शहरं
Join us  
Trending Stories
1
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
2
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
3
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
4
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
6
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
7
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
8
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
9
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
10
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
11
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
12
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
13
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
14
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
15
नोकर भरतीचा गोंधळ आता तरी थांबणार का?; आता केरळच्या धर्तीवर होणार भरती प्रक्रिया
16
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
17
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
18
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
19
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
20
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...

जिल्ह्यात कोट्यवधी रुपयांचे पंचायत‘राज’, सदस्यांना शाही मेजवानी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2018 23:47 IST

एका सुजलाम सुफलाम नगरातील राजव्यवस्थेवर चुकीच्या कारभारामुळे ‘चांगलीच पंचाईत’ आली होती.

- आविष्कार देसाई अलिबाग : एका सुजलाम सुफलाम नगरातील राजव्यवस्थेवर चुकीच्या कारभारामुळे ‘चांगलीच पंचाईत’ आली होती. राज्य करणाऱ्यांवर आलेले हे बालंट सत्ताधारी आणि प्रशासकीय यंत्रणेने तेवढ्याच कुशाग्र बुद्धीने परतावून लावले खरे; परंतु यासाठी क्रयशक्तीबरोबरच आर्थिक तिजोरीही खाली झाली. राजकीय खजाना कमी पडला म्हणून प्रशासकीय यंत्रणेकडून ‘लगान’ पद्धतीने वसुली करून कोट्यवधी रुपये बहाल करण्यात आले. प्रकरण एवढ्यावर संपले नाही, तर त्यांच्या तीन दिवसांच्या दिमतीला शाही मेजवाणीचा थाट, दळणवळणासाठी अश्ववेगाने धावणारी ५२ यांत्रिक वाहने कार्यान्वित केली होती. या सर्वातून सत्ताधारी आणि ‘पंचायत’चे चांगलेच फावले. चुकीच्या पद्धतीने राज्यकारभार हाकणारे सत्ताधीश आणि ‘पंचायती’वाले यांच्यावर आता मुख्यमंत्री कारवाई करणार का, असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे.राज्यव्यवस्थेचा डोलारा चालवताना अनेक वेळा विचारपूर्वक निर्णय घ्यावे लागतात. ते निर्णय नागरिकांसाठी केंद्रित असणे हे सुदृढ राज्यव्यवस्थेचे लक्षण असते. मात्र, आजकाल हाच विचार सत्ताकेंद्रित म्हणजेच स्वकेंद्रित झाल्याचे दिसून येते. चुकीच्या पद्धतीने राज्यकारभार करणाºयांवर एकूण ५२ मुद्द्यांसाठी ‘पंचायत’ आली होती. सत्ताधाºयांचे धिंडवडे काढण्यासाठी आलेल्या ‘पंचायती’ने सत्ताधाºयांना लगाम घालणे अपेक्षित असताना त्यांना अभय देण्याच्या बदल्यात तब्बल दोन कोटी ९० लाख रुपये मिळवले. राज्यव्यवस्थेला अभय द्यायचेच होते, तर तीन दिवस दौºयावर येण्याचे नाटक कशासाठी केले, असा सवाल आता नागरिकांमधून उपस्थित होत आहे.राज्यकारभाराची पाहणी करण्यासाठी बोलावलेली पहिली बैठक अवघ्या दोन तासांतच ओटपण्यात आली होती. कारण आदल्या दिवशीच बैठक फिक्स करण्यात आली होती. बैठक फिक्सिंग करताना सत्ताधाºयांनी ८० लाख रुपये पंचायतीला दिल्याची चर्चा आहे.>शासकीय अधिकारी, कर्मचाºयांची झाडाझडतीमहाड, पोलादपूर, माणगाव पंचायत राज समितीची नियोजित बैठक बुधवारी पोलादपूर पंचायत समिती येथील सभागृहात घेण्यात आली. या वेळी शिक्षण, आरोग्य, कृषी, पाणीपुरवठा, महिला बालकल्याण, पाटबंधारे खात्याच्या अधिकारी, कर्मचारी वर्गाकडून तालुक्यातील माहितीचा आढावा घेऊन शासकीय, अधिकारी कर्मचाºयांना कामकाज सुधारण्याबाबत सूचना व तंबी देत पंचायतराज समितीकडून झाडाझडती घेण्यात आली.महाड, माणगाव, पोलादपूर या पंचायतराज समिती टीममध्ये गटप्रमुख आमदार भरत गोगावले, आमदार श्रीकांत देशपांडे, आमदार दत्तात्रेय सावंत, आमदार दिलीप सोपल याबरोबर कक्ष अधिकारी मंगेश पिसाळ, उप.मु.आ.शीतल पुंड, आरोग्य अधिकारी डॉ.सचिन देसाई आदींचा समावेश होता.पं.स.सदस्य यांच्या नियोजनबद्ध कामामुळे तालुक्यातील शाळा, कॉलेज, ग्रामपंचायत, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र अंगणवाडी बालवाडी, शिक्षण, कृषी, आरोग्य, बांधकाम आदी सर्व विभागात स्वच्छतेसह रंगरंगोटी कामे करण्यात आली होती.>मध्यस्थींकडून पाच लाखांची कमाई?राज्यकर्ते, प्रशासन आणि ‘पंचायत’ यांच्यामध्ये मध्यस्थी करणारी मोठी फळी कार्यरत होती. त्यांनीही मध्यस्थीमध्ये पाच लाखांची कमाई केल्याचे बोलले जात आहे.गटागटाने तालुक्यात जाऊन वसुली करण्याचा निर्णय रात्रीच घेण्यात आला. त्यानुसार अलिबागमधून २४ लाख, पेणमधून १२ लाख, पनवेलमधून २६ लाख, उरणमधून १० लाख, कर्जत १८ लाख, खालापूर १६ लाख, रोह्यातून १० लाख, माणगाव, महाड आणि मुरुड संस्थानातून प्रत्येकी ८ लाख, तळा, पोलादपूर, सुधागड, म्हसळा आणि श्रीवर्धनमधून प्रत्येकी ६ लाख अशी एकूण १ कोटी ७० लाखांची वसुली झाल्याची चर्चा आहे.पंचायतीने ज्या मुद्द्यांवर राज्यकर्त्यांना कोंडीत पकडले होते त्यातील प्रशासन सेवेतील २२ सेवकांवर कारवाई होण्याची शक्यता होती. मात्र, पंचतारांकित शयनगृहात तब्बल ४० लाखांच्या मध्यस्थीने मांडवली करण्यात आली आणि तीन दिवसांच्या दौºयाला पूर्णविराम दिला.