शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
3
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
4
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
5
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
6
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
7
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
8
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
9
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
10
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
11
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
12
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
13
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
14
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
15
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
16
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
17
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
18
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
19
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
20
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस

‘नोटाबंदी’ मोठ्या प्रक्रियेची सुरुवात - बोकील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 00:26 IST

भारतात गेल्या वर्षी झालेल्या नोटाबंदीने जरी सामान्य लोकांना धक्का बसला असला तरी यामधून एका मोठ्या प्रक्रियेची सुरुवात होत आहे, असे मत अर्थतज्ज्ञ अनिल बोकील

मुंबई : भारतात गेल्या वर्षी झालेल्या नोटाबंदीने जरी सामान्य लोकांना धक्का बसला असला तरी यामधून एका मोठ्या प्रक्रियेची सुरुवात होत आहे, असे मत अर्थतज्ज्ञ अनिल बोकील यांनी व्यक्त केले. बाजारातील पैसा हा सार्वजनिक होण्यासाठीसुद्धा नोटाबंदी गरजेची होती, असेही ते म्हणाले.विद्यार्थी उत्कर्ष मंडळाने लालबाग येथे आयोजित केलेल्या हीरकमहोत्सवी विवेकानंद व्याख्यानमालेत ‘अर्थव्यवस्थेसमोरील आव्हाने आणि सामान्य माणूस’ या विषयावर नुकतेच अनिल बोकील बोलत होते. नोटाबंदीची प्रमुख चार कारणे आहेत.निसर्गाशी तुटलेले अर्थशास्त्र, पैसा हे विनिमयाचे माध्यम, चलनात असलेल्या मोठ्या किमतीच्या नोटा त्यामुळे भ्रष्टाचाराला वाव आणि मानसिकतेबरोबर चुकीची अर्थव्यवस्था होय. भविष्यात डिजिटल अर्थव्यवस्था असणार असूनत्यासाठी तरुणांनी पुढे यायला हवे, असे आवाहन अनिल बोकील यांनी केले.भारताकडे शाश्वत तत्त्वज्ञान असल्याने जगाच्या अर्थव्यवस्थेमध्ये भारताची भूमिका महत्त्वाची आहे. जगण्यापुरते असलेले अर्थशास्त्र सर्वांना माहीत आहे. अर्थशास्त्र हे पैशाचे शास्त्र नसून संसाधनाचे शास्त्र आहे. तसेच पैसा ही सार्वजनिक मालमत्ता असल्याने तो शरीरातील रक्तासारखा चलनात फिरता राहिला पाहिजे, असे बोकील म्हणाले.अर्थक्रांतीची मांडणी करताना त्यांनी भारताचा जागतिक आनंद अंकामधील रँक वाढविण्यासाठी सध्याच्या ८ तासांच्या नोकरीऐवजी ६ तासांच्या दोन शिफ्टमध्ये काम करावे. त्यामुळे नोकरीतील ताणतणाव कमी होतील तसेच तरुणांना नोकरीच्या संधी उपलब्ध होतील आणि बेरोजगारी काही प्रमाणात कमी होण्यास मदत होईल, असेही बोकील म्हणाले.