शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
3
ICICI ला HDFC चं अधिग्रहण करायचं होतं, चंदा कोचर यांच्यासमोर दीपक पारेखांनी उघडलं गुपित
4
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
5
तेरी दिवानी...! शुबमन गिलच्या सेंच्युरीनंतर फॅन गर्लचा तो खास व्हिडिओ व्हायरल
6
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  
7
Air India Plane Crash: नव्या पाहुण्याचं स्वागत करण्याआधीच सगळं संपलं; ७ महिन्याची गर्भवती होती जिनल
8
Iran Israel युद्घात अजब चोरी; इस्रायली हॅकर्सनं ८०० कोटींची क्रिप्टोकरन्सी केली नष्ट, प्रकरण काय?
9
Yogini Ekadashi 2025: एखाद्या व्यक्तीने दिलेला शाप योगिनी एकादशी व्रताचरणामुळे होतो दूर!
10
खळबळ उडाली! जीन्स अन् टॉपमध्ये दिसू लागल्या हायफाय भिकारी, लोक १००-२०० रुपये देऊ लागले... 
11
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
12
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
13
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
14
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
15
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
16
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर
17
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
18
"मी इनसाइडर असते तर बरं झालं असतं", इंडस्ट्रीतील स्ट्रगलवर लोकप्रिय अभिनेत्रीची क्रिप्टिक पोस्ट
19
"गोयंकाजी पाहताय ना?’’, इंग्लंडमध्ये पंतच्या फटकेबाजीनंतर फॅन्सनी घेतली लखनौच्या मालकांची शाळा  
20
हनीमुनचा प्लॅन, रसगुल्लामध्ये विष भरले अन्...; बेवफा सोनमपेक्षाही खतरनाक आहे खूनी 'मुस्कान'

आगरात भातशेतीचा असा झाला प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 01:39 IST

तालुक्यातील पेझारी येथील नादीरशा बारीया हे त्या काळी शहापूर-धेरंडमधील ७०० एकर भातशेतीचे मालक होते. सोली शेठ, अदी शेठ, हुरमोजी हे त्यांचे वंशज होते

जयंत धुळप अलिबाग : तालुक्यातील पेझारी येथील नादीरशा बारीया हे त्या काळी शहापूर-धेरंडमधील ७०० एकर भातशेतीचे मालक होते. सोली शेठ, अदी शेठ, हुरमोजी हे त्यांचे वंशज होते; परंतु आज त्यांचे कोणीही वंशज येथे नाहीत. शहापूरला पोयनाड येथील मारवाडी, सावकार तसेच पेझारी येथील पारशी यांनी मजुरी देऊन जमिनीचे कोठे तयार के ले,नंतर त्याचे भाग करून, त्याच मजुरांना शेती कसायला दिली आणि येथील आगरात भातशेतीचा प्रारंभ झाला. आगरीत भातशेती करणारे ते आगरी अशी तत्कालीन शेतमजुराची संज्ञा निश्चित झाली. आज या आगºयांची शहापूरला सातवी पिढी कार्यरत असल्याची माहिती ९६ वर्षीय शहापूर ग्रामपंचायतीचे पहिले सरपंच शांताराम महादेव भगत यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे.आगºयांच्या सात पिढ्यांच्या कष्टातून आताचे एकूण ३५०० एकर भातशेती क्षेत्र तयार झाले आणि धोया कोठा, नानी, बेडी, ठाकुर्ली, धोय, लहरी, मांडलेशील सरखार, मोरा, खर्नय, अंगर भोय, भंगार कोठ्यात यामध्ये विभागले असून, प्रत्येक कोठ्याचा स्वतंत्र जागृत देव आहे. या ३५०० एकर भातशेती क्षेत्रापैकी एकट्या नादीरशा बारीया (पेझारी) पारशी समूहाची ७०० एकर भातशेती शहापूर (अलिबाग)मध्ये होती. नादीरशा बारीया एकरी १२ मण भात स्वत:ला व ८ मण भात ती शेती प्रत्यक्ष कसणाºया कुळाला देत असे. यामध्ये कसणाºयांनीच त्याच्या वाट्याला आलेली समुद्रकाठची संरक्षक बांधबंदिस्ती करायची, असे बंधनकारक असायचे. आजच्या सातव्या पिढीलादेखील ते बंधनकारक आहे. बारीया यांच्या नावाने पेझारी येथे प्राथमिक शाळा आहे. सध्या पेझारीमध्ये धुमाळ यांच्या घरापुढे गेले की पेझारी गावात नादीरशा परशांच्या वाड्याचे जमीनदोस्त झालेले काही अवशेष पाहायला मिळत असल्याचे शांताराम भगत यांनी सांगितले.१९२६ साली या ७०० एकर मालकी असलेल्या नादीरशा बारीया यांनी ज्या जमिनी शहापूरच्या शेतमजुरांना मक्त्याने दिल्या होत्या व त्यामध्ये एकरी २० मण भात पिकते, असे गृहीत धरून सावकाराला १२ मण व कसणाºया मजुराला ८ मण, असा समझोता करार असतानादेखील अचानक त्यांनी ‘ढेपी मक्ता’ सुरू केला. ढेप म्हणजे ‘ढेकूळ’ त्यावर येणारे सर्वच पीक पारशाला द्यायचे असा मक्ता सुरू केला. त्यावर ७०० एकरच्या कुळांनी एकमुखी निर्णय घेऊन एक वर्ष संप केला. त्या वेळचे शेतकºयांचे नेते केशव भगत, गोविंद भगत, महादेव मढवी, गोविंद पाटील, बटू पाटील, बाळू पाटील, पोशा तांडेल यांनी प्रतिनिधित्व करून संपाची मागणी १०-१०अशी केली. २० मण एकरी भात पिकेल, त्यातील अर्धे कुळाला व अर्धे सावकाराला म्हणजे समन्यायी वाटपाची मागणी व ज्याला ग्रामीण भाषेत ‘अर्धल’ म्हटले जाते. ही ‘अर्धली’ची मागणी चरीच्या संपाच्या अगोदर संपूर्ण महाराष्ट्रात शहापूरच्या शेतकºयांनी प्रथम केली. जोपर्यंत ‘अर्धल’ मिळत नाही तोपर्यंत शेती कसणार नाही असा निर्णय पारशाला सांगण्यासाठी जाण्याचे ठरवल्याचे शांताराम भगत यांनी सांगितले.