शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी मराठी शिकणार नाही, काय करायचं ते करा.…’’, प्रसिद्ध व्यावसायिकाने राज ठाकरेंना डिवचले  
2
“कुठलीही ताकद ठाकरे ब्रँड संपवू शकणार नाही, दोघे भाऊ एकत्र येत असतील तर...”: सुप्रिया सुळे
3
ऑपरेशन सिंदूर: पाकिस्तान सीमेवर भारत एकाचवेळी तीन देशांशी लढत होता; उप लष्करप्रमुखांचा मोठा गौप्यस्फोट  
4
PM मोदींना त्रिनिदादमध्ये सोहरीच्या पानावर वाढलं गेलं जेवण; भारताशी कनेक्शन अन् फायदे काय?
5
प्राडाला मोठा झटका! कोल्हापुरी चप्पलवरून थेट कोर्टात खेचले, वाचा काय घडले?
6
IND vs ENG: बॅटने कहर केल्यानंतर आता बॉलने इतिहास रचण्याची संधी, जाडेजाच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष!
7
तब्बल ५ लाख २१ हजार ३५४ विद्यार्थ्यांनी घेतला ‘ST पास थेट शाळेत’ योजनेचा लाभ: प्रताप सरनाईक
8
चीनच्या डावपेचात अडकला भारत? EV तयार करणाऱ्या कंपन्यांनी हात वर केले, आता पुढे काय?
9
विराट-रोहितच्या संदर्भात आली मोठी अपडेट; टीम इंडियाच्या चाहत्यांचा पुन्हा होणार 'मूड ऑफ'
10
श्रेया, भाऊ कोहिनूर हिरे पण 'तो' भंगारवाला? शरद उपाध्येंची ६ वर्षांपूर्वीची 'ती' पोस्ट व्हायरल
11
Ashadhi Ekadashi Vrat 2025: आषाढी एकादशीला 'अशी' करा विधिवत पूजा; जाणून घ्या नियम आणि शुभ मुहूर्त!
12
पाकिस्तानचा पाय आणखी खोलात! मायक्रोसॉफ्टने २५ वर्षांनी सोडला देश, कारण ऐकून बसेल धक्का!
13
पुणे बलात्कार प्रकरण: आरोपी तरुणीला आधीपासूनच ओळखत होता; पोलिसांकडून दोघांची चौकशी
14
राजकीय शेरेबाजी करणाऱ्यांना तालिका सभाध्यक्षपदी बसण्याचा अधिकार आहे का?; विरोधकांचा सवाल
15
"किती सुंदर व्यक्त झालायेस डॉक्टर, तू एक...", निलेश साबळेंच्या पोस्टवर प्रवीण तरडे काय म्हणाले?
16
रणबीरच्या 'रामा'ची RRRमधल्या रामचरणशी तुलना, 'रामायण'च्या टीझरनंतर चाहते म्हणतात- "प्रभू श्री रामांच्या भूमिकेसाठी..."
17
होम लोन घेण्याचा विचार करताय? ३ सरकारी बँकांनी कमी केले व्याजदर; पाहा कोणत्या बँकेत मिळतंय स्वस्त कर्ज
18
लेखः 'हिंदी सक्ती' टळली, पण त्याने मराठी भाषेवर आलेलं संकट टळेल? नेमकं कोण चुकतंय?
19
Ashadhi Ekadashi 2025: धर्मशास्त्रानुसार कसा करावा आषाढी एकादशीचा उपास? व्रतनियम वाचा!
20
केजरीवालांचा शीषमहल, तर रेखा गुप्तांचा 'मायामहल'; ९ लाखांचे टीव्ही, रिनोवेशनसाठी ६० लाखांचे टेंडर

पेणमध्ये ४००० हेक्टरवरील भाताची रोपे कुजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2019 23:35 IST

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भातशेतीमध्ये पुराचे पाणी गेले आहे.

पेण : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भातशेतीमध्ये पुराचे पाणी गेले आहे. सतत पाच दिवस शेतात पाणी तुंबल्याने पेण, वाशी, वडखळ परिसरातील सुमारे ४००० हेक्टर क्षेत्रावरील भातरोपे कुजून शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.कृषी विभागाच्या सहायक कृषी अधिकारी निंबाळकर यांनी परिसरातील पूरपरिस्थितीचा पाहणी दौरा केला असून, पीक नुकसानाचा अहवाल तयार करण्यात आल्याचे सांगितले. संततधार पावसामुळे पेण-खारेपाट विभाग पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे शिवारातील नर्सरी रोपे कुजून शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. सुरुवातीचा पाऊस समाधानकारक पडल्याने बी-बियाण रुजून चांगली उगवण झाली होती. भात गादीवाफे हिरव्या गालिच्यासारखे दिसू लागले होते. रोप चांगली निभावल्याने गतवर्षीच्या प्रमाणे यंदाही खरीप हंगामात चांगली सुरुवात होईल, अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र, त्यानंतर पावसाने चक्क २० दिवस दांडी मारून शेतकºयांना प्रतीक्षा करायला लावली. त्यानंतर जुलै महिन्यापासून सुरू झालेल्या पावसाने सगळीकडे दाणादाण उडवली.शिवारात पूरसदृश परिस्थिती निर्माण होऊन नर्सरी रोपांच्या डोक्यावरून पाणी गेले आहे. शेतात तुंबलेले पाणी पाच दिवस तसेच राहिल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. चार हजार हेक्टर क्षेत्रावरील लागवडीयोग्य रोपे कुजून नष्ट झाली. आता या नुकसानाची तातडीने भरपाई करणे शेतकºयांना शक्य होणार नाही. बियाणांची जमवाजमव करण्यासाठी त्यांना आतापासूनच धावपळ करावी लागत आहे. पावसाच्या लहरीपणाचा शेतकºयांना सामना करावा लागत असून त्याच्या उत्पन्नावरही परिणात होत आह>माणगावमध्ये चारसूत्री भात प्रात्यक्षिककृषी विभाग माणगाव अंतर्गत मौजे माकटी येथे चारसूत्री भात प्रात्यक्षिक दाखवण्यात आली. या चारसूत्री लागवडीमुळे शेतकºयांचे उत्पन्न वाढणार असल्याने भविष्यात आधुनिक पद्धतीने लागवड करावी, असे आवाहन कृषी विभागामार्फत केले. महाराष्ट्र शासन कृषी विभाग माणगाव अंतर्गत तालुका कृषी अधिकारी पी. बी. नवलेंच्या मार्गदर्शनाखाली मौजे माकटी येथे भातपीक शेतीशाळा राबविण्यात येत आहे. या शेतीशाळे अंतर्गत मौजे माकटी येथील शेतकºयांना आधुनिक पद्धतीचा वापर करून भातपीक लागवड करणे याबद्दल प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन करण्यात आले. मौजे माकटी येथील कृषिसेवक गोविंद पाशीमे यांनी नियंत्रित चारसूत्री भात लागवड, हिरवळीच्या खतांचा वापर करण्यासाठी गिरीपुष्प पाल्याचा वापर इत्यादीबद्दल प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन केले. या पद्धतीचा अवलंब केल्यामुळे मजुरांची बचत होते. रोपे कमी प्रमाणात लागतात, नियंत्रित लागवड केल्यामुळे भातशेतीमध्ये तणांचा प्रादुर्भाव कमी होतो, तसेच उत्पादन खर्च कमी येऊन उत्पन्नात वाढ होते. इत्यादीबद्दल माहिती देण्यात आली.