शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

अंगणवाड्यांमध्ये बालके पोषण आहाराविना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 02:48 IST

येथे बालकांसाठी शासनाच्या योजनेतून अंगणवाड्या चालविल्या जातात, परंतु त्या ठिकाणी येणाºया बालकांना पोषण आहार मात्र शासन देत नाही.

अजय कदम ।माथेरान : येथे बालकांसाठी शासनाच्या योजनेतून अंगणवाड्या चालविल्या जातात, परंतु त्या ठिकाणी येणाºया बालकांना पोषण आहार मात्र शासन देत नाही. अशी परिस्थिती माथेरानमध्ये निर्माण झाली असून अंगणवाडीमध्ये येणा-या बालकांना पोषण आहार पोहचविण्याची जबाबदारी असलेला शहरी एकात्मिक बालविकास विभाग उदासीन असल्याचे दिसून येत आहे.२००९ मध्ये माथेरानमध्ये अंगणवाडी सुरू केली.शासनाच्या शहरी भागासाठी असलेल्या एकात्मिक बालविकास विभागाच्या माध्यमातून चालविण्यात येणाºया तीन अंगणवाड्यांमध्ये माथेरानमधील ४५ बालके येत आहेत. त्यांना शासनाच्या एकात्मिक बालविकास विभागाकडून पोषण आहार दिला जात होता. शासनाच्या बदलत्या धोरणामुळे माथेरान या पर्यटनस्थळी असलेल्या अंगणवाडी केंद्रावर बालकांना मागील जानेवारी महिन्यापासून पोषण आहार पुरविला जात नाही. त्यामुळे अंगणवाडीतील बालकांची संख्या रोडावली आहे. माथेरानमध्ये वाल्मीकीनगर, मुस्लीम मोहल्ला आणि वन ट्री हिल या तीन नावाने अंगणवाडी केंद्रे चालविली जात आहेत. त्या प्रत्येक अंगणवाडी शाळेत साधारण १५-१८ बालके येत असून शून्य ते चार वयोगटातील बालकांची संख्या त्यात अधिक आहे. त्या सर्व बालकांवर लक्ष ठेवण्यासाठी २००९ पासून तीन सेविका आणि तीन मदतनीस यांची नियुक्ती केली होती, मात्र आज घडीला मदतनिसाचे एक पद रिक्त आहे.अंगणवाडीमध्ये पोषण आहार मिळत नसल्याने बालकांना घरातून खाऊ घेऊन यावे लागते.त्यामुळे अंगणवाडीमध्ये येणाºया बालकांच्या संख्येत घट झाली आहे. शासन प्रत्येक बालकाला दरडोई ४ रु पये ९२ पैसे असे अनुदान बचत गटांना देते, त्या बदल्यात खाऊ शिजवून देण्याचे काम बचत गटांनी करावे अशी संकल्पना आहे. माथेरानमधील तिन्ही अंगणवाडी शाळेत येणाºया बालकांना जानेवारी २०१७ पासून पोषण आहार दिला जात नाही. त्याची माहिती घेतली असता बचत गटांना प्रत्येक बालकासाठी दिले जाणारे अनुदान हे बाजारभाव विचार करता न परवडणारे आहे. त्यात खिचडी शिजवून देण्यासाठी आणि अन्य खाऊ उकडून देण्यासाठी लागणारा गॅस यांचा ताळमेळ बसत नाही. त्यात माथेरानसारख्या ठिकाणी आर्थिक गणिते जुळविताना अडचणी येते.