शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राफेलमधून सफर; २० मिनिटे पाहिली, भारताच्या नव्या योद्ध्याची ताकद...
2
दिवाळीत एसटीने केली ३०१ कोटी रुपयांची कमाई, २७ ऑक्टोबरला केला एका दिवसात सर्वाधिक कमाईचा विक्रम 
3
स्वच्छतेतून समृद्धीकडे! मोदी सरकारने कमालच केली; ३ आठवड्यात कचऱ्यातून कमावले तब्बल ३८७ कोटी
4
लवकरच 'ट्रू कॉलर'ची सुट्टी! ट्राय अन् डॉटने घेतला मोठा निर्णय; बनावट कॉल, फसवणुकीला लगाम लागणार 
5
माणुसकीला काळिमा! पत्नीनेच ५५ वर्षीय पतीच्या प्रायव्हेट पार्टवर केला वार; कारण ऐकून बसेल धक्का
6
दाऊद इब्राहिमचा विश्वासू दानिश ‘चिकना’ला गोव्यातून अटक; ड्रग्स सिंडिकेटवर NCBची मोठी कारवाई
7
रतन टाटांची 'टाटा' राहिली का? त्यांच्या 'या' पहिल्या खास व्यक्तीला बाहेरचा रस्ता दाखविला; कोण आहेत मिस्त्री?
8
"आता कर्ज घ्यावं लागेल..."; पाकिस्तानमध्ये एका टोमॅटोची किंमत ७५ रुपये, का वाढली महागाई?
9
"श्रेयस अय्यरची सर्जरी झालीच नाही," BCCIनी दिली वेगळीच माहिती, ताज्या अपडेटमध्ये नेमकं काय?
10
Bigg Boss 19: ये बात! महाराष्ट्रीयन भाऊने करुन दाखवलंच, प्रणित मोरे बनला 'बिग बॉस'च्या घरातील नवा कॅप्टन
11
मुलगा शिवसेनेचा आमदार! नारायण राणे म्हणतात, बाळासाहेब होते तोपर्यंतच शिवसेना होती, आजची...
12
Lenskart IPO: 'व्हॅल्युएशन'चा आकडा एवढा मोठा की वाचायला 'लेन्स'ची गरजच नाही; पण गुंतवणूकदारांना ते झेपेल का?
13
'त्या' भारतीय नागरिकाला आता होऊ शकते १० वर्षांची कैद अन् २.५ लाख डॉलर्सचा दंड! नेमकं प्रकरण काय?
14
निवडणुकांचा पत्ता नाही अन् शरद पवार गटाचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर; जयंत पाटील मैदानात
15
विवाह मुहूर्त: २०२५-२६ मध्ये ४९ दिवस विवाह मुहूर्त; खरोखरच करावी लागणार लगीन 'घाई'
16
कॅनडात भारतीय वंशाच्या उद्योगपतीची गोळ्या झाडून हत्या; लॉरेन्स बिश्नोई टोळीने घेतली जबाबदारी
17
निवडणूक बिहारमध्ये, चर्चा महाराष्ट्राच्या एकनाथ शिंदेंची; एनडीएला डिवचण्यासाठी विरोधकांकडून 'शिंदे मॉडेल'चा उल्लेख
18
आधी सिनेमातून काढलं अन् आता...; 'कल्कि'च्या मेकर्सची दीपिकाविरोधात पुन्हा खेळी; चाहते संतापले
19
सगळं संपलं असं वाटतंय? हातातून सर्व निसटून जातंय? स्वामींचे ‘हे’ शब्द नक्कीच प्रेरणा देतील!
20
प्रकट दिन २०२५: स्वामी अन् शंकर महाराजांची भेट कशी झाली? ब्रह्मांडनायक गुरुचा अद्भूत शिष्य

ऐतिहासिक तोफ द्रोणागिरी किल्ल्यावर पोहचविण्यासाठी शिवप्रेमी संघटना एकवटल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2022 21:56 IST

रविवारी (११) हर हर महादेव, जय शिवराय जय शिवाजीचा घोष करीत विविध संघटनांचे सुमारे १२५  शिवप्रेमींनी पहाटे चार वाजल्यापासूनच चेनकप्पी, रस्सी आणि हायजोशच्या जोरावर ऐतिहासिक तोफ गडावर नेण्यासाठी सुरुवात केली आहे.

