुरवठा कमी

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून नवीन पनवेल, खांदा वसाहत, कळंबोली आणि करंजाडे या ठिकाणी पाणीपुरवठा केला जातो. या ठिकाणी ९० एमएलडी पाण्याची गरज आहे; परंतु प्रत्यक्षात सुमारे ७० एमडी पाणी वसाहतींना मिळते. या कारणाने वर्षभर पाणीटंचाई निर्माण होत आहे. कामोठे वसाहतीलासुद्धा नवी मुंबई महापालिकेकडून मागणीप्रमाणे पाणी मिळत नाही. त्याचबरोबर खारघर नोडला अतिशय कमी पाणी मिळत आहे.

टॅग्स :Raigadरायगडroad transportरस्ते वाहतूकroad safetyरस्ते सुरक्षा