शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

अलिबाग मतदारसंघात एकच उमेदवार उच्चशिक्षित

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2019 23:34 IST

चार उमेदवार बारावी उत्तीर्ण । एक उमेदवार सातवी पास

- आविष्कार देसाई ।लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : विधानसभा मतदारसंघामध्ये तब्बल १३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यातील फक्त एकच उमेदवार उच्चशिक्षित आहे. एका उमेदवाराचे शिक्षण बीएपर्यंत झाले आहे. चौदावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या एका उमेदवाराचा समावेश आहे. एक उमेदवार डिप्लोमा इंजिनीअर, बारावी पास असणारे चार, दहावी शिकलेले तीन उमेदवार आहेत. सातवी आणि नववी पास असणारे प्रत्येकी एक उमेदवार आहेत.

अलिबाग विधानसभा मतदारसंघामध्ये प्रामुख्याने शेकाप, शिवसेना आणि काँग्रेस असा सामना पाहायला मिळत आहे. या प्रमुख पक्षांमध्येच खरी लढत असली तरी बसप, वंचित बहुजन आघाडी, लोकभारती, प्रहार जनशक्ती पक्ष आणि सहा अपक्ष उमेदवार असे एकूण १३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. शेकापचे उमेदवार सुभाष पाटील, आनंद नाईक (अपक्ष), चिंतामण पाटील (अपक्ष), श्रीनिवास मट्टपर्ती (लोकभारती) या चार उमेदवारांचे शिक्षण हे बारावीपर्यंत झालेले आहे.

लोकभारती पक्षाचे संदीप सारंग, प्रहार जनशक्तीच्या हेमलता पाटील हे दोन उमेदवार दहावीपर्यंत शिकले आहेत. शिवसेनेच महेंद्र दळवी, अशरफ घट्टे (अपक्ष) हे नववीपर्यंत शिकले आहेत. अपक्ष उमेदवार दिनकर खरीवले यांचे शिक्षण सातवीपर्यंत झाले आहे.वंचित बहुजन आघाडीचे रविकांत पेरेकराचे शिक्षण बीएपर्यंत झाले आहे, तर बसपचे अनिल गायकवाड यांनी एसवाय बीकॉमपर्यंत शिक्षण घेतले आहे. अन्य काँग्रेसचे बंडखोर अपक्ष उमेदवार राजेंद्र ठाकूर यांनी इंजिनीअरिंगचा डिप्लोमा घेतला आहे. या सर्व उमेदवारांवर काँग्रेसच्या श्रद्धा ठाकूर यांनी मात केली आहे. या मतदारसंघातील उच्चशिक्षित महिला उमेदवार ठरल्या आहेत. त्यांचे शिक्षण बीएसस्सी एलएलबीपर्यंत झाले आहे.

अलिबाग मतदारसंघातील उमेदवारांवर नजर टाकल्यावर अद्यापही उच्चशिक्षित उमेदवार राजकारणात येत नसल्याचे चित्र त्यानिमित्ताने समोर येते. राजकीय वरदहस्त असला की राजकारणातील प्रवेश सुकर ठरतो. मात्र, पुढील मेहनत स्वत:च घ्यावी लागते. उमेदवारी देताना शिक्षणाचा निकष अद्यापही लावला जात नसल्याचे दिसून येते. याचाच अर्थ राजकारणात शिक्षणाला विशेष महत्त्व नसल्याचेच अधोरेखित होते.शिक्षण व राजकीय अनुभवाची सांगड महत्त्वाचीकाही उमेदवारांकडे शिक्षण नसेल; परंतु राजकीय जाण आहे. तर काही उमेदवारांकडे दोन्ही गुण असू शकतात. जनसामान्यांतील त्यांची प्रतिमा, पक्ष संघटनावर असेलेली पकड, पक्ष नेतृत्वाचा उमेदवारावर असलेला विश्वास, राजकीय डावपेचाची जाण, असे सर्व निकष लावूनच त्यांना उमेदवारी मिळाली असेल. गाठीशी असलेले शिक्षण आणि राजकीय अनुभव यांची सांगड घालून हे सर्व उमेदवार कशा प्र्रकारे निवडणुकीलाजातात आणि विजयी कोण होतो? हे निकाल लागल्यावरच स्पष्ट होणार आहे.

टॅग्स :Assembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019alibag-acअलिबाग