शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

प्लास्टिकनिर्मिती कंपनीस विरोध; सागरकन्या मच्छीमार सहकारी संस्थेचा जनआंदोलनाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2020 23:47 IST

मुरुड हे पर्यटनस्थळ असून, येथे वर्षाला साडेपाच लाख पर्यटक येत असतात.

आगरदांडा : मुरुड हे पर्यटनस्थळ असून, येथे वर्षाला साडेपाच लाख पर्यटक येत असतात. मुरुड तालुक्यात एकही प्रदूषण करणारा कारखाना नसल्याने मुरुड हा प्रदूषणमुक्त तालुका आहे. त्यातच प्लास्टिक निर्मिती करणारा कारखाना आला तर अशा कंपन्या आपले प्रदूषण करणारे पाणी समुद्राच्या खाडीत सोडतील, तर किनारपट्टीवरील असणाऱ्या राजपुरी व मांदाड खाडीवरील मच्छीमार यांच्यावर उपासमारीची पाळी येईल, यामुळे प्लास्टिकनिर्मिती करणाºया कंपनीस सागरकन्या मच्छीमार सहकारी संस्थेचा विरोध असेल, असे संस्थेचे उपाध्यक्ष मनोहर मकू यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. आमच्या संस्थेबरोबरच इतरही संस्थांचा तीव्र विरोध असल्याची माहिती या वेळी मनोहर मकू यांनी दिली.

मुरुड येथील सागरकन्या मच्छीमार सहकारी संस्थेने दिघीपोर्ट येथे प्लास्टिकनिर्मिती करणाºया वेरीटास पॉलीकेम प्रायव्हेट लिमिटेड कंपनीस विरोध केला आहे, असे निवेदन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ बेलापूर यांच्याकडे सादर करण्यात आलेले आहे. यांची प्रत आमदार महेंद्र दळवी, जिल्हाधिकारी रायगड, जिल्हा पोलीस अधीक्षक अलिबाग, मुरुड तहसीलदार, मुरुड पोलीस ठाणे, मेरीटाइम बोर्ड, मुरुड, परवाना अधिकारी, पुरातन खाते यांना देण्यात आल्याची माहिती या वेळी त्यांनी दिली. या कंपनीमुळे मुरुड, एकदरा, राजपुरी, दिघी, नांदगाव, आगरदांडा या खाडीतील गावांमध्ये प्रदूषण होऊन पर्यावरणाला धोका निर्माण होईल, तसेच त्याचे परिणाम मच्छीमारांना सोसावे लागणार आहेत. आर्थिक कणा असलेला मत्स्य व्यवसाय सद्यस्थितीत अडचणीत सापडला आहे.

सातत्याने वाढणारे प्रदूषण त्यामुळे नष्ट होणाºया काही विशिष्ट माशांच्या प्रजाती एकंदरच परिणाम घटलेले उत्पादन शीतगृहाची कमतरता आणि सरकारी उदासीनता याचा फटका कोळी बांधवांना बसला आहे. खाडीजवळच माशांचे पिल्ले तयार होऊन भरतीच्या वेळी समुद्रात जात असतात. ही मत्स्यप्रजननाची नैसर्गिक साखळी खाडीकिनारच्या औद्योगिक प्रदुषणामुळे तुटल्याने मुळात अपेक्षित प्रमाणात नैसर्गिक मत्स्यप्रजनन होत नाही. ही मोठी चिंताजनक बाब असताना पुन्हा दिघीपोर्ट या ठिकाणी प्रदूषण निर्माण करणारी वेरीटास पॉलीकेम प्रायव्हेट कंपनी येत असेल, तर या कंपनीला सर्व किनारपट्टीवरील कोळी बांधव कडाडून विरोध करणार असल्याची माहिती उपाध्यक्ष मनोहर मकू यांनी दिली आहे.

या कंपनीमुळे कोळीबांधवांना वेठीस धरू नये, ही कंपनी आली तर मत्स्य व्यवसायावर मोठा परिणाम होईलच, आधीच मच्छीमारांस मासे मिळत नाहीत, त्यांचा डिझेलचा खर्च भागत नाही. प्रदूषण निर्माण करणारी कंपनी आणून कोळीबाधवांवर अन्याय करु नका अशी मागणी के ली आहे.

परवानगी न देण्याची मागणी

या कंपनीचा प्रदूषणाचा परिणाम मानववस्तीवर होणार असून या कंपनीला येथे परवानगी देऊ नये, अशी विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.जर कंपनी या ठिकाणी आली तर जिल्हातील सर्व कोळीबांधव एकत्र येऊन रस्त्यावर उतरून जन आंदोलन करतील, असा इशारा सागरकन्या मच्छीमारी सोसायटीचे उपाध्यक्ष मनोहर मकू यांनी दिला आहे.

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदीRaigadरायगडMaharashtraमहाराष्ट्र