शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

अलिबाग मतदारसंघात एकच उमेदवार उच्चशिक्षित

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2019 23:34 IST

चार उमेदवार बारावी उत्तीर्ण । एक उमेदवार सातवी पास

- आविष्कार देसाई ।लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : विधानसभा मतदारसंघामध्ये तब्बल १३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यातील फक्त एकच उमेदवार उच्चशिक्षित आहे. एका उमेदवाराचे शिक्षण बीएपर्यंत झाले आहे. चौदावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या एका उमेदवाराचा समावेश आहे. एक उमेदवार डिप्लोमा इंजिनीअर, बारावी पास असणारे चार, दहावी शिकलेले तीन उमेदवार आहेत. सातवी आणि नववी पास असणारे प्रत्येकी एक उमेदवार आहेत.

अलिबाग विधानसभा मतदारसंघामध्ये प्रामुख्याने शेकाप, शिवसेना आणि काँग्रेस असा सामना पाहायला मिळत आहे. या प्रमुख पक्षांमध्येच खरी लढत असली तरी बसप, वंचित बहुजन आघाडी, लोकभारती, प्रहार जनशक्ती पक्ष आणि सहा अपक्ष उमेदवार असे एकूण १३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. शेकापचे उमेदवार सुभाष पाटील, आनंद नाईक (अपक्ष), चिंतामण पाटील (अपक्ष), श्रीनिवास मट्टपर्ती (लोकभारती) या चार उमेदवारांचे शिक्षण हे बारावीपर्यंत झालेले आहे.

लोकभारती पक्षाचे संदीप सारंग, प्रहार जनशक्तीच्या हेमलता पाटील हे दोन उमेदवार दहावीपर्यंत शिकले आहेत. शिवसेनेच महेंद्र दळवी, अशरफ घट्टे (अपक्ष) हे नववीपर्यंत शिकले आहेत. अपक्ष उमेदवार दिनकर खरीवले यांचे शिक्षण सातवीपर्यंत झाले आहे.वंचित बहुजन आघाडीचे रविकांत पेरेकराचे शिक्षण बीएपर्यंत झाले आहे, तर बसपचे अनिल गायकवाड यांनी एसवाय बीकॉमपर्यंत शिक्षण घेतले आहे. अन्य काँग्रेसचे बंडखोर अपक्ष उमेदवार राजेंद्र ठाकूर यांनी इंजिनीअरिंगचा डिप्लोमा घेतला आहे. या सर्व उमेदवारांवर काँग्रेसच्या श्रद्धा ठाकूर यांनी मात केली आहे. या मतदारसंघातील उच्चशिक्षित महिला उमेदवार ठरल्या आहेत. त्यांचे शिक्षण बीएसस्सी एलएलबीपर्यंत झाले आहे.

अलिबाग मतदारसंघातील उमेदवारांवर नजर टाकल्यावर अद्यापही उच्चशिक्षित उमेदवार राजकारणात येत नसल्याचे चित्र त्यानिमित्ताने समोर येते. राजकीय वरदहस्त असला की राजकारणातील प्रवेश सुकर ठरतो. मात्र, पुढील मेहनत स्वत:च घ्यावी लागते. उमेदवारी देताना शिक्षणाचा निकष अद्यापही लावला जात नसल्याचे दिसून येते. याचाच अर्थ राजकारणात शिक्षणाला विशेष महत्त्व नसल्याचेच अधोरेखित होते.शिक्षण व राजकीय अनुभवाची सांगड महत्त्वाचीकाही उमेदवारांकडे शिक्षण नसेल; परंतु राजकीय जाण आहे. तर काही उमेदवारांकडे दोन्ही गुण असू शकतात. जनसामान्यांतील त्यांची प्रतिमा, पक्ष संघटनावर असेलेली पकड, पक्ष नेतृत्वाचा उमेदवारावर असलेला विश्वास, राजकीय डावपेचाची जाण, असे सर्व निकष लावूनच त्यांना उमेदवारी मिळाली असेल. गाठीशी असलेले शिक्षण आणि राजकीय अनुभव यांची सांगड घालून हे सर्व उमेदवार कशा प्र्रकारे निवडणुकीलाजातात आणि विजयी कोण होतो? हे निकाल लागल्यावरच स्पष्ट होणार आहे.

टॅग्स :Assembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019alibag-acअलिबाग