शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
2
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
3
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
4
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
5
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
6
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
7
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
8
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
9
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
10
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
11
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
12
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
13
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
14
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
15
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
16
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
17
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
18
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
19
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
20
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
Daily Top 2Weekly Top 5

२८ धरणांत ३१ टक्केच पाणी

By admin | Updated: April 29, 2017 01:51 IST

रायगड पाटबंधारे विभागाच्या जिल्ह्यातील २८ धरणांची (लघुपाटबंधारे प्रकल्प) एकूण जलसंचय क्षमता ६८.२१ दशलक्षघनमीटर असून

जयंत धुळप / अलिबागरायगड पाटबंधारे विभागाच्या जिल्ह्यातील २८ धरणांची (लघुपाटबंधारे प्रकल्प) एकूण जलसंचय क्षमता ६८.२१ दशलक्षघनमीटर असून शुक्रवारी उपलब्ध माहितीनुसार या २८ धरणांमध्ये केवळ ३१ टक्के म्हणजे २१.१७ दशलक्ष घनमीटर जलसाठा शिल्लक आहे. येत्या ५ जून रोजी ऋतूचक्रानुसार मान्सून पावसाचे आगमन झाले तर संपूर्ण मे महिन्यात जिल्हावासीयांची तहान भागविण्यात हा शिल्लक जलसाठा असमर्थ ठरणार असल्याने जिल्हा प्रशासनासमोर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.जिल्ह्यातील या २८ धरणांपैकी पेण तालुक्यातील आंबेघर धरणात केवळ दोन टक्के जलसाठा शिल्लक आहे, तर खालापूर तालुक्यातील भिलवले धरणात १० टक्के जलसाठा शिल्लक आहे. ११ ते २० टक्के जलसाठा शिल्लक असलेली ५ धरणे, २१ ते ३० टक्के जलसाठा शिल्लक असलेली ७ धरणे,३१ ते ४० टक्के जलसाठा शिल्लक असलेली ७ धरणे, ४१ ते ५० टक्के जलसाठा शिल्लक असलेली ३ धरणे,५१ ते ६० टक्के जलसाठा शिल्लक असलेली ३धरणे, तर ६१ ते ७० टक्के जलसाठा शिल्लक असलेले पाभरे(म्हसळा) हे एक धरण जिल्ह्यात आहे.जिल्ह्यातील उन्हाळी पाणीटंचाई निवारणार्थ सद्यस्थितीत २० टॅँकर्सच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले असले, तरी येत्या मे महिन्यात अधिक तीव्र होणाऱ्या उन्हाळ््यात टँकर्सची संख्या दुपटीपेक्षा अधिक करावी लागेल, अशी शक्यता पाणीपुरवठा विभागाच्या सूत्रांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, टँकरकरिता पाणी नेमके कुठून उपलब्ध करायचे असाही एक सुप्त प्रश्न आहे.राष्ट्रीय जलनितीनुसार पिण्याच्या पाण्यास प्रथम क्रमांक आहे. त्यानंतर शेती व औद्योगिकीकरणास पाणी असा क्रम असल्याने, औद्योगिक जिल्हा असलेल्या रायगड जिल्ह्यातील औद्योगिक कारखाने व्यवस्थापनांच्या पोटातदेखील यंदा या पाणीटंचाईमुळे गोळा आला आहे. पिण्याकरिता पाणी अपुरे पडू लागले, तर औद्योगिक कारखान्यांच्या पाण्यात कपात करण्याचे सूत्र स्वीकारले जाते, त्याचा परिणाम औद्योगिक कारखाने बंद करणे वा त्यांचे उत्पादन कमी करणे असा होत असल्याने औद्योगिक क्षेत्रातही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.