शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
2
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
3
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
4
महाराष्ट्राच्या १५ हजार एकर महसूल जमिनीसह सीमेवरील १४ गावांवर तेलंगण राज्याचा ताबा !
5
भारताकडे 'रेअर अर्थ'चा ५वा सर्वात मोठा खजिना; तरीही आयातीसाठी चीनवर का अवलंबून? 'ही' आहे खरी अडचण
6
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
7
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
8
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
9
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."
10
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
11
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
12
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
13
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
14
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
15
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
16
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
17
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
18
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
19
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
20
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!

जिल्ह्यात पावसाची संततधार; उकाड्याने हैराण नागरिकांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 23:40 IST

चोवीस तासांत १७२६ मि.मी. पाऊस

अलिबाग : रायगड जिल्ह्याला मंगळवारी पावसाने चांगलेच झोडपले असून २४ तासांत १७२६ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे जिल्ह्यात जागोजागी पाणी साचले तर वारंवार वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागला. तर अलिबाग-पेण रस्त्यावरील पळी येथे महाकाय वृक्ष पडल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. मात्र काही कालावधीतच वाहतूक सुरळीत झाली.

या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचले. भाताची रोपे कुजल्याने दुबार पेरणीचे संकट उभे राहिले होते, मात्र या पावसामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या असून भात पिकाला जीवदान मिळाले आहे. या जोरदार पावसामुळे अलिबाग बस स्थानक, पेण शहरातील विक्रम स्टँड, धरमतर मार्ग, बाजारपेठ, विठ्ठल आळी, कोळीवाडा, महावीर मार्ग, चिंचपाडा, उत्कर्ष नगर आणि इतर सखल भागात पाणीच पाणी साचले होते. त्यामुळे नागरिकांना फार त्रास सहन करावा लागला.

पावसाने दोन दिवसांपूर्वी रायगडातील काही भागामध्ये हजेरी लावली. या पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या रायगडकरांना दिलासा मिळाला. त्याचबरोबर शेतीच्या कामांना वेग आला आहे. मागील आठ दिवसांपासून पडणाºया कडक उन्हामुळे सर्व जण हैराण झाले आहेत. त्यामुळे सर्वांनाच पावसाच्या आगमनाची प्रतीक्षा होती.

गेल्या काही दिवसांपासून अधूनमधून आकाशात काळ्या ढगांची गर्दी होत आहे, परंतु पाऊस काही पडत नव्हता. मात्र दोन दिवसांपूर्वी पावसाने हजेरी लावली.

अलिबाग, महाड, पोलादपूर, उरण, माणगाव, पेण, तळा या भागांत सतत पावसाच्या सरी कोसळत होत्या. पावसासोबत आलेल्या वादळी वाºयांमुळे जिल्ह्याच्या अनेक भागांत वीजवाहिन्या तुटल्याने वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे येथील नागरिकांना अनेक समस्यांनाही सामोरे जावे लागले होते. पावसाच्या आगमनामुळे शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे.

टॅग्स :Rainपाऊस