शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही शत्रू नाही..." CM देवेंद्र फडणवीस यांनी मानले उद्धव ठाकरे-शरद पवारांचे आभार, पण का?
2
पुण्यात मध्यरात्री २ तास गावगुंडांचा धुमाकूळ; रिक्षा, कार, स्कूल बससह २० ते २५ वाहनांची तोडफोड
3
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Sensex मध्ये २०० अंकांपेक्षा अधिक उसळी, कोणते शेअर्स चमकले?
4
टेरिफची धमकी देत ट्रम्प यांनी साधली इतिहासातील सर्वात मोठी डील; जगातील मोठी अर्थव्यवस्था झुकली...
5
...तरीही भारत बांगलादेशच्या मदतीला धावला! विमान अपघातातील जखमींवर उपचारासाठी डॉक्टरांचे पथक पाठविणार...
6
ज्या मराठी तरुणीला मारहाण झाली, तिची परिस्थिती गंभीर; डॉक्टर म्हणाले, पॅरालिसीस...'
7
बाजाराचा मोह सोडा! ३ कोटी ९ लाखांचा मालक तर PPF चं बनवेल; फक्त पती-पत्नीला हा फॅार्म्युला वापरावा लागेल
8
दुबईत नोकरी, १० लाखाची ऑफर...; मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी १९ वर्षांनी मोहम्मद शेखची सुटका
9
पाकिस्तानी विमानांना भारतीय हवाई हद्दीत प्रवेश नाहीच; केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय
10
स्वत:च्या कार घेऊन आता ट्रेनने जाता येणार गोव्याला! कसं? जाणून घ्या...
11
Deep Amavasya 2025: दीप अमावास्येला दिवे उजळून 'अशी' करा शास्त्रोक्त पूजा आणि आरती!
12
"आपण भारतात राहतो, बंदूक घेऊन ठेवावी लागेल", प्रेग्नंसीवेळी घाबरलेली रिचा चड्डा; कारण काय?
13
जो पोलिसांना सापडला नाही, त्याला मनसेच्या कार्यकर्त्यांना कसा शोधला?; समोर आली थरारक घटना
14
पाच फुटांच्या मूर्तींचे कृत्रिम तलावांतच विसर्जन करा, पर्यावरण विभागाची सूचना!
15
गुरुवारी गुरुपुष्यामृत योग: १० राशींवर अपार धनलक्ष्मी कृपा, पगारवाढ लाभ, स्वामी शुभच करतील!
16
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
17
उपराष्ट्रपतीपदासाठी राजनाथ सिंह यांचे नाव? राष्ट्रपतींनी स्वीकारला धनखड यांचा राजीनामा
18
आजचे राशीभविष्य २३ जुलै २०२५ : या राशींना आजचा दिवस लाभदायी, या राशींसाठी...
19
केवळ १८ महिन्यांचा संसार, मागितली १२ कोटींची पोटगी, बीएमडब्ल्यू! कोर्ट महिलेला म्हणाले... 
20
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार, गृह राज्यमंत्र्यांचा राजीनामा घेणारच : परब

२८ धरणांत ३१ टक्केच पाणी

By admin | Updated: April 29, 2017 01:51 IST

रायगड पाटबंधारे विभागाच्या जिल्ह्यातील २८ धरणांची (लघुपाटबंधारे प्रकल्प) एकूण जलसंचय क्षमता ६८.२१ दशलक्षघनमीटर असून

जयंत धुळप / अलिबागरायगड पाटबंधारे विभागाच्या जिल्ह्यातील २८ धरणांची (लघुपाटबंधारे प्रकल्प) एकूण जलसंचय क्षमता ६८.२१ दशलक्षघनमीटर असून शुक्रवारी उपलब्ध माहितीनुसार या २८ धरणांमध्ये केवळ ३१ टक्के म्हणजे २१.१७ दशलक्ष घनमीटर जलसाठा शिल्लक आहे. येत्या ५ जून रोजी ऋतूचक्रानुसार मान्सून पावसाचे आगमन झाले तर संपूर्ण मे महिन्यात जिल्हावासीयांची तहान भागविण्यात हा शिल्लक जलसाठा असमर्थ ठरणार असल्याने जिल्हा प्रशासनासमोर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.जिल्ह्यातील या २८ धरणांपैकी पेण तालुक्यातील आंबेघर धरणात केवळ दोन टक्के जलसाठा शिल्लक आहे, तर खालापूर तालुक्यातील भिलवले धरणात १० टक्के जलसाठा शिल्लक आहे. ११ ते २० टक्के जलसाठा शिल्लक असलेली ५ धरणे, २१ ते ३० टक्के जलसाठा शिल्लक असलेली ७ धरणे,३१ ते ४० टक्के जलसाठा शिल्लक असलेली ७ धरणे, ४१ ते ५० टक्के जलसाठा शिल्लक असलेली ३ धरणे,५१ ते ६० टक्के जलसाठा शिल्लक असलेली ३धरणे, तर ६१ ते ७० टक्के जलसाठा शिल्लक असलेले पाभरे(म्हसळा) हे एक धरण जिल्ह्यात आहे.जिल्ह्यातील उन्हाळी पाणीटंचाई निवारणार्थ सद्यस्थितीत २० टॅँकर्सच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले असले, तरी येत्या मे महिन्यात अधिक तीव्र होणाऱ्या उन्हाळ््यात टँकर्सची संख्या दुपटीपेक्षा अधिक करावी लागेल, अशी शक्यता पाणीपुरवठा विभागाच्या सूत्रांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, टँकरकरिता पाणी नेमके कुठून उपलब्ध करायचे असाही एक सुप्त प्रश्न आहे.राष्ट्रीय जलनितीनुसार पिण्याच्या पाण्यास प्रथम क्रमांक आहे. त्यानंतर शेती व औद्योगिकीकरणास पाणी असा क्रम असल्याने, औद्योगिक जिल्हा असलेल्या रायगड जिल्ह्यातील औद्योगिक कारखाने व्यवस्थापनांच्या पोटातदेखील यंदा या पाणीटंचाईमुळे गोळा आला आहे. पिण्याकरिता पाणी अपुरे पडू लागले, तर औद्योगिक कारखान्यांच्या पाण्यात कपात करण्याचे सूत्र स्वीकारले जाते, त्याचा परिणाम औद्योगिक कारखाने बंद करणे वा त्यांचे उत्पादन कमी करणे असा होत असल्याने औद्योगिक क्षेत्रातही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.