शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
3
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
4
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
5
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
6
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
7
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
8
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
9
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
10
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
11
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."
12
मिस्त्री, प्लंबर, फिटरपासून कनिष्ठ अभियंतापर्यंत; मिरा-भाईंदर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती
13
आता त्या गोष्टीवर मी काहीच बोलणार नाही; सचिन-द्रविड अन् MS धोनीचं नाव घेत पुजारा म्हणाला की,..
14
आईस्क्रीम विक्रेत्याला कॉलेज प्लेसमेंटमधून १.८ कोटींचं पॅकेज? व्हायरल Video मागचं 'सत्य'
15
सासू केस ओढून मारायची, पती हुंडा घेऊन...; निक्कीच्या आईने जावयाबद्दल केला धक्कादायक खुलासा!
16
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
17
दुसरे घर घेण्याचा विचार करताय? आधी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी तपासा, अन्यथा होईल मोठं नुकसान!
18
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
19
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
20
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?

पंचनामे २२ कोटींचे, वाटप मात्र १२ कोटींचेच; निसर्ग चक्रीवादळ अपादग्रस्तांमध्ये संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2020 07:09 IST

नुकसानभरपाईस विलंब, वादळामुळे १५ हजार ५७९ दुर्घटना

उदय कळसम्हसळा : निसर्ग चक्रीवादळामुळे म्हसळा तालुक्यात मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे. प्रशासनाने २२ कोटी रुपयांच्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण केले आहेत, पैकी आतापर्यंत ११ कोटी ८७ लाख २० हजार २६१ रुपयांचे अनुदान प्रशासनामार्फत वितरीत करण्यात आले आहे. अद्यापही नुकसानग्रस्तांना भरपाई देण्यात विलंब होत असल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.

नुकसानग्रस्तांच्या मदतीसाठी १०० कोटींची तातडीची मदत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी जाहीर केली. चक्रीवादळाच्या तडाख्यात उद्ध्वस्त झालेल्या रायगड जिल्ह्यातील नुकसानग्रस्तांच्या मदतीसाठी राज्य सरकारने आणखी ३०१ कोटींची मदत जाहीर केली आहे.एकत्रीत ३७३ कोटी रुपयांची रक्कम जिल्हा प्रशासनाकडे जमा झाली आहे.

म्हसळा तालुक्यातील म्हसळा नगरपंचायत व ३९ ग्रामपंचायतीतील प्रत्येक गाववाडींत एकूण १५ हजार ५७९ दुर्घटना घडल्या.त्यामध्ये प्रामुख्याने एक जीवित हानी, ३१ मृत जनावरे, ३ पोल्ट्री फॉर्म, १८३ पूर्णत: पडलेली घरे, १४ हजार ४९४ अशंत: पडलेली घरे, २३ झोपड्या, ७८१ गुरांचे गोठे, ६३ दुकान टपऱ्यांचा समावेश आहे. अशा प्रकारे ७ हजार ८३ लाभार्थ्यांचे अपरिमीत नुकसान झाले. सुमारे २१ कोटी ९८ लाख २८ हजार ३३९ नुकसानीचे पंचनामे करण्यात प्रशासनाला यश आले. प्रशासनाने आता मदत वाटपाला सुरुवात केली आहे. तालुक्यातील काही अपादग्रस्ताना ११ कोटी ८७ लाख २० हजार २६१ रुपयांचे अनुदान वितरीत करण्यात आले आहे. मात्र मदत वाटपामध्ये विलंब होत असल्याने आपादग्रस्तांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.१८६३.६१ हेक्टर क्षेत्रांतील फळबागायतीचे नुकसानम्हसळा तालुक्यांतील ४४२५ बाधित शेतकऱ्यांचे १८६३.६१ हेक्टर क्षेत्रांतील फळबागायतीचे नुकसान झाले आहे. त्यामध्ये आंबा क्षेत्र १३४८.०९ हेक्टर, काजू ३८९.५ १ हेक्टर, नारळ ५ ०.२० हेक्टर, सुपारी २९.३१ हेक्टर इतर फळपिके ४६.५० या बागायती क्षेत्रात नुकसान झाले आहे. फळपिकांसाठी पूर्वी १८ हजार रुपये प्रति हेक्टरी नुकसान देण्यात येत होते. सरकार बागायतदारांना ५० हजार प्रति हेक्टरी नुकसान देणार आहे.वाढीव नुकसान भरपाईचे काय झाले?पहिल्या जीआरनुसार नुकसानग्रस्तांना प्रत्येकी १५ हजार नुकसान भरपाई देण्याचे आदेश प्राप्त झाले होते; परंतु त्यानंतर सरकारच्या नवीन आदेशानुसार नुकसानग्रस्तांना १५ हजार रुपये अधिक १० हजार वाढीव असे एकूण प्रत्येकी २५ हजार रुपये देण्याचे आदेश असतानाही वाटप का करण्यात आले नाही?असा प्रश्न उपस्थित केला आहे. म्हसळा तहसील कार्यालयातील संबंधित कर्मचाºयाजवळ विचारणा केली असता काहीही सांगण्यास नकार देण्यात आला. याबाबत पालकमंत्री, खासदार, आमदार यांनी पाठपुरावा करून नुकसानग्रस्तांना न्याय देण्याची मागणी करण्यात येत आहे.तालुक्यातील अपादग्रस्ताना ११ कोटी ८७ लक्ष २० हजार २६१ रुपयांचे अनुदान वितरीत करण्यात आले आहे. उर्वरित अनुदानही उपलब्ध आहे. लाभार्थींच्या खात्यावर अनुदान जमा होण्याची प्रक्रिया सुरू आहे. कोणीही पात्र लाभार्थी अनुदानापासून वंचित राहणार नाही.-शरद गोसावी, तहसीलदार, म्हसळा

टॅग्स :Cyclone Nisargaनिसर्ग चक्रीवादळRaigadरायगड