शहरं
Join us  
Trending Stories
1
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी अटक होणार, आमदारकीही जाणार?
2
राजकीय सूडबुद्धीतून रचलेले प्रकरण, ईडी-सीबीआयचा गैरवापर; 'नॅशनल हेराल्ड'वरुन खरगेंची मोदी-शाहांवर टीका
3
...अन् त्यावेळी राष्ट्रपती बनण्याचा प्रस्ताव वाजपेयींनी नाकारला; 'अटल संस्मरण' पुस्तकात दावा
4
“मातोश्रीबाबत मनात आदर कायम, पण...”; शिंदे गटात प्रवेश करताच बड्या नेत्याने सगळेच सांगितले
5
Video - हार्ट अटॅकमुळे वेदनेने तडफडत होता पती; पत्नीने जोडले हात, पण कोणीच केली नाही मदत
6
शेतकऱ्यांसाठी मोठा अलर्ट! फार्मर आयडीशिवाय पीएम किसानचे पैसे येणार नाहीत; अशी तयार करा ID
7
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दागिने घेताना १०० वेळा विचार करावा लागणार; चांदी २ लाखांच्या पार, सोन्याच्या दरातही मोठी तेजी
8
‘मी काही चुकीचं बोललो नाही, माफी मागण्याचा प्रश्नच नाही..’, पृथ्वीराज चव्हाण ऑपरेशन सिंदूरबाबतच्या वक्तव्यावर ठाम  
9
BMC ELections: मुंबईत अजित पवार पडले एकटे, राष्ट्रवादीची किती जागांवर लढण्याची तयारी, बैठकीत काय झाला निर्णय? 
10
‘ते’ विधान भोवणार, संजय राऊत अडचणीत येणार?; गृहराज्यमंत्री म्हणाले, “…तर गुन्हा दाखल करू”
11
Video - लग्नात राडा! नवरदेवाच्या मित्रांनी नवरीला घातली 'स्नो स्प्रे'ने आंघोळ, मेकअपच गेला वाया
12
क्रेडिट कार्ड वापरताय? मग 'या' ७ चुका टाळा, अन्यथा बसेल आर्थिक फटका!
13
IPL मधील ऑक्शनची संपूर्ण रक्कम घरी नेतात का खेळाडू? पाहा टॅक्स, सॅलरी आणि इनहँड रकमेचा कसा असतो हिशोब
14
‘टायगर स्टेट’समोर गंभीर आव्हान! एका आठवड्यात 6 तर, वर्षभरात 54 वाघांचा मृत्यू; शिकारीचा संशय
15
शाल, गळ्यात रुद्राक्षांची माळ आणि डोक्यावर टिळा, अनंत अंबानींसोबत वनतारामध्ये दिसलं मेसीचं भारतीय रूप
16
कर्माची फळं इथेच भोगली! 'धुरंधर'मधील खनानी होता सगळ्यात खुंखार; भारतात पाठवायचा खोट्या नोटा, मिळाला खतरनाक मृत्यू
17
किडन्या फेल, डायलिसिससाठी पैसेच नाहीत; ७० दिवस 'डिजिटल अरेस्ट' करुन ५३ लाखांचा गंडा
18
Saif Ali Khan : "पॅरेलाइज होऊ शकलो असतो..."; सैफ अली खानने सांगितला हल्ल्याचा थरार, आजही वाटतेय भीती
19
"कायदा यांच्या कोठीवर नाचतोय, जोवर दिल्लीत आणि निवडणूक आयोगात हरामखोरांचं राज्य, तोवर...;" संजय राऊतांची जीभ घसरली!
Daily Top 2Weekly Top 5

गावोगावच्या यात्रांमधून जुन्या आठवणींना मिळतोय उजाळा!

By निखिल म्हात्रे | Updated: May 24, 2024 08:20 IST

जुन्या आठवणींना उजाळा मिळत आहे.

निखिल म्हात्रे, लोकमत न्यूज नेटवर्क, अलिबाग : सध्या ग्रामीण भागातील विविध गावांच्या ग्रामदैवतांच्या यात्रांचा हंगाम सुरू आहे; तसेच शाळांनाही सुट्या लागल्याने चाकरमानी आपल्या मुलांसह आपल्या गावी आले आहेत. निवडणुकीच्या आचारसंहिता काळातही काही गावांत यात्रा भरली. त्यानंतर आता उरलेल्या यात्रा मोठ्या उत्साही वातावरणात होत असून, यातून जुन्या आठवणींना उजाळा मिळत आहे.

गावची यात्रा म्हणजे सर्वांसाठी एकप्रकारे मोठा उत्सव असतो. यामध्ये पै-पाहुणे, जुने सवंगडी यांच्या गाठीभेटी घडून येतात. कोरोना काळात मात्र है सर्व थांबलं गेलं होतं. गतवर्षीपासून पुन्हा मोठ्या स्वरूपात यात्रा होऊ लागल्या. यंदा लोकसभा निवडणूक आचारसंहितेच्या निर्बंधांमुळे मनोरंजन करणाऱ्या मंडळांना काही प्रमाणात फटका बसला, अशा परिस्थितीत ते आपली कला सादर करताना दिसले.

सध्या उन्हाळा कडक जाणवत आहे; मात्र तरीही सुट्या व ग्रामदैवत यात्रांमुळे गावोगावचे वातावरण गर्दीने बहरून जात आहे. यात्रेसाठी आलेले चाकरमानी, नागरिक हे आपल्या ग्रामदैवतांचे दर्शन घेऊन छबिन्यात गुलालाने माखून वाद्याच्या तालावर देहभान हरपून ठेका ठरत मनमुराद आनंद घेत आहेत. दरम्यान, आपल्या कुटुंबासमवेत यात्रेत वस्तूंची खरेदी केली जात आहे. दुसऱ्या दिवशी मनोरंजनात्मक तमाशा मंडळाचा कार्यक्रम पाहण्यासाठी शौकीन येताना दिसतात. वास्तविक पूर्वीच्या तुलनेत ही संख्या सध्या कमी झाल्याचे गावोगावी दिसते. वय कितीही झाले तरी जुन्या मित्रांसोबत यात्रेत फेरफटका मारून कुस्त्यांचाही आस्वाद घेणारी जीवलग मंडळी एकमेकांची गप्पांच्या माध्यमातून विचारपूस करावयास विसरत नाही, हे तितकंच सत्य आहे. तर जेवणावळीसाठी एकमेकांना बोलवून आदरातिथ्य जपले जात आहे.

टॅग्स :alibaugअलिबाग