शहरं
Join us  
Trending Stories
1
एक व्यक्ती इथे नाही, त्याची उणीव...; धनंजय मुंडेंना परळीतील सभेत वाल्मिक कराडची आठवण
2
“आता गृह मंत्रालय घेतले, पुढे भाजपावाले नितीश कुमारांचे CM पद काढून घेतील”; कुणाचा दावा?
3
सोन्याच्या खाणीत गुंतवणूक करा, 5 वर्षांची कर सूट मिळवा; अफगाणिस्तानची भारताला मोठी ऑफर
4
७०० कोटींचा खर्च केला, पण वंदे भारत ट्रेनची सेवा नाहीच; प्रवाशांची गैरसोय, नाराजी वाढली?
5
Dharmendra : "ते मला नेहमी म्हणायचे की...", धर्मेंद्रजींच्या निधनानंतर सचिनसह विराटही झाला भावूक
6
आता मुंबईतही बिबट्याची दहशत! दिंडोशी म्हाडाच्या बंगल्यात बिबट्याचा संचार
7
“भावनिक वातावरण तयार करून मते मिळवण्याचा प्रयत्न”; राज ठाकरेंच्या विधानावर भाजपाचे उत्तर
8
जुना, वापरलेला फोन खरेदी करताय? थांबा! एका चुकीमुळे होऊ शकते हजारोंचे नुकसान, आताच जाणून घ्या..
9
रिलायन्स जिओला ग्राहक वैतागले! कॉलवेळी ऐकायलाच येत नाहीय..., प्रचंड समस्या, बीएसएनएल परवडले...
10
मोठा पेच...! धर्मेंद्र यांच्या ४५० कोटींच्या संपत्तीचे वारसदार कोण? दोन पत्नी, ६ मुले... 
11
Dharmendra Last Rites: देओल कुटुंबीयांचा आधार हरपला; अभिनेते धर्मेंद्र अनंतात विलीन, सनी देओलने दिला मुखाग्नी
12
"सरकारनं माझं ऐकलं नाही तर संसदेच्या छतावरून उडी मारेन"; जेव्हा राजकारणात दिसली धर्मेंद्र यांची 'शोले स्टाईल'
13
Women’s Kabaddi World Cup 2025: कबड्डीतही भारताच्या लेकी जगात भारी! सलग दुसऱ्यांदा जिंकली वर्ल्ड कप स्पर्धा
14
आधी कारने धडक, मग १९ सेकंदात १९ कुऱ्हाडीचे घाव; गुरुग्राममध्ये डिलिव्हरी बॉयवर जीवघेणा हल्ला!
15
आधुनिक तंत्रज्ञान, पूर्णपणे मेड इन इंडिया; भारतीय नौदलात ‘INS माहे’ची धमाकेदार एन्ट्री...
16
प्रेमात धोका! मिस कॉलने जोडले नाते, प्रियकराने तोडले! गर्भवती प्रेयसीचा गर्भपात करून स्टेशनवर सोडून पळाला
17
डॉ. गौरी गर्जे यांचा मृत्यू अनैसर्गिक; डॉक्टरांच्या खुलाशाने खळबळ, शवविच्छेदन अहवालात कोणत्या नोंदी?
18
"विश्वास ठेवा, दुसरा कुठलाही हेतू नाही" माओवाद्यांनी आत्मसमर्पणासाठी मागितली १५ फेब्रुवारीपर्यंतची वेळ
19
IND vs SA: टीम इंडियाच्या फलंदाजांची घसरगुंडी, दुसरीकडे करूण नायरची सूचक पोस्ट, म्हणाला...
20
गौरी पालवे मृत्यू प्रकरण: पती अनंत गर्जेंना २७ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी, काल झालेली अटक
Daily Top 2Weekly Top 5

अलिबाग मतदारसंघात एकच उमेदवार उच्चशिक्षित

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2019 23:34 IST

चार उमेदवार बारावी उत्तीर्ण । एक उमेदवार सातवी पास

- आविष्कार देसाई ।लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : विधानसभा मतदारसंघामध्ये तब्बल १३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यातील फक्त एकच उमेदवार उच्चशिक्षित आहे. एका उमेदवाराचे शिक्षण बीएपर्यंत झाले आहे. चौदावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या एका उमेदवाराचा समावेश आहे. एक उमेदवार डिप्लोमा इंजिनीअर, बारावी पास असणारे चार, दहावी शिकलेले तीन उमेदवार आहेत. सातवी आणि नववी पास असणारे प्रत्येकी एक उमेदवार आहेत.

