शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
IND vs PAK : दोघांनी ठरवून पाकची जिरवली! मैदानात नेमकं काय घडलं? मॅचनंतर अभिषेकनं सगळं सांगितलं
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
5
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
6
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
7
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
8
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
9
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
10
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
11
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
12
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
13
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
14
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
15
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
16
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
17
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
18
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
19
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
20
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...

कांदळवनातील शेतजमिनींच्या नोंदींचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 02:54 IST

जिल्ह्यातील कांदळवनांच्या ५० मीटर क्षेत्रातील शेतजमिनींच्या उताऱ्यांवरील नोंदी अद्याप अद्ययावत केलेल्या नाहीत.

- जयंत धुळपअलिबाग : जिल्ह्यातील कांदळवनांच्या ५० मीटर क्षेत्रातील शेतजमिनींच्या उताऱ्यांवरील नोंदी अद्याप अद्ययावत केलेल्या नाहीत. याबाबत मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणीनंतर महाराष्ट्र शासनाने याबाबत निर्देश दिले होते. महिन्याभरात नोंदी केल्या नाहीत तर उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अलिबाग उप विभागीय महसूल अधिकाºयांनी अवमान केल्याचे निदर्शनास आणून दिले जाईल, असा तक्रार अर्ज अलिबाग तालुक्यातील मोठे शहापूर, धाकटे शहापूर आणि धेरंड या गावांतील सुभाष मारुती थळे यांच्यासह ४१ शेतकºयांनी १० एप्रिल २०१८ रोजी अलिबाग उप विभागीय महसूल अधिकारी सर्जेराव सोनावणे यांना दिला आहे.‘लोकमत’ने याबाबत १२ एप्रिल रोजी वृत्त प्रसिद्ध करताच खडबडून जागे झालेल्या अलिबाग उप विभागीय महसूल अधिकारी सोनावणे यांनी केवळ सातच दिवसांत कार्यवाहीचे आदेश दिले आहेत.अलिबाग उप विभागीय महसूल अधिकारी सोनावणे यांनी पनवेल येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे(एमआयडीसी) प्रादेशिक अधिकारी आणि टाटा पॉवर कंपनीचे (टाटा)व्यवस्थापक यांना १९ एप्रिल रोजी स्पष्ट आदेश देत, पुढील जबाबदारी एमआयडीसी व टाटा कंपनीवर टाकली आहे.अलिबाग तालुक्यातील शहापूर व धेरंड येथील जमिनी टाटा पॉवर कंपनीकरिता महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (पनवेल) या संपादन संस्थेमार्फत संपादित करण्यात आल्या आहेत. संपादित जमिनीतील कांदळवनांची ५० मीटर हद्द निश्चित करण्याबाबत उपअधीक्षक भूमी अभिलेख यांचे प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत. हद्द कायम करण्याबाबत, तसेच भविष्यात संपादित जागा कंपनीस हस्तांतरित वा भाडेपट्ट्याने देताना कांदळवनांसंदर्भात उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन होणार नाही, याबाबत संबंधित कंपनीकडून हमीपत्र घ्यावे आणि केलेल्या कार्यवाहीचा अहवाल सादर करण्याबाबत कळविण्यात आले होते. मात्र, तीन महिन्यांचा कालावधी होऊनसुद्धा एमआयडीसी वा टाटा यांच्याकडून अहवाल जिल्हाधिकारी (भूसंपादन) यांच्याकडे पाठविण्यात आला नसल्याचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या निदर्शनास आले आहे.१८ एप्रिल रोजीच्या बैठकीत सूर्यवंशी यांनी, सदरच्या मोजणीची फी उपअधीक्षक भूमी अभिलेख याच्या कार्यालयात दोन दिवसांत जमा करून पुढील कार्यवाही तत्काळ करण्याच्या सूचना दिल्या आहेत, तसेच भविष्यात संपादित जागा कंपनीला हस्तांतरित वा भाडेपट्ट्याने देताना, कांदळवनांसंदर्भात उच्च न्यायालयाच्याआदेशांचे उल्लंघन होणार नाही, याबाबत हमीपत्र संबंधित कंपनीकडून घेण्याची जबाबदारी एमआयडीसीची राहणार आहे. सदरची कार्यवाही पूर्ण करून अहवाल सादर करण्याच्या सूचना एमआयडीसी व टाटा यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी सूर्यवंशी यांनी दिल्या असल्याचे अलिबाग उप विभागीय महसूल अधिकारी सोनावणे यांनी नमूद केले आहे.>जबाबदारी झटकण्याचा प्रयत्नउच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, तत्काळ कार्यवाही करून तसा अहवाल जिल्हाधिकारी (भूसंपादन) आणि अलिबाग उप विभागीय महसूल अधिकारी कार्यालयास देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांनी दिल्या आहेत. भविष्यात याबाबत कोणताही वाद उद्भवल्यास याची सर्वस्वी जबाबदारी एमआयडीसी व टाटा कंपनी यांची राहील, असे आदेशात अखेरीस नमूद करून अलिबाग उप विभागीय महसूल अधिकारी सोनावणे यांनी आपल्यावरील जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला आहे.>दोन पत्रात तफावत, शेतकºयांशी बांधिलकी नाकारण्याचा प्रयत्नमोठे शहापूर, धाकटे शहापूर आणि धेरंड या तीन गावांतील ४१ तक्रारदार शेतकरी आणि श्रमिक मुक्ती दलाचे जिल्हा समन्वयक राजन भगत यांनाही दिलेल्या पत्रात, ‘१६ जानेवारी २०१८ रोजी स्थळ पाहणी केली. या वेळी धेरंड गावातील खाडीलगतच्या बांधावर जाऊन संपादित जागेचे निरीक्षण केले असता, खाडीचे पाणी उधाणामुळे संरक्षक बंधाºयांना पडलेल्या खांडी (भगदाडे)द्वारे संपादित जागेत घुसून तेथे कांदळवनांची झाडे उगवली असल्याचे निदर्शनास आल्याचे नमूद केले आहे. एमआयडीसी व टाटा कंपनीस दिलेल्या आदेशपत्रात ते नमूद नसल्याने शेतकºयांना महसूल अधिकारी सोनावणे यांच्याबाबत साशंकता वाटत असल्याचे श्रमिक मुक्ती दलाचे जिल्हा समन्वयक राजन भगत यांनीसांगितले.