शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

‘बीडीडीएस’मधील अधिकाऱ्यांना बाप्पा पावला, सहा वर्षांपासूनचा फरक मिळणार

By जमीर काझी | Updated: September 8, 2022 10:16 IST

सातव्या वेतन आयोगानुसार ‘बीडीडीएस’मधील अधिकारी, अंमलदारांना त्यांच्या मूळ वेतनाच्या २५ टक्के, तर वाहन चालकांना मूळ वेतनाच्या १५ टक्के जोखीम भत्ता म्हणून दिला जाणार आहे.

अलिबाग :  घातपाती कृत्य व घडामोडींना प्रतिबंध करण्यासाठी जीव धोक्यात घालून कार्यरत असलेल्या राज्य पोलीस दलाच्या बॉम्ब शोधक व नाशक पथकातील (बीडीडीएस) अधिकारी व अंमलदारांना गणेशोत्सवाच्या  काळात अनोखी भेट मिळाली आहे. गेल्या सहा वर्षांपासून प्रलंबित असलेला त्यांचा प्रोत्साहन  (जोखीम) भत्ता देण्याच्या प्रस्तावाला गृह विभागाने अखेर हिरवा कंदील दाखविला आहे. राज्यातील  ११ पोलीस आयुक्तालये व ३३ जिल्हा अधीक्षक कार्यालयांच्या अखत्यारित या विभागात कार्यरत असलेल्या हजारो पोलिसांना त्याचा लाभ मिळणार आहे. सातव्या वेतन आयोगानुसार ‘बीडीडीएस’मधील अधिकारी, अंमलदारांना त्यांच्या मूळ वेतनाच्या २५ टक्के, तर वाहन चालकांना मूळ वेतनाच्या १५ टक्के जोखीम भत्ता म्हणून दिला जाणार आहे. १ जानेवारी २०१६ पासून पूर्वलक्षी प्रभावाने त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. मुंबईत १२ मार्च १९९३ रोजी झालेल्या साखळी बॉम्बस्फोटानंतर मुंबई पोलीस दलात ‘बीडीडीएस’ची स्थापना केली. त्यांच्यामुळे अनेक  घातपाती कट उधळून लावण्यात पोलिसांना यश आले. अनेक वेळा जीव धोक्यात घालून काम करावे लागते. बॉम्ब किंवा घातपाती वस्तू निकामी करताना काहीवेळा त्यांना गंभीर इजा होण्याचा धोका असतो, त्यामुळे त्यांना मूळ वेतनाच्या ५० टक्के रक्कम प्रोत्साहन भत्ता मिळत होता. सहावा वेतन आयोग लागू झाल्यानंतर वेतनश्रेणीतील बँड पे व ग्रेंड पे यांच्या बेरजेच्या ३० टक्के रक्कम भत्ता दिला जात होता. मात्र, २०१६ पासून लागू झालेल्या सातव्या वेतन आयोगात ‘ग्रेड पे’ ही संकल्पना संपुष्टात आल्याने त्यांना दिला जाणारा जोखीम भत्ता बंद झाला होता. त्याबाबत   पाठपुरावा केला जात होता. मुख्यालयातून  त्याबाबत अखेरचा  सुधारित  प्रस्ताव २९ जुलैला पाठविला. त्याला गृह विभागाने मान्यता दिली आहे.

...तर भत्ता नाही ‘बीडीडीएस’मध्ये कार्यरत असेपर्यंतच संबंधित अधिकारी, अंमलदारांना जोखीम भत्ता मिळेल, बदली होऊन ते मूळ घटकात परत गेल्यास त्यांना हा भत्ता लागू होणार नाही. त्याचप्रमाणे गडचिरोली, अहेरी व गोंदिया या नक्षलग्रस्त जिल्ह्यातील कार्यरत बीडीडीएस पथकाला वेतनाच्या दीड दराने वेतन व महागाई भत्ता मिळत असल्याने त्यांना त्याचा लाभ होणार आहे.

सातवा वेतन आयोगानुसार ‘ग्रेड पे’ संकल्पना बंद झाल्याने या पथकाला जोखीम भत्ता देण्याबाबतच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. त्याबाबतची मागणी लक्षात घेऊन त्यांच्यासाठी नव्याने प्रस्ताव बनवून सरकारकडे पाठविला होता. त्याला मंजुरी मिळाल्याने त्यांना पूर्वलक्षी प्रभावाने भत्ता दिला जाईल.- अनुपकुमार सिंह, अपर महासंचालक, प्रशासन, पोलीस मुख्यालय

टॅग्स :BDDS TeamबीडीडीएसalibaugअलिबागPoliceपोलिस