शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
3
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
4
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
5
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
6
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
7
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
8
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
9
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
10
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
11
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
12
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
13
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
14
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
15
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
16
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
17
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
18
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
19
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
20
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा

‘नोटाबंदी’ मोठ्या प्रक्रियेची सुरुवात - बोकील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 00:26 IST

भारतात गेल्या वर्षी झालेल्या नोटाबंदीने जरी सामान्य लोकांना धक्का बसला असला तरी यामधून एका मोठ्या प्रक्रियेची सुरुवात होत आहे, असे मत अर्थतज्ज्ञ अनिल बोकील

मुंबई : भारतात गेल्या वर्षी झालेल्या नोटाबंदीने जरी सामान्य लोकांना धक्का बसला असला तरी यामधून एका मोठ्या प्रक्रियेची सुरुवात होत आहे, असे मत अर्थतज्ज्ञ अनिल बोकील यांनी व्यक्त केले. बाजारातील पैसा हा सार्वजनिक होण्यासाठीसुद्धा नोटाबंदी गरजेची होती, असेही ते म्हणाले.विद्यार्थी उत्कर्ष मंडळाने लालबाग येथे आयोजित केलेल्या हीरकमहोत्सवी विवेकानंद व्याख्यानमालेत ‘अर्थव्यवस्थेसमोरील आव्हाने आणि सामान्य माणूस’ या विषयावर नुकतेच अनिल बोकील बोलत होते. नोटाबंदीची प्रमुख चार कारणे आहेत.निसर्गाशी तुटलेले अर्थशास्त्र, पैसा हे विनिमयाचे माध्यम, चलनात असलेल्या मोठ्या किमतीच्या नोटा त्यामुळे भ्रष्टाचाराला वाव आणि मानसिकतेबरोबर चुकीची अर्थव्यवस्था होय. भविष्यात डिजिटल अर्थव्यवस्था असणार असूनत्यासाठी तरुणांनी पुढे यायला हवे, असे आवाहन अनिल बोकील यांनी केले.भारताकडे शाश्वत तत्त्वज्ञान असल्याने जगाच्या अर्थव्यवस्थेमध्ये भारताची भूमिका महत्त्वाची आहे. जगण्यापुरते असलेले अर्थशास्त्र सर्वांना माहीत आहे. अर्थशास्त्र हे पैशाचे शास्त्र नसून संसाधनाचे शास्त्र आहे. तसेच पैसा ही सार्वजनिक मालमत्ता असल्याने तो शरीरातील रक्तासारखा चलनात फिरता राहिला पाहिजे, असे बोकील म्हणाले.अर्थक्रांतीची मांडणी करताना त्यांनी भारताचा जागतिक आनंद अंकामधील रँक वाढविण्यासाठी सध्याच्या ८ तासांच्या नोकरीऐवजी ६ तासांच्या दोन शिफ्टमध्ये काम करावे. त्यामुळे नोकरीतील ताणतणाव कमी होतील तसेच तरुणांना नोकरीच्या संधी उपलब्ध होतील आणि बेरोजगारी काही प्रमाणात कमी होण्यास मदत होईल, असेही बोकील म्हणाले.