शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
3
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
4
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
5
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
6
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
7
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
8
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
9
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
10
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
11
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
12
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
13
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
14
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
15
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
16
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
17
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
18
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
19
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
20
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   

भाजपचा जमीन संपादनाला नव्याने विरोध, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना दिले निवेदन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2020 00:46 IST

शहापूर-धेरंड परिसरातील जमिनींवर टाटा कंपनीचा औष्णिक वीज प्रकल्प उभारण्यात येणार होता;

अलिबाग : तालुक्यातील शहापूर-धेरंड परिसरातील जमिनींवर टाटा कंपनीचा औष्णिक वीज प्रकल्प उभारण्यात येणार होता; मात्र गेल्या ११ वर्षांत या ठिकणी कोणत्याच प्रकल्पाची साधी एक वीटही लावण्यात आलेली नाही. असे असताना सरकार आता नव्याने याच परिसरातील तब्बल एक हजार ८०० एकर जमिनी संपादित करण्याच्या हालचाली सरकार आणि प्रशासकीय पातळीवरून करण्यात येत आहे. आधी संपादित केलेल्या जमिनींवर प्रकल्प उभारावा आणि नंतरच नव्याने जमिनीचे संपादन करावे, अशी मागणी भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते यांनी केली.याच परिसरामध्ये इंडोनेशियन कंपनी आपला प्रकल्प उभारण्याच्या तयारीत असल्याने रायगडमधील भाजप आक्रमक झाल्याचे दिसून येते. २००६-०७ साली अलिबाग तालुक्यातील शहापूर आणि धेरंड परिसरामध्ये टाटाचा औष्णिक ऊर्जा प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला होता. यासाठी परिसरातील तब्बल एक हजार २०० एकर जमिनीचे संपादन करण्यात आले होते. त्या वेळी स्थानिक शेतकऱ्यांनी प्रदूषणाच्या मुद्द्यावर या प्रकल्पाला कडाडून विरोध केला होता. जमिनीवरील लढाईसह कायदेशीर लढाई येथीस स्थानिक शेतकऱ्यांनी श्रमिक मुक्ती दलाच्या झेंड्याखाली लढली होती. पुढे टाटाला आपला प्रकल्प गुंडाळावा लागला होता. त्यानंतर त्या जमिनी तशाच पडून होत्या. आता याच परिसरामध्ये सरकार जिल्हा प्रशासनाच्या मदतीने एमआयडीसी अ‍ॅक्टनुसार जमिनीचे संपादन करण्याच्या तयारीत आहे. जमिनीचे संपादन करताना या ठिकाणी कोणता प्रकल्प येणार याबाबत स्थानिकांना कोणतीच कल्पना नाही. प्रकल्प कोणता येणार याची माहिती नसताना सरकार प्रशासनामार्फत जमिनीच्या संपादनाची प्रक्रिया कशी काय राबवू शकते, असा सवाल आता स्थानिक पातळीवरून विचारला जात आहे. मात्र, त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केले जात असल्याने स्थानिकांच्या बाजूने आता भाजपने उडी घेतली आहे.स्थानिकांचा आवाज बनण्यासाठी भाजपचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते यांनी मंगळवारी राज्याचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची भेट घेतली. आधी संपादन केलेल्या जमिनीवर प्रकल्प उभारावा आणि नंतरच नव्याने जमिनीचे संपादन करावे, अशी मागणी केली. या बाबतीत सरकारला अधिवेशनात जाब विचारावा, अशीही मागणी त्यांनी केली. याबाबतचे निवेदन त्यांनी दरेकर यांना दिले. याप्रसंगी भाजप किसान मोर्चाचे राकेश पाटील, भाजपचे अल्पसंख्याकाचे नेते आमीर खानजादा, संघर्ष समितीचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.।प्रकल्पाबाबत स्थानिकांना कल्पना नाहीआता याच परिसरामध्ये सरकार जिल्हा प्रशासनाच्या मदतीने एमआयडीसी अ‍ॅक्टनुसार जमिनीचे संपादन करण्याच्या तयारीत आहे. जमिनीचे संपादन करताना या ठिकाणी कोणता प्रकल्प येणार याबाबत स्थानिकांना कोणतीच कल्पना नाही.