शहरं
Join us  
Trending Stories
1
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
2
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
3
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
4
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
5
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
6
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
7
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
8
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
9
"बिहारमध्ये बांगलादेशी-रोहिंग्या सापडले, पण पहलगामचे दहशतवादी..."; ओवैसींची सरकारवर टीका
10
भारतीय ग्रँडमास्टर्स समोर 'बुद्धी' चालेना! आर. प्रज्ञानंद याने वर्ल्ड नंबर वन कार्लसनला दिला शह
11
२ राजयोग करणार ९ राशींची भरघोस भरभराट, अडकलेली कामे होतील; हाती पैसा राहील, शुभ वरदान काळ!
12
चिनी विद्यार्थिनीला युक्रेनियन तरुणासोबत शारीरिक संबंध ठेवल्याची शिक्षा, विद्यापीठानं उचललं टोकाचं पाऊल
13
नॅशनल पार्कमधील ‘वनराणी’चे रुपडे पालटले; व्हिस्टाडोमसह नव्या अवतारात सेवेत, कधी सुरू होणार?
14
आरोपीच्या बोलावण्यावरून वारंवार हॉटेलमध्ये का गेलात? पती असताना परपुरुषाशी...! बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलेला सुप्रीम कोर्टानं फटकारलं
15
RCBचा विराट कोहली जबाबदार! बेंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणात कर्नाटक सरकारचा अहवाल सादर
16
वृद्धाला हातपाय बांधून कारमध्ये कोंडले, मग कुटुंब ताजमहाल पाहण्यात रंगले, सुरक्षा रक्षकाने पाहिल्याने अनर्थ टळला   
17
"आमचं शांततापूर्ण जीवन..."; गुहेत राहणाऱ्या रशियन महिलेने फोन चार्ज झाल्यावर पहिलं काय केलं?
18
केस एवढे गळतात की टक्कल पडण्याचीच वाटते भीती; 'हा' घरगुती उपाय ठरेल रामबाण
19
Maharashtra Politics : 'दिनो मोरियाने तोंड उघडले तर अनेकांचा मोरया होईल';एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा
20
2025 Keeway RR300: थेट बीएमडब्लूशी स्पर्धा करणार मोटो वॉल्टची नवी बाईक? दोन लाखांहून कमी किंमतीत लॉन्च!

दीड कोटींचे खाद्यपदार्थ जप्त

By admin | Updated: October 27, 2016 03:27 IST

आरोग्यदायी दिवाळीकरिता रायगड जिल्हा अन्न व औषध प्रशासनाने गेल्या महिनाभरापासून विशेष सतर्कता मोहीम जिल्ह्यात अमलात आणली आहे. गेल्या २५ दिवसांत

अलिबाग : आरोग्यदायी दिवाळीकरिता रायगड जिल्हा अन्न व औषध प्रशासनाने गेल्या महिनाभरापासून विशेष सतर्कता मोहीम जिल्ह्यात अमलात आणली आहे. गेल्या २५ दिवसांत जिल्ह्यात विविध ठिकाणी छापे घालून आतापर्यंत १ कोटी ४४ लाख ६१ हजार २३४ रुपये किमतीचा आरोग्यास अपायकारक मालाचा साठा जप्त केला. याबाबतची माहिती अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त (अन्न) डी.टी.संगत यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे.दिवाळी सणाच्या निमित्ताने घरोघर लाडू, चिवडा, करंजी, चकली असे गोड-तिखट विविध पदार्थ आवर्जून तयार केले जातात. दिवाळीच्या या खाद्यपदार्थ तयार करण्याच्या परंपरेच्या पार्श्वभूमीवर आरोग्यास घातक अशा खाद्यपदार्थांची विक्री छुप्या पद्धतीने बाजारात केली जाते. अशा आरोग्यास घातक पदार्थांमुळे आरोग्यास अपाय झाल्याची उदाहरणे देखील यापूर्वी निष्पन्न झाली आहेत. याच पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाच्या माध्यमातून ही विशेष मोहीम जिल्ह्यात अमलात आणण्यात आली आहे. १ कोटी ४४ लाख ६१ हजार २३४ रुपये किमतीच्या आरोग्यास अपायकारक मालाच्या या साठ्यामध्ये १ कोटी ३६ लाख ७९ हजार २४५ रुपये किमतीचे खाद्यतेल, ६ लाख ३२ हजार ३९९ रुपये किमतीची इन्स्टंट टी पावडर, १ लाख ४५ हजार १२२ रुपये किमतीचे सिट्रीक अ‍ॅसिड, ३ हजार ६८ रुपये किमतीचे खाद्यरंग आणि १ हजार ४०० रुपये किमतीची तयार मिठाई यांचा समावेश असल्याचे संगत यांनी सांगितले.आरोग्यास अपायकारक असण्याची शक्यता विचारात घेवून जिल्ह्यातून विविध खाद्यपदार्थांचे एकूण ६७ नमुने घेण्यात आले असून, ते परीक्षणाकरिता रासायनिक प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.प्रयोगशाळेच्या अहवालात आरोग्यास घातक निष्पन्न होणाऱ्या नमुन्यांच्या अनुषंगाने पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, या ६७ घेतलेल्या नमुन्यांमध्ये सर्वाधिक २५ नमुने हे खाद्य तेलाचे आहेत, तर उर्वरित १० दुधाचे, चार मिठाईचे, एक खव्याचा, दोन मसाल्याचे, ३ बेसन(चणा पिठाचे), चार रवा-मैद्याचे, दोन फ्रूट कलरचे, एक नमकीनचा, तीन फळांचे तर अन्य चार नमुने असल्याचे संगत यांनी सांगितले. दिवाळीच्या काळात जनतेकडून मोठ्या प्रमाणात मिठाई व तयार अन्नपदार्थ यांची खरेदी होवून त्याचे सेवन होत असते. मिठाई व इतर अन्नपदार्थ खरेदी व सेवन करताना नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन संगत यांनी जनतेस केले आहे.शंका आल्यास सत्वर संपर्क साधामिठाई खरेदी करताना कोणत्याही प्रकारची शंका आल्यास सहाय्यक आयुक्त (अन्न) (रायगड-पेण), अन्न व औषध प्रशासन, दूरध्वनी क्रमांक ०२१४३/२५२०८४ व २५२०८५ येथे वा टोल फ्री क्र. १८००२२२३६५ येथे नागरिकांनी संपर्क साधावा, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त (अन्न) डी.टी.संगत यांनी अखेरीस केले आहे.नागरिकांना आवाहन : मिठाई व इतर अन्नपदार्थ खरेदी व सेवन करताना नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त (अन्न) डी.टी.संगत यांनी जनतेस केले आहे.