अलिबाग विधानसभा मतदारसंघामध्ये प्रामुख्याने शेकाप, शिवसेना आणि काँग्रेस असा सामना पाहायला मिळत आहे. या प्रमुख पक्षांमध्येच खरी लढत असली तरी बसप, वंचित बहुजन आघाडी, लोकभारती, प्रहार जनशक्ती पक्ष आणि सहा अपक्ष उमेदवार असे एकूण १३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. शेकापचे उमेदवार सुभाष पाटील, आनंद नाईक (अपक्ष), चिंतामण पाटील (अपक्ष), श्रीनिवास मट्टपर्ती (लोकभारती) या चार उमेदवारांचे शिक्षण हे बारावीपर्यंत झालेले आहे.

लोकभारती पक्षाचे संदीप सारंग, प्रहार जनशक्तीच्या हेमलता पाटील हे दोन उमेदवार दहावीपर्यंत शिकले आहेत. शिवसेनेच महेंद्र दळवी, अशरफ घट्टे (अपक्ष) हे नववीपर्यंत शिकले आहेत. अपक्ष उमेदवार दिनकर खरीवले यांचे शिक्षण सातवीपर्यंत झाले आहे.वंचित बहुजन आघाडीचे रविकांत पेरेकराचे शिक्षण बीएपर्यंत झाले आहे, तर बसपचे अनिल गायकवाड यांनी एसवाय बीकॉमपर्यंत शिक्षण घेतले आहे. अन्य काँग्रेसचे बंडखोर अपक्ष उमेदवार राजेंद्र ठाकूर यांनी इंजिनीअरिंगचा डिप्लोमा घेतला आहे. या सर्व उमेदवारांवर काँग्रेसच्या श्रद्धा ठाकूर यांनी मात केली आहे. या मतदारसंघातील उच्चशिक्षित महिला उमेदवार ठरल्या आहेत. त्यांचे शिक्षण बीएसस्सी एलएलबीपर्यंत झाले आहे.

अलिबाग मतदारसंघातील उमेदवारांवर नजर टाकल्यावर अद्यापही उच्चशिक्षित उमेदवार राजकारणात येत नसल्याचे चित्र त्यानिमित्ताने समोर येते. राजकीय वरदहस्त असला की राजकारणातील प्रवेश सुकर ठरतो. मात्र, पुढील मेहनत स्वत:च घ्यावी लागते. उमेदवारी देताना शिक्षणाचा निकष अद्यापही लावला जात नसल्याचे दिसून येते. याचाच अर्थ राजकारणात शिक्षणाला विशेष महत्त्व नसल्याचेच अधोरेखित होते.शिक्षण व राजकीय अनुभवाची सांगड महत्त्वाचीकाही उमेदवारांकडे शिक्षण नसेल; परंतु राजकीय जाण आहे. तर काही उमेदवारांकडे दोन्ही गुण असू शकतात. जनसामान्यांतील त्यांची प्रतिमा, पक्ष संघटनावर असेलेली पकड, पक्ष नेतृत्वाचा उमेदवारावर असलेला विश्वास, राजकीय डावपेचाची जाण, असे सर्व निकष लावूनच त्यांना उमेदवारी मिळाली असेल. गाठीशी असलेले शिक्षण आणि राजकीय अनुभव यांची सांगड घालून हे सर्व उमेदवार कशा प्र्रकारे निवडणुकीलाजातात आणि विजयी कोण होतो? हे निकाल लागल्यावरच स्पष्ट होणार आहे.

टॅग्स :Assembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019alibag-acअलिबाग