शहरं
Join us  
Trending Stories
1
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
2
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
3
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
4
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
5
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
6
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
7
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
8
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
9
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
10
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
11
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
12
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
13
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
14
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
15
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
16
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
17
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
18
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
19
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

ऐतिहासिक तोफ द्रोणागिरी किल्ल्यावर पोहचविण्यासाठी शिवप्रेमी संघटना एकवटल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2022 21:56 IST

रविवारी (११) हर हर महादेव, जय शिवराय जय शिवाजीचा घोष करीत विविध संघटनांचे सुमारे १२५  शिवप्रेमींनी पहाटे चार वाजल्यापासूनच चेनकप्पी, रस्सी आणि हायजोशच्या जोरावर ऐतिहासिक तोफ गडावर नेण्यासाठी सुरुवात केली आहे.

- मधुकर ठाकूर

उरण :  मागील वर्षी उत्खननात सापडलेली दोन टनांपर्यंत वजनाची आणि साडेसात फूट लांबीची एक शिवकालीन ऐतिहासिक तोफ द्रोणागिरी डोंगरावरील द्रोणागिरी किल्ल्यावर पोहचविण्यासाठी शिवप्रेमी,दुर्ग प्रेमी संघटना एकवटल्या आहेत. रविवारी (११) हर हर महादेव, जय शिवराय जय शिवाजीचा घोष करीत विविध संघटनांचे सुमारे १२५  शिवप्रेमींनी पहाटे चार वाजल्यापासूनच चेनकप्पी, रस्सी आणि हायजोशच्या जोरावर ऐतिहासिक तोफ गडावर नेण्यासाठी सुरुवात केली आहे. मागील वर्षी बांधकामासाठी खोदकाम करताना द्रोणागिरी डोंगराच्या पायथ्याशी खोदकाम सुरू असताना अचानक एक ऐतिहासिक तोफ सापडली होती.शिवकालीन पुरातन असलेली तोफ सात फूट लांबीची आणि दोन टनांपर्यंत वजनाची आहे.ही ऐतिहासिक शिवकालीन तोफ मागील वर्षभर डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या डाऊरनगर येथील शाळेच्या आवारात ठेवण्यात आली होती.पुरातन विभागाच्या दुर्लक्षितपणामुळे धुळखात पडून राहिलेली ही ऐतिहासिक तोफ जतन करण्याची गरज आहे.शिवकालीन इतिहास युवा पिढीलाही ज्ञात व्हावा यासाठी द्रोणागिरी किल्ल्यावरच तोफ स्थानापन्न करण्याची आवश्यकता असल्याची बाबही येथील शिवप्रेमी,दुर्ग प्रेमी संघटनांच्या लक्षात आली.

उरण तालुक्यातील सुमारे दहा शिवप्रेमी,दुर्ग प्रेमी संघटनांनी एकत्रित येऊन विचार विनिमय करून ऐतिहासिक वारसा असलेली शिवकालीन तोफ  काहीही, कसंही करून  द्रोणागिरी डोंगरावरील द्रोणागिरी किल्ल्यावर पोहचविण्यावर एकमत झाले आणि रविवारी (११) प्रत्यक्षात सुमारे १२५ शिवप्रेमींनी पहाटे कामालाही सुरुवात केली. दोन टन वजनाची आणि साडेसात फूट लांबीची तोफ ९०० ते १००० मीटर उंचीच्या द्रोणागिरी डोंगरावरील द्रोणागिरी किल्ल्यावर पोहचविणे साधे काम नसल्याचे माहिती असतानाही युवा शिवप्रेमींनी रविवारी जिद्दीने कामाला सुरुवात केली.

आधी पायथ्यापर्यंत जेसीबीने त्यानंतर चेनकप्पी,रस्सींच्या जोरावर दोन टन वजनाची ऐतिहासिक तोफ द्रोणगिरी किल्ल्यावर पोहचविण्यास सुरुवात केली आहे.शिवरायांचा घोष आणि हायजोशची हाळी देत तोफ दुपारी चार वाजेपर्यंत डोंगराच्या मध्यावर पोहचविण्यात शिवप्रेमींना यश आले आहे.विसाव्यानंतर पुन्हा एकदा शिवरायांचा घोष आणि हायजोशची हाळी देत तोफ द्रोणगिरी किल्ल्यावर पोहचविण्यास सुरुवात केली आहे. द्रोणगिरी किल्ल्यावर पोहचविण्यासाठी आणखी किती वेळ लागेल हे आत्ताच निश्चितपणे सांगता येणार नसल्याचे शिवप्रेमी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.

टॅग्स :Raigadरायगड