शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: पेशावर शहरात ना पाकिस्तानी सैन्य ना सरकार; TTP चा कब्जा, असीम मुनीरच्या दाव्याची पोलखोल
2
Smriti Mandhana Century: स्मृतीची विक्रमी सेंच्युरी; वर्ल्ड रेकॉर्ड सेट करत झाली नवी 'सिक्सर क्वीन'
3
Jogeshwari Fire: १० व्या मजल्यावरुन 'ते' ओरडत होते, कपडे लपेटून घेतले; जोगेश्वरीतील अग्नितांडवाची थरारक दृश्य समोर...
4
ऑस्ट्रेलियाची 'दिवाळी'! भारतीय गोलंदाज 'फुसका बार'; कांगारुंनी फोडले 'मालिका विजया'चे फटाके
5
मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले तर...! महायुती की स्वबळावर, निवडणुकीबाबत मुरलीधर मोहोळ काय म्हणाले?
6
ठरलं! 'या' तारखेला टीम इंडियाला मिळणार Asia Cup ट्रॉफी; पण नक्वी यांनी पुन्हा ठेवली खास अट
7
फ्री सेलिब्रेशन पार्टी अन् २ लाख रोख, फक्त 'ती' गर्भवती राहिली पाहिजे; हॉटेल मालकानं दिली ऑफर
8
Pratika Rawal Equals World Record : अंपायरच्या लेकीची कमाल! सर्वात जलद १००० धावांसह विश्वविक्रमाची बरोबरी
9
स्टाइल मारणं महागात पडलं...! रीलसाठी तोंडात फोडले ६ फटाके, ७ वा सुतळी बॉम्ब फुटला अन् १८ वर्षांच्या तरुणाचा अख्खा जबडाच उडाला!
10
Infosys, HCL Tech सह अनेक शेअर्समध्ये जोरदार रॅली; 'या' ५ कारणांमुळे आयटी स्टॉक्स चमकले
11
VIRAL VIDEO : 'आग' लावून हँडशेक! काय आहे 'Fire Handshake' ट्रेंड? डॉक्टरांनी दिली गंभीर चेतावणी!
12
स्वतः जेवण बनवले, मुक्कामी राहिले, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी सातपुडा पर्वतरांगातील आदिवासींसोबत साजरी केली दिवाळी
13
लय भारी! घरात तुळस लावल्याने काय होतं? आयुर्वेदिक डॉक्टरने सांगितले जबरदस्त फायदे
14
सौदीसाठी भाड्याने लढणार २५ हजार पाकिस्तानी सैनिक; 'सीक्रेट डील'चा खुलासा, चीन, भारताचाही उल्लेख
15
Chhath Puja 2025: छट पूजेसाठी मुंबई महापालिका यंत्रणा सज्ज; मंत्री लोढांसह भाजपा नेते घेणार तयारीचा आढावा
16
दक्षिण आफ्रिकेच्या पाकिस्तानवरील विजयाने भारताला फायदा, WTCच्या गुणतक्त्यात मोठी उलथापालथ
17
VIDEO: लेहंगा घालून लंडनच्या रस्त्यावर निघाली भारतीय मुलगी, पुढे लोकांनी काय केलं पाहा
18
पत्नीचं नाव 'मोटी' म्हणून सेव्ह केलं, प्रकरण थेट कोर्टात पोहोचलं अन् मग...!
19
बाल्कनीतून पाय घसरला, पती ग्रिलवर लटकला; वाचवण्यासाठी पत्नी धावली, पण नियतीने डाव साधला!
20
डोळे हे जुलमी गडे! सुंदर दिसण्याची हौस महागात, रोज लायनर, काजळ लावल्यास मोठं नुकसान

माठांपेक्षा पाणीजार जोरात, रायगडमध्ये पाच वर्षांत ट्रेण्ड बदलला

By निखिल म्हात्रे | Updated: April 15, 2024 16:51 IST

काही वर्षांपासून श्रीमंत आणि मध्यमवर्गीय नागरिक पाणी शुद्धीकरणाचे संयंत्र घरात बसविण्यास प्राधान्य देत आहेत.

अलिबाग : उन्हाळा सुरू झाला की, मातीचे माठ खरेदीसाठी ग्राहकांची पावले बाजाराकडे वळत होती. आता त्याऐवजी पाण्याचे जार घरोघरी दिसत आहेत. ग्रामीण भागातही या व्यवसायाने चांगलेच बस्तान बसवले आहे.

काही वर्षांपासून श्रीमंत आणि मध्यमवर्गीय नागरिक पाणी शुद्धीकरणाचे संयंत्र घरात बसविण्यास प्राधान्य देत आहेत. मात्र, ग्रामीण भागात आणि शहरातील सर्वसामान्य नागरिक थंड पाण्यासाठी माठाचाच उपयोग करत होते. त्यामुळे माठाला प्रचंड मागणी होती, पण अलीकडे हे दिवस संपले आहेत.

शहरात आणि खेडोपाडी शुद्ध पाण्याचे ‘उद्योग’ उघडण्यात आल्याने व या पाण्याची विक्री कॅनद्वारे होत असल्याने हा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर फोफावला आहे. एवढेच नाही, या धंद्यामध्ये स्पर्धाही मोठी आहे.

जारमध्ये पाणीपुरवठा करण्याचा व्यवसाय सुरू झाला, त्यावेळी २० लीटरसाठी ७० रुपये किंमत होती. नंतर हळूहळू या धंद्यात अनेकांनी प्रवेश केला आणि स्पर्धा सुरू झाली. पाण्याच्या जारचे दर हळूहळू कमी होत गेले. ७० रुपयांवरून हा दर घरपोच ५० रुपये झाला.

दीड ते दोन दिवसांपर्यंत पाणी थंड ठेवणारे कॅन सहज उपलब्ध होत असल्याने लोकांनीही आता माठ खरेदी करणे बंद केले आहे. त्यामुळे व्यावसायिकांवर बेरोजगारीचे संकट ओढवले आहे.

थंड पाण्याच्या जारमुळे पारंपरिक व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. पूर्वी उन्हाळ्यात हजारोंच्या संख्येत १०० ते १५० पर्यंतच्या किमतीचे माठ विक्री करत होतो. आता शंभर, दोनशे माठ विकले जात नाहीत. त्यामुळे मोठे आर्थिक संकट ओढवले आहे. - रविकिरण नांदगावकर, माठ व्यावसायिक.

टॅग्स :alibaugअलिबाग