शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती अन् मविआच्याही एकसंधतेवर प्रश्नचिन्हच; पडघम वाजले, चित्र अस्पष्ट
2
हूल दिलेल्या मान्सूनची पुन्हा चाहूल; राज्यभर ऑरेंज अलर्ट, धो धो बरसणार
3
मराठा आरक्षणावरील सुनावणी १८ जुलैपासून, अंतिम निकालावरच भवितव्य अवलंबून
4
आजचे राशीभविष्य, १२ जून २०२५: आजचा दिवस यशदायी, पदोन्नती संभवते, मित्र भेटतील !
5
होमस्टेमध्ये सापडलेल्या 'त्या' गोष्टीमुळे पोलिसांना सोनमवर आला संशय; पुराव्याने हत्येचे गूढ उकले
6
अमेरिका आंदोलनाने पेटली, १२ राज्यांतील २५ शहरांत लोक उतरले रस्त्यावर; लॉस एंजिलिसमध्ये संचारबंदीनंतर आंदोलन चिरडून टाकण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रयत्न
7
सोनमचा भाऊ म्हणाला, तिला फाशीच द्या, कुटुंबाने नातेसंबंध तोडले; मिळाली पोलिस कोठडी
8
आंतरधर्मीय विवाह; कुटुंबांच्या संमतीने विवाह, तुम्ही आक्षेप कशाला घेता? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
9
काश्मीरसाठी थेट रेल्वे सुरू अन् पर्यटनाची गाडी येतेय रुळावर; १० दिवसांचे बुकिंग फुल्ल
10
‘भारतात मतदार यादी तयार करणे, हे जगात सर्वांत कठीण काम’
11
लोकल लेट का होते? ते शोधा, तरच अपघात कमी होतील, मुंब्रा दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रवासी संघटनांचे मत
12
लातूरमध्ये नागरिकाची सतर्कता; ११२ ला काॅल, अन् मुलगा सापडला !
13
नव्या स्थानकांच्या उभारणीत रेल्वेचा हात आखडताच, नवे ठाणे, चिखलोली, दातीवली, मानस मंदिरसह ३२ स्थानकांचा होता प्रस्ताव
14
लेखी परीक्षा होणार कडेकोट बंदोबस्तात, गैरप्रकार टाळण्यासाठी नवी मुंबई पालिकेचे पोलिस खात्याला पत्र
15
Video: काळजाचा ठोका चुकला! अंबरनाथ स्थानकात लोकल येत होती अन् अंध व्यक्ती थेट ट्रॅकवर कोसळला
16
निगेटिव्ह रिपोर्टिंग केल्याच्या रागातून डॉक्टरांचे बनवले अश्लील व्हिडिओ? कराडात 'एआय' चा घातक वापर
17
अखिलेश यादवांच्या आले मनी...! एक जिल्हा सोडला अन् युपीतील इतर जिल्ह्यांच्या कार्यकारिणी केल्या बरखास्त
18
ट्रम्पनी संधी साधली, अमेरिका आणि चीनमध्ये खतरनाक डील झाली; ट्रम्पच्या घोषणेने अनेकांची झोप उडाली
19
हे तेच मजेशीर केदार यादव...! लालूंचा वाढदिवस होडीवर साजरा करायला गेले आणि चिखलात पडले...
20
महापालिका निवडणूकीच्या पाश्वभूमीवर ओमी कलानींचा पुन्हा शिंदेगटाकडे दोस्तीचा हात?

नियमांचे पालन करून सागराला के ला सोन्याचानारळ अर्पण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2020 02:53 IST

कोळी समाज मूळचा मराठवाड्यातील

रायगड : जिल्ह्यातील नारळी पौर्णिमेच्या उत्सवावर कोरोनाचे सावट पसरल्याचे दिसत आहे. कोळी समाज दरवर्षी नारळी पौर्णिमेला पालखीतून मिरवणूक काढून सागराला नारळ अर्पण करतात. मात्र, या वर्षी त्यांच्या या परंपरेला तडा गेला आहे. पाच जणांनी एकत्र येत सण साजरा केला. सुमारे २५० वर्षांत प्रथमच कोळी समाजाला ही प्रथा मोडावी लागल्याचे बोलले जाते.

रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा हे दोन्ही सण बहुतांश एकत्रितच येतात. या वर्षीही भावा-बहिणीच्या पवित्र नात्याचा रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमेचा सण एकाच दिवशी आले आहेत. कोळी समाज जिल्ह्यात मोठ्या संख्येने आहेत. त्याचा मासेमारी हाच प्रमुख व्यवसाय आहे. जून ते आॅगस्ट महिन्याच्या कालावधीत मासेमारी बंद असते. या कालावधीत पावसाचा हंगाम असल्याने समुद्र खवळलेल्या स्थितीमध्ये असतो, तसेच माशांच्या प्रजननाचाही हाच कालावधी असल्याने मासेमारी केली जात नाही. समुद्रावरच मासेमारी समाजाचा उदरनिर्वाह असल्याने समुद्रावर त्यांची खूपच श्रद्धा आहे. नारळी पौर्णिमेला सागराला नारळ अर्पण करून त्याला नमस्कार केला जातो.

मासेमारी समाजावर अशीच कृपादृष्टी ठेव, अशी आर्त विनवी ते सागराला करतात. ही प्रथा पिढ्यान्पिढ्या चालत आलेली आहे. सागराला नारळ अर्पण करताना पालखीतून नारळाची वाजत-गाजत मिरवणूक काढली जाते. याप्रसंगी सर्वच नागरिक पारंपरिक पद्धतीने नवीन कपडे परिधान करतात. अतिशय भक्तिमय आणि जल्लोषमय वातावरण असते. मात्र, या वर्षी कोरोनामुळे मिरवणूक काढण्यावर सरकार आणि प्रशासनाने निर्बंध घातले आहेत. त्यामुळे कोळी समाजाला मिरवणूक काढता आलेली नाही. जिल्ह्यातील ३३ पालखी मिरवणुका रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे सर्वांचा हिरमोड झाला आहे. अलिबाग येथील कोळी समाजातील पाच व्यक्तींनी मिळून सागराला नारळ अर्पण केला.सागराला नारळ अर्पण करण्याची पिढ्यान्पिढ्याची परंपरा आहे. गेल्या २५० वर्षांत प्रथमच कोरोनामुळे आमच्या या प्रथेत खंड पडला आहे, असे अखिल कोळी समाज परिषदचे अध्यक्ष अ‍ॅड.जे.टी.पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. कोरोना विषाणूचा फैलाव होऊ नये, यासाठी सरकारने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यांचे पालन करण्यात येत आहे. याच कारणांसाठी मिरवणुका रद्द केल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले.

कोळी समाज मूळचा मराठवाड्यातीलकोळी समाज हा मराठवाड्यातून समुद्र किनारी राहण्यासाठी आलेला आहे. त्या ठिकाणी दुष्काळ पडल्याने नदीमध्ये मासेमारी करता येत नव्हती. त्यामुळे नाईलाजाने यावे लागल्याचे आमच्या पूर्वजांकडून ऐकले आहे, असे प्रकाश भगत यांनी ‘लोकमत’ला सांगितले. नारळ समुद्राला देण्याची आमची शेकडो वर्षाची परंपरा आहे. आता मात्र ती मोडीत निघाली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

नारळ फोडाफोडीच्या स्पर्धेला ब्रेकनारळी पौर्णिमेच्या सणानिमित्त नारळ फोडाफोडीच्या स्पर्धा भरवण्यात येतात. तर भाजी मार्केट, नाक्यावर, चौका-चौकात नारळ फोडाफोडी खेळताना दिसून येणाºया तरुणांचा घोळका दिसला नाही. त्यामुळे लाखो रुपयांच्या नारळ खरेदी-विक्रीच्या व्यवसायाही ब्रेक लागला. कोरोनाचे सावट पसरल्याने कमी किमतीमधील नारळही विकत घेता आले नाहीत, असे सुहासिनी साष्टे या गृहिणीने सांगितले. 

टॅग्स :RaigadरायगडRakhiराखी