शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा
2
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, वक्फ कायद्याला अभय; बोर्डात ३ गैर मुस्लीम सदस्य बनू शकतात, परंतु...
3
Acharya Devvrat: आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ 
4
पाकिस्तान फायनलमध्ये हवीय...! प्लीज भारताने पुढला सामना बॉयकॉट करावा; पाकिस्तानी चाहत्यांची मागणी
5
"...तर माझ्या वडिलांचा जीव वाचला असता"; नवजोत सिंग यांच्या मुलाने केला गंभीर आरोप
6
ITR भरण्याची अंतिम मुदत वाढणार? सोशल मीडियावर चर्चा; आयकर विभागाने केलं स्पष्ट
7
"आपण कधी काळी तोडले गेलो, पण तेही परत मिळवू"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे मोठे विधान
8
टीम इंडियाने हस्तांदोलन नाकारल्याने पाकिस्तानचा तीळपापड, पत्रक जारी करत नोंदवला निषेध
9
बाबाचं लक्ष फोनमध्ये, आई चेंजिंगरूममध्ये; स्विमिंग पूलमध्ये पडलेल्या ४ वर्षांच्या मुलीकडे कुणी पाहिलच नाही अन्...
10
Ameesha Patel : "९० टक्के सेलिब्रिटी पैसे देऊन..."; अमिषा पटेलने उलगडलं बॉलिवूड इंडस्ट्रीचं गुपित, सांगितलं 'ते' सत्य
11
शेवटी आईच ती! स्वत:ला झोकून दिले आणि लेकीला मगरीच्या जबड्यातून सोडवले, पण... 
12
४ महिन्यापूर्वी लग्न झालेल्या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; हुंड्यासाठी छळ करून केली हत्या? 
13
यह नया भारत है..., टीम इंडियाने पाकिस्तानला नमवल्यानंतर भाजपाने विरोधकांना डिवचले  
14
२२ सप्टेंबरपासून टीव्ही, फ्रीज, एसीसह इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त होणार; किती रुपयांची बचत होईल?
15
Cloudburst In Maharashtra: अहिल्यानगर जिल्ह्यात ढगफुटी, अनेक गावांना फटका; छोटा तलाव फुटला
16
कहानी में ट्विस्ट! नवऱ्याने बायकोचं बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं, आता 'त्याचं' भलतंच सत्य समोर आलं
17
सचिनला तुम्ही सीनिअर आहात?, मिश्कील प्रश्नावर दिलीप प्रभावळकरांना आलं हसू; मग म्हणाले...
18
दबावाखाली बाजार: ऑक्टोबर ‘ब्रेकआउट’ देईल की ‘ब्रेक’ घ्यावा लागेल?
19
झारखंडमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई; तीन माओवादी ठार, एकावर एक कोटी रुपयांचे बक्षीस
20
अहिल्यानगरमध्ये भूकंपाचे धक्के! बोटा, घारगाव परिसर हादरला; लोकांमध्ये भीतीचे वातावरण

जंजिरा किल्ल्यावरील वाहतुकीत अडथळा; वेगाचे वारे सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2019 22:54 IST

खराब हवामानामुळे शिडाची बोट चालवणे अवघड; पर्यटकांचा हिरमोड

संजय करडे 

मुरुड : ऐतिहासिक जंजिरा किल्ला पाहण्यासाठी शनिवार, रविवार या सुट्ट्यांचा योग साधून असंख्य पर्यटक येत आहेत, परंतु त्यांना हा किल्ला पहाता येत नाही. हवामानाचा फटका शेकडो पर्यटकांना बसला असून सध्या किल्ल्याकडे जाणारी वाहतूकमोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली आहे.

१ सप्टेंबरपासून किल्ल्यावरील वाहतूक सुरू करण्यात आली, परंतु याच दरम्यान हवामान बदलामुळे जोरदार पाऊस व वारे मोठ्या गतीने वाहत असल्याने किल्ल्याच्या पायथ्याशी बोट हेलकावे घेत असल्याने किल्ल्यात उतरण्यास मोठी अडचण होत असल्याचे दिसून येत आहे; त्यामुळे येथील वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. त्यामुळे पर्यटकांचा हिरमोड होत आहे. शनिवार, रविवारी पर्यटक येतात, परंतु हवामान अजूनही खराबच असल्याने किल्ल्यावरील वाहतूक पाहिजे तशी सुरू झाली नाही. शिडाच्या बोटीचा व्यवसाय करणारे असंख्य लोक हवामान सुरळीत होण्याची वाट पहात आहेत. ज्याप्रमाणे खोल समुद्रातून सर्व मासेमारी होड्या वेगवान वाऱ्यामुळे किनाºयाला आलेल्या आहेत, त्याचप्रमाणे किल्ल्यातील शिडाच्या होड्या सुद्धा किनाºयाला लागलेल्या आढळून येत आहेत.

मुरुड तालुक्यात पावसाळी हवामान कायम असून पावसाने थोडी विश्रांती घेतली असली तरी वाºयाचा वेग काही कमी झालेला नाही. सध्या किल्ल्यात जाण्यासाठी राजपुरी, खोरा बंदर येथे वाहतूक होत नसल्याने या प्रवासी जेट्ट्यांवर शुकशुकाट आहे.शिडांच्या बोटीची वाहतूक १ सप्टेंबरपासून सुरू झाली असली तरी २ तारखेपासूनच हवामानात मोठ्या प्रमाणावर बदल झाल्याने जंजिरा किल्ल्यावरील वाहतूक बंदच ठेवण्यात आली आहे. हवामानाचा अंदाज घेऊनच ही वाहतूक होणे गरजेचे आहे. यासाठी मुंबई येथील मुख्य कार्यालयातून सर्व बोटधारकांना हवामानाचा अंदाज घेऊनच वाहतूक करा अशी ताकीद देण्यात आली असून ज्यावेळी हवामान सुरळीत होईल त्यावेळी सर्व वाहतूक सुरळीत होईल. - यशोधन कुलकर्णी, सहायक बंदर निरीक्षक, महाराष्ट्र मेरीटाइम बोर्ड