शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

भाजपचा जमीन संपादनाला नव्याने विरोध, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना दिले निवेदन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2020 00:46 IST

शहापूर-धेरंड परिसरातील जमिनींवर टाटा कंपनीचा औष्णिक वीज प्रकल्प उभारण्यात येणार होता;

अलिबाग : तालुक्यातील शहापूर-धेरंड परिसरातील जमिनींवर टाटा कंपनीचा औष्णिक वीज प्रकल्प उभारण्यात येणार होता; मात्र गेल्या ११ वर्षांत या ठिकणी कोणत्याच प्रकल्पाची साधी एक वीटही लावण्यात आलेली नाही. असे असताना सरकार आता नव्याने याच परिसरातील तब्बल एक हजार ८०० एकर जमिनी संपादित करण्याच्या हालचाली सरकार आणि प्रशासकीय पातळीवरून करण्यात येत आहे. आधी संपादित केलेल्या जमिनींवर प्रकल्प उभारावा आणि नंतरच नव्याने जमिनीचे संपादन करावे, अशी मागणी भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते यांनी केली.याच परिसरामध्ये इंडोनेशियन कंपनी आपला प्रकल्प उभारण्याच्या तयारीत असल्याने रायगडमधील भाजप आक्रमक झाल्याचे दिसून येते. २००६-०७ साली अलिबाग तालुक्यातील शहापूर आणि धेरंड परिसरामध्ये टाटाचा औष्णिक ऊर्जा प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला होता. यासाठी परिसरातील तब्बल एक हजार २०० एकर जमिनीचे संपादन करण्यात आले होते. त्या वेळी स्थानिक शेतकऱ्यांनी प्रदूषणाच्या मुद्द्यावर या प्रकल्पाला कडाडून विरोध केला होता. जमिनीवरील लढाईसह कायदेशीर लढाई येथीस स्थानिक शेतकऱ्यांनी श्रमिक मुक्ती दलाच्या झेंड्याखाली लढली होती. पुढे टाटाला आपला प्रकल्प गुंडाळावा लागला होता. त्यानंतर त्या जमिनी तशाच पडून होत्या. आता याच परिसरामध्ये सरकार जिल्हा प्रशासनाच्या मदतीने एमआयडीसी अ‍ॅक्टनुसार जमिनीचे संपादन करण्याच्या तयारीत आहे. जमिनीचे संपादन करताना या ठिकाणी कोणता प्रकल्प येणार याबाबत स्थानिकांना कोणतीच कल्पना नाही. प्रकल्प कोणता येणार याची माहिती नसताना सरकार प्रशासनामार्फत जमिनीच्या संपादनाची प्रक्रिया कशी काय राबवू शकते, असा सवाल आता स्थानिक पातळीवरून विचारला जात आहे. मात्र, त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केले जात असल्याने स्थानिकांच्या बाजूने आता भाजपने उडी घेतली आहे.स्थानिकांचा आवाज बनण्यासाठी भाजपचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते यांनी मंगळवारी राज्याचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची भेट घेतली. आधी संपादन केलेल्या जमिनीवर प्रकल्प उभारावा आणि नंतरच नव्याने जमिनीचे संपादन करावे, अशी मागणी केली. या बाबतीत सरकारला अधिवेशनात जाब विचारावा, अशीही मागणी त्यांनी केली. याबाबतचे निवेदन त्यांनी दरेकर यांना दिले. याप्रसंगी भाजप किसान मोर्चाचे राकेश पाटील, भाजपचे अल्पसंख्याकाचे नेते आमीर खानजादा, संघर्ष समितीचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.।प्रकल्पाबाबत स्थानिकांना कल्पना नाहीआता याच परिसरामध्ये सरकार जिल्हा प्रशासनाच्या मदतीने एमआयडीसी अ‍ॅक्टनुसार जमिनीचे संपादन करण्याच्या तयारीत आहे. जमिनीचे संपादन करताना या ठिकाणी कोणता प्रकल्प येणार याबाबत स्थानिकांना कोणतीच कल्पना नाही.