शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
3
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
4
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
5
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
6
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
7
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
8
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
9
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
10
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
11
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
12
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
13
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
14
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
15
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
16
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
17
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
18
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
19
शंकर महादेवन यांनी खरेदी केलं चलतं-फिरतं लक्झरीअस हॉटेल! 'मसाज सीट'सह मिळतात या खास ५ स्टार सुविधा
20
अर्ध्या तासाच्या अंतराने कोसळले अमेरिकेचे हेलिकॉप्टर आणि विमान, दक्षिण चीन समुद्रात नेमकं काय घडलं?

‘नोटाबंदी’ मोठ्या प्रक्रियेची सुरुवात - बोकील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 00:26 IST

भारतात गेल्या वर्षी झालेल्या नोटाबंदीने जरी सामान्य लोकांना धक्का बसला असला तरी यामधून एका मोठ्या प्रक्रियेची सुरुवात होत आहे, असे मत अर्थतज्ज्ञ अनिल बोकील

मुंबई : भारतात गेल्या वर्षी झालेल्या नोटाबंदीने जरी सामान्य लोकांना धक्का बसला असला तरी यामधून एका मोठ्या प्रक्रियेची सुरुवात होत आहे, असे मत अर्थतज्ज्ञ अनिल बोकील यांनी व्यक्त केले. बाजारातील पैसा हा सार्वजनिक होण्यासाठीसुद्धा नोटाबंदी गरजेची होती, असेही ते म्हणाले.विद्यार्थी उत्कर्ष मंडळाने लालबाग येथे आयोजित केलेल्या हीरकमहोत्सवी विवेकानंद व्याख्यानमालेत ‘अर्थव्यवस्थेसमोरील आव्हाने आणि सामान्य माणूस’ या विषयावर नुकतेच अनिल बोकील बोलत होते. नोटाबंदीची प्रमुख चार कारणे आहेत.निसर्गाशी तुटलेले अर्थशास्त्र, पैसा हे विनिमयाचे माध्यम, चलनात असलेल्या मोठ्या किमतीच्या नोटा त्यामुळे भ्रष्टाचाराला वाव आणि मानसिकतेबरोबर चुकीची अर्थव्यवस्था होय. भविष्यात डिजिटल अर्थव्यवस्था असणार असूनत्यासाठी तरुणांनी पुढे यायला हवे, असे आवाहन अनिल बोकील यांनी केले.भारताकडे शाश्वत तत्त्वज्ञान असल्याने जगाच्या अर्थव्यवस्थेमध्ये भारताची भूमिका महत्त्वाची आहे. जगण्यापुरते असलेले अर्थशास्त्र सर्वांना माहीत आहे. अर्थशास्त्र हे पैशाचे शास्त्र नसून संसाधनाचे शास्त्र आहे. तसेच पैसा ही सार्वजनिक मालमत्ता असल्याने तो शरीरातील रक्तासारखा चलनात फिरता राहिला पाहिजे, असे बोकील म्हणाले.अर्थक्रांतीची मांडणी करताना त्यांनी भारताचा जागतिक आनंद अंकामधील रँक वाढविण्यासाठी सध्याच्या ८ तासांच्या नोकरीऐवजी ६ तासांच्या दोन शिफ्टमध्ये काम करावे. त्यामुळे नोकरीतील ताणतणाव कमी होतील तसेच तरुणांना नोकरीच्या संधी उपलब्ध होतील आणि बेरोजगारी काही प्रमाणात कमी होण्यास मदत होईल, असेही बोकील म्हणाले.