शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
2
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
3
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
4
पंख्याच्या हवेवरून वरातीत पेटला वाद, लाठ्या-काठ्या, दगड धोंडे घेऊन तुंबळ हाणामारी, एकाचा मृत्यू  
5
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
6
गुन्हेगारांना पकडण्यासाठी कालव्यात मारली उडी; तेव्हाच पडली विजेची तार, कॉन्स्टेबलचा मृत्यू
7
केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव पाहून काँग्रेस अवाक्, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया
8
IPL 2025 अंतिम सामन्यावरून मोठा गोंधळ; BCCIच्या 'या' निर्णयावर चाहते संतापले, नेमकं काय घडलं?
9
जबरदस्त! कंपनी असावी तर अशी, नफा होताच बोनस म्हणून दिली ७ महिन्यांची दिली सॅलरी
10
पुणे IED केस: ISIS साठी काम करणाऱ्या दोन जणांना NIA ने विमानतळावरून केली अटक
11
चर्चा युद्धबंदीची सुरू होती, रशियाने हल्ले वाढवले, प्रवाशांवर बॉम्ब टाकले; ९ जणांचा मृत्यू झाला
12
मनाविरुद्ध काही झालं की संताप होतो, चिडचिड होते? रागावर नियंत्रण मिळवण्याच्या ६ टिप्स
13
भयानक! तरुणाची स्टंटबाजी, वेगाने कार चालवून ४ जणांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
14
आता 'टीम इंडिया' पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणणार; श्रीकांत शिंदेंसह सुप्रिया सुळेंना जबाबदारी
15
"ओशो आश्रमात गेल्यावर बाबांनी.."; अक्षय खन्नाचा मोठा खुलासा, विनोद खन्नांविषयी काय म्हणाला?
16
Video: केदारनाथ धामला जाताना हेलिकॉप्टर क्रॅश; दैव बलवत्तर म्हणून वाचले
17
Coronavirus Outbreak: टेन्शन वाढलं! हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोनाचं थैमान, रुग्णांमध्ये मोठी वाढ; भारताला किती धोका?
18
Video - जॉर्जिया मेलोनींच्या स्वागतासाठी अल्बेनियाचे पंतप्रधान भर पावसात गुडघ्यावर बसले अन्...
19
"लग्नानंतर टिंडरवर अकाऊंट उघडून मी दोन तीन मुलींसोबत..."; अभिजीत सावंतची कबूली, म्हणाला-
20
UPI Lite, वॉलेट पेमेंट... युजर्सच्या पसंतीस का उतरत नाहीयेत हे नवे फीचर्स? कुठे येतेय समस्या

२८ धरणांत ३१ टक्केच पाणी

By admin | Updated: April 29, 2017 01:51 IST

रायगड पाटबंधारे विभागाच्या जिल्ह्यातील २८ धरणांची (लघुपाटबंधारे प्रकल्प) एकूण जलसंचय क्षमता ६८.२१ दशलक्षघनमीटर असून

जयंत धुळप / अलिबागरायगड पाटबंधारे विभागाच्या जिल्ह्यातील २८ धरणांची (लघुपाटबंधारे प्रकल्प) एकूण जलसंचय क्षमता ६८.२१ दशलक्षघनमीटर असून शुक्रवारी उपलब्ध माहितीनुसार या २८ धरणांमध्ये केवळ ३१ टक्के म्हणजे २१.१७ दशलक्ष घनमीटर जलसाठा शिल्लक आहे. येत्या ५ जून रोजी ऋतूचक्रानुसार मान्सून पावसाचे आगमन झाले तर संपूर्ण मे महिन्यात जिल्हावासीयांची तहान भागविण्यात हा शिल्लक जलसाठा असमर्थ ठरणार असल्याने जिल्हा प्रशासनासमोर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.जिल्ह्यातील या २८ धरणांपैकी पेण तालुक्यातील आंबेघर धरणात केवळ दोन टक्के जलसाठा शिल्लक आहे, तर खालापूर तालुक्यातील भिलवले धरणात १० टक्के जलसाठा शिल्लक आहे. ११ ते २० टक्के जलसाठा शिल्लक असलेली ५ धरणे, २१ ते ३० टक्के जलसाठा शिल्लक असलेली ७ धरणे,३१ ते ४० टक्के जलसाठा शिल्लक असलेली ७ धरणे, ४१ ते ५० टक्के जलसाठा शिल्लक असलेली ३ धरणे,५१ ते ६० टक्के जलसाठा शिल्लक असलेली ३धरणे, तर ६१ ते ७० टक्के जलसाठा शिल्लक असलेले पाभरे(म्हसळा) हे एक धरण जिल्ह्यात आहे.जिल्ह्यातील उन्हाळी पाणीटंचाई निवारणार्थ सद्यस्थितीत २० टॅँकर्सच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले असले, तरी येत्या मे महिन्यात अधिक तीव्र होणाऱ्या उन्हाळ््यात टँकर्सची संख्या दुपटीपेक्षा अधिक करावी लागेल, अशी शक्यता पाणीपुरवठा विभागाच्या सूत्रांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, टँकरकरिता पाणी नेमके कुठून उपलब्ध करायचे असाही एक सुप्त प्रश्न आहे.राष्ट्रीय जलनितीनुसार पिण्याच्या पाण्यास प्रथम क्रमांक आहे. त्यानंतर शेती व औद्योगिकीकरणास पाणी असा क्रम असल्याने, औद्योगिक जिल्हा असलेल्या रायगड जिल्ह्यातील औद्योगिक कारखाने व्यवस्थापनांच्या पोटातदेखील यंदा या पाणीटंचाईमुळे गोळा आला आहे. पिण्याकरिता पाणी अपुरे पडू लागले, तर औद्योगिक कारखान्यांच्या पाण्यात कपात करण्याचे सूत्र स्वीकारले जाते, त्याचा परिणाम औद्योगिक कारखाने बंद करणे वा त्यांचे उत्पादन कमी करणे असा होत असल्याने औद्योगिक क्षेत्रातही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.