शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
4
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
5
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
6
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
7
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
8
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
9
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
10
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
11
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
12
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
13
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
14
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
15
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
16
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
17
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
18
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
19
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज

प्लास्टिकनिर्मिती कंपनीस विरोध; सागरकन्या मच्छीमार सहकारी संस्थेचा जनआंदोलनाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2020 23:47 IST

मुरुड हे पर्यटनस्थळ असून, येथे वर्षाला साडेपाच लाख पर्यटक येत असतात.

आगरदांडा : मुरुड हे पर्यटनस्थळ असून, येथे वर्षाला साडेपाच लाख पर्यटक येत असतात. मुरुड तालुक्यात एकही प्रदूषण करणारा कारखाना नसल्याने मुरुड हा प्रदूषणमुक्त तालुका आहे. त्यातच प्लास्टिक निर्मिती करणारा कारखाना आला तर अशा कंपन्या आपले प्रदूषण करणारे पाणी समुद्राच्या खाडीत सोडतील, तर किनारपट्टीवरील असणाऱ्या राजपुरी व मांदाड खाडीवरील मच्छीमार यांच्यावर उपासमारीची पाळी येईल, यामुळे प्लास्टिकनिर्मिती करणाºया कंपनीस सागरकन्या मच्छीमार सहकारी संस्थेचा विरोध असेल, असे संस्थेचे उपाध्यक्ष मनोहर मकू यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. आमच्या संस्थेबरोबरच इतरही संस्थांचा तीव्र विरोध असल्याची माहिती या वेळी मनोहर मकू यांनी दिली.

मुरुड येथील सागरकन्या मच्छीमार सहकारी संस्थेने दिघीपोर्ट येथे प्लास्टिकनिर्मिती करणाºया वेरीटास पॉलीकेम प्रायव्हेट लिमिटेड कंपनीस विरोध केला आहे, असे निवेदन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ बेलापूर यांच्याकडे सादर करण्यात आलेले आहे. यांची प्रत आमदार महेंद्र दळवी, जिल्हाधिकारी रायगड, जिल्हा पोलीस अधीक्षक अलिबाग, मुरुड तहसीलदार, मुरुड पोलीस ठाणे, मेरीटाइम बोर्ड, मुरुड, परवाना अधिकारी, पुरातन खाते यांना देण्यात आल्याची माहिती या वेळी त्यांनी दिली. या कंपनीमुळे मुरुड, एकदरा, राजपुरी, दिघी, नांदगाव, आगरदांडा या खाडीतील गावांमध्ये प्रदूषण होऊन पर्यावरणाला धोका निर्माण होईल, तसेच त्याचे परिणाम मच्छीमारांना सोसावे लागणार आहेत. आर्थिक कणा असलेला मत्स्य व्यवसाय सद्यस्थितीत अडचणीत सापडला आहे.

सातत्याने वाढणारे प्रदूषण त्यामुळे नष्ट होणाºया काही विशिष्ट माशांच्या प्रजाती एकंदरच परिणाम घटलेले उत्पादन शीतगृहाची कमतरता आणि सरकारी उदासीनता याचा फटका कोळी बांधवांना बसला आहे. खाडीजवळच माशांचे पिल्ले तयार होऊन भरतीच्या वेळी समुद्रात जात असतात. ही मत्स्यप्रजननाची नैसर्गिक साखळी खाडीकिनारच्या औद्योगिक प्रदुषणामुळे तुटल्याने मुळात अपेक्षित प्रमाणात नैसर्गिक मत्स्यप्रजनन होत नाही. ही मोठी चिंताजनक बाब असताना पुन्हा दिघीपोर्ट या ठिकाणी प्रदूषण निर्माण करणारी वेरीटास पॉलीकेम प्रायव्हेट कंपनी येत असेल, तर या कंपनीला सर्व किनारपट्टीवरील कोळी बांधव कडाडून विरोध करणार असल्याची माहिती उपाध्यक्ष मनोहर मकू यांनी दिली आहे.

या कंपनीमुळे कोळीबांधवांना वेठीस धरू नये, ही कंपनी आली तर मत्स्य व्यवसायावर मोठा परिणाम होईलच, आधीच मच्छीमारांस मासे मिळत नाहीत, त्यांचा डिझेलचा खर्च भागत नाही. प्रदूषण निर्माण करणारी कंपनी आणून कोळीबाधवांवर अन्याय करु नका अशी मागणी के ली आहे.

परवानगी न देण्याची मागणी

या कंपनीचा प्रदूषणाचा परिणाम मानववस्तीवर होणार असून या कंपनीला येथे परवानगी देऊ नये, अशी विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.जर कंपनी या ठिकाणी आली तर जिल्हातील सर्व कोळीबांधव एकत्र येऊन रस्त्यावर उतरून जन आंदोलन करतील, असा इशारा सागरकन्या मच्छीमारी सोसायटीचे उपाध्यक्ष मनोहर मकू यांनी दिला आहे.

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदीRaigadरायगडMaharashtraमहाराष्ट्र