- मधुकर ठाकूर

उरण :  मागील वर्षी उत्खननात सापडलेली दोन टनांपर्यंत वजनाची आणि साडेसात फूट लांबीची एक शिवकालीन ऐतिहासिक तोफ द्रोणागिरी डोंगरावरील द्रोणागिरी किल्ल्यावर पोहचविण्यासाठी शिवप्रेमी,दुर्ग प्रेमी संघटना एकवटल्या आहेत. रविवारी (११) हर हर महादेव, जय शिवराय जय शिवाजीचा घोष करीत विविध संघटनांचे सुमारे १२५  शिवप्रेमींनी पहाटे चार वाजल्यापासूनच चेनकप्पी, रस्सी आणि हायजोशच्या जोरावर ऐतिहासिक तोफ गडावर नेण्यासाठी सुरुवात केली आहे. मागील वर्षी बांधकामासाठी खोदकाम करताना द्रोणागिरी डोंगराच्या पायथ्याशी खोदकाम सुरू असताना अचानक एक ऐतिहासिक तोफ सापडली होती.शिवकालीन पुरातन असलेली तोफ सात फूट लांबीची आणि दोन टनांपर्यंत वजनाची आहे.ही ऐतिहासिक शिवकालीन तोफ मागील वर्षभर डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या डाऊरनगर येथील शाळेच्या आवारात ठेवण्यात आली होती.पुरातन विभागाच्या दुर्लक्षितपणामुळे धुळखात पडून राहिलेली ही ऐतिहासिक तोफ जतन करण्याची गरज आहे.शिवकालीन इतिहास युवा पिढीलाही ज्ञात व्हावा यासाठी द्रोणागिरी किल्ल्यावरच तोफ स्थानापन्न करण्याची आवश्यकता असल्याची बाबही येथील शिवप्रेमी,दुर्ग प्रेमी संघटनांच्या लक्षात आली.

उरण तालुक्यातील सुमारे दहा शिवप्रेमी,दुर्ग प्रेमी संघटनांनी एकत्रित येऊन विचार विनिमय करून ऐतिहासिक वारसा असलेली शिवकालीन तोफ  काहीही, कसंही करून  द्रोणागिरी डोंगरावरील द्रोणागिरी किल्ल्यावर पोहचविण्यावर एकमत झाले आणि रविवारी (११) प्रत्यक्षात सुमारे १२५ शिवप्रेमींनी पहाटे कामालाही सुरुवात केली. दोन टन वजनाची आणि साडेसात फूट लांबीची तोफ ९०० ते १००० मीटर उंचीच्या द्रोणागिरी डोंगरावरील द्रोणागिरी किल्ल्यावर पोहचविणे साधे काम नसल्याचे माहिती असतानाही युवा शिवप्रेमींनी रविवारी जिद्दीने कामाला सुरुवात केली.

आधी पायथ्यापर्यंत जेसीबीने त्यानंतर चेनकप्पी,रस्सींच्या जोरावर दोन टन वजनाची ऐतिहासिक तोफ द्रोणगिरी किल्ल्यावर पोहचविण्यास सुरुवात केली आहे.शिवरायांचा घोष आणि हायजोशची हाळी देत तोफ दुपारी चार वाजेपर्यंत डोंगराच्या मध्यावर पोहचविण्यात शिवप्रेमींना यश आले आहे.विसाव्यानंतर पुन्हा एकदा शिवरायांचा घोष आणि हायजोशची हाळी देत तोफ द्रोणगिरी किल्ल्यावर पोहचविण्यास सुरुवात केली आहे. द्रोणगिरी किल्ल्यावर पोहचविण्यासाठी आणखी किती वेळ लागेल हे आत्ताच निश्चितपणे सांगता येणार नसल्याचे शिवप्रेमी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.

टॅग्स :Raigadरायगड