शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

पेणमध्ये ४००० हेक्टरवरील भाताची रोपे कुजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2019 23:35 IST

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भातशेतीमध्ये पुराचे पाणी गेले आहे.

पेण : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भातशेतीमध्ये पुराचे पाणी गेले आहे. सतत पाच दिवस शेतात पाणी तुंबल्याने पेण, वाशी, वडखळ परिसरातील सुमारे ४००० हेक्टर क्षेत्रावरील भातरोपे कुजून शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.कृषी विभागाच्या सहायक कृषी अधिकारी निंबाळकर यांनी परिसरातील पूरपरिस्थितीचा पाहणी दौरा केला असून, पीक नुकसानाचा अहवाल तयार करण्यात आल्याचे सांगितले. संततधार पावसामुळे पेण-खारेपाट विभाग पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे शिवारातील नर्सरी रोपे कुजून शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. सुरुवातीचा पाऊस समाधानकारक पडल्याने बी-बियाण रुजून चांगली उगवण झाली होती. भात गादीवाफे हिरव्या गालिच्यासारखे दिसू लागले होते. रोप चांगली निभावल्याने गतवर्षीच्या प्रमाणे यंदाही खरीप हंगामात चांगली सुरुवात होईल, अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र, त्यानंतर पावसाने चक्क २० दिवस दांडी मारून शेतकºयांना प्रतीक्षा करायला लावली. त्यानंतर जुलै महिन्यापासून सुरू झालेल्या पावसाने सगळीकडे दाणादाण उडवली.शिवारात पूरसदृश परिस्थिती निर्माण होऊन नर्सरी रोपांच्या डोक्यावरून पाणी गेले आहे. शेतात तुंबलेले पाणी पाच दिवस तसेच राहिल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. चार हजार हेक्टर क्षेत्रावरील लागवडीयोग्य रोपे कुजून नष्ट झाली. आता या नुकसानाची तातडीने भरपाई करणे शेतकºयांना शक्य होणार नाही. बियाणांची जमवाजमव करण्यासाठी त्यांना आतापासूनच धावपळ करावी लागत आहे. पावसाच्या लहरीपणाचा शेतकºयांना सामना करावा लागत असून त्याच्या उत्पन्नावरही परिणात होत आह>माणगावमध्ये चारसूत्री भात प्रात्यक्षिककृषी विभाग माणगाव अंतर्गत मौजे माकटी येथे चारसूत्री भात प्रात्यक्षिक दाखवण्यात आली. या चारसूत्री लागवडीमुळे शेतकºयांचे उत्पन्न वाढणार असल्याने भविष्यात आधुनिक पद्धतीने लागवड करावी, असे आवाहन कृषी विभागामार्फत केले. महाराष्ट्र शासन कृषी विभाग माणगाव अंतर्गत तालुका कृषी अधिकारी पी. बी. नवलेंच्या मार्गदर्शनाखाली मौजे माकटी येथे भातपीक शेतीशाळा राबविण्यात येत आहे. या शेतीशाळे अंतर्गत मौजे माकटी येथील शेतकºयांना आधुनिक पद्धतीचा वापर करून भातपीक लागवड करणे याबद्दल प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन करण्यात आले. मौजे माकटी येथील कृषिसेवक गोविंद पाशीमे यांनी नियंत्रित चारसूत्री भात लागवड, हिरवळीच्या खतांचा वापर करण्यासाठी गिरीपुष्प पाल्याचा वापर इत्यादीबद्दल प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन केले. या पद्धतीचा अवलंब केल्यामुळे मजुरांची बचत होते. रोपे कमी प्रमाणात लागतात, नियंत्रित लागवड केल्यामुळे भातशेतीमध्ये तणांचा प्रादुर्भाव कमी होतो, तसेच उत्पादन खर्च कमी येऊन उत्पन्नात वाढ होते. इत्यादीबद्दल माहिती देण्यात आली.