शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
3
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
4
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
5
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
6
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
7
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
10
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
11
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
12
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
13
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
14
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
15
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
16
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
17
बुलढाण्यातील संतापजनक घटना! सासरच्यांनी इतकं छळलं की, २१ वर्षाच्या गर्भवती नवविवाहितेने...; पोलिसांना पतीला कुठे पकडले?
18
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
19
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
20
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छता अभियानासाठी म्हसळा नगरपंचायतीचे एक पाऊल पुढे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2020 00:16 IST

१४व्या वित्त आयोगाकडून २० लाख रुपयांचा निधी

म्हसळा : देशातील सर्व शहरांमधील नागरिकांना स्वच्छ पर्यावरण व चांगले आरोग्य मिळावे, यासाठी केंद्र शासनाने स्वच्छ भारत अभियान संपूर्ण देशामध्ये राबविणे सुरू केले आहे.

पंतप्रधानांच्या स्वच्छ भारत संकल्पनेला आता महाराष्ट्राने आणखी व्यापक स्वरूप देण्याचे ठरविले आहे. त्यातूनच आता राज्यातील नागरी भागात स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) राबविण्यास सुरुवात होत आहे. त्याच माध्यमातून म्हसळा नगरपंचायतीला १४व्या वित्त आयोगातून पाहिला हप्ता म्हणून २० लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. याचबरोबर शहरी, तसेच ग्रामीण भागातील भिंतींवर स्वच्छतेचा संदेश, तसेच चित्र रंगविण्यात आले आहे.

या निधीच्या अंर्तगत म्हसळा नगरपंचायत हद्दीत अभियानास वाढता प्रतिसाद मिळावा, म्हणून व स्वत:पासून सुरुवात व्हावी, या उद्देशाने घर स्वच्छ राहिले, तर गाव स्वच्छ राहिल, गाव स्वच्छ राहिले, तर शहर स्वच्छ राहिल, शहर स्वच्छ राहिले, तर राज्य स्वच्छ राहिल, पर्यायाने देशही स्वच्छ राहिल. स्वच्छतेमुळे देशाचे आरोग्यही स्वच्छ राहण्यास मदत होणार आहे, या विषयी नगरपंचायतीमार्फत मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे.

संपूर्ण शहरासह नगरपंचायत हद्दींत भिंती रंगविणे, फ्लेक्स लावणे या विविध कामांर्तगत फार मोठा खर्च करण्यात आला आहे. ओला-सुका कचऱ्याचे कंपार्टमेंट असेलेले दोन टाटा टेम्पो, कचरा क्रश करण्याचे मशीन नगरपंचायतीने घेतली आहेत. याचबरोबर, स्वच्छता व आरोग्य सुधारण्यासाठी शहरांतील आठ विहिरींची पूर्ण स्वच्छ करून दुरुस्ती करण्यात आली आहे.

कठडा उंचावणे, परिसर स्वच्छ करणे, अशी कामे याच निधीतून करण्यात येणार असल्याचे नगरपंचायत अर्थ विभागातून सांगण्यात आले.संपूर्ण शहरांत स्वच्छतेबाबत जनजागृती करत असतानाच, यापुढे दरदिवशी निर्माण होणाºया घनकचºयाची आधुनिक व शास्त्रशुद्ध पद्धतीचा अवलंब करून, ओला व सुका कचरा वर्गीकरण करून विल्हेवाट लावण्याबाबत नगराध्यक्षा जयश्री कापरे पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन योजना तयार करणार असल्याचे सूत्रांकडून समजते. म्हसळा शहरांत स्वच्छतेविषयी जागरूकता निर्माण करणे आणि त्याची सार्वजनिक आरोग्याशी सांगड घालणे, हे पहिले काम असल्याचे सांगण्यात आले.

स्वच्छतेच्या चांगल्या पद्धतीच्या अनुषंगाने सवयींमध्ये बदल करणे. स्वच्छतेविषयी जागरूकता निर्माण करणे आणि त्याची सार्वजनिक आरोग्याशी सांगड घालणे. नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांची क्षमता वाढविणे. भांडवली खर्च, आॅपरेशन आणि देखभाल यासाठी खासगी पास्को, दिघी पोर्ट किंवा अन्य संस्थांच्या सहभागाने वातावरण निर्माण करून शहरात नागरी स्वच्छतेचा कार्यक्रम प्रभावीपणे राबविणार, या प्रकल्पासाठी शहरातील नगरपंचायतीच्या मालकीची जागा शोधणे सुरू आहे.- जयश्री चंद्रकांत कापरे, नगराध्यक्षा.

टॅग्स :RaigadरायगडSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान