शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

नेरळ-कळंब रस्ता अपूर्णच, पहिल्याच पावसात खड्ड्यांचे साम्राज्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2019 00:36 IST

नेरळ-कळंब हा महत्त्वाचा जिल्हा मार्ग असून, पहिल्याच पावसात हा रस्ता अनेक ठिकाणी धोकादायक बनला आहे.

नेरळ : नेरळ-कळंब रस्ता पहिल्याच पावसात धोकादायक बनला आहे. सुमारे तीन कोटी रुपये खर्चूनही हा रस्ता साई मंदिर परिसरात अपूर्णच ठेवण्यात आल्याने पहिल्याच पावसात या ठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. अनेक ठिकाणी डबकी साचली आहेत. पाण्याचा निचरा होण्यासाठी उपाययोजना करण्यात न आल्याने पावसाचे पाणी रस्त्यावरून वाहत असल्याने अनेक ठिकाणी रस्ता धोकादायक बनला असून, प्रवासी आणि चालकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.नेरळ-कळंब हा महत्त्वाचा जिल्हा मार्ग असून, पहिल्याच पावसात हा रस्ता अनेक ठिकाणी धोकादायक बनला आहे. बांधकाम विभागाचे अधिकारी या रस्त्याकडे दुर्लक्ष करत असल्याने या रस्त्याची पुरती वाट लागल्याचे परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे. पोशीर गावाजवळ एका खासगी गृहप्रकल्पासाठी विद्युत केबल टाकण्यासाठी साइडपट्टी खोदल्याने येथून प्रवास धोकादायक बनला आहे. या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे सूचना फलक लावण्यात आलेले नाही. रात्रीच्या वेळी येथे मोठा अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे, तसेच हे खोदकाम करताना नव्याने केलेला रस्ता उखडला आहे.अनेक वर्षे हा रस्ता धोकादायक होता. यंदा काही भागात नव्याने रस्ता तयार करण्यात आला असला तरी काही ठिकाणी अपूर्णावस्थेत ठेवण्यात आला आहे. ज्या ठिकाणी डांबरीकरण करण्यात आले आहे, त्या ठिकाणी साइडपट्टी खोदण्यात आल्या आहेत.धामोते परिसरात विकासकांकडून मोठ्या प्रमाणात बिल्डिंग उभारण्याचे काम सुरू आहे; परंतु पाण्याचा निचरा होण्यासाठी कोणत्याही प्रकारची व्यवस्था केली नसल्याने यंदाही रस्ता पाण्याखाली आला आहे. धोमोते भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे, पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास संपूर्ण परिसर जलमय होऊन अनेक गावांचा संपर्क तुटण्याची शक्यता नाकारता येत नाही.पोशीर गावाजवळ साइडपट्टी खोदल्याने संबंधित कंपनी विरोधात कारवाई करण्यात यावी, असे कार्यकारी अभियंता यांना लेखी स्वरूपात कळविले आहे. त्यांनी खोदलेली साइडपट्टी लवकरात लवकर बुजवावी, अन्यथा अपघात झाल्यास त्यांनाच जबाबदार धरण्यात येईल. तसेच नेरळ-कळंब रस्त्याचे काम एका ठेकेदार कंपनीला दिले असून त्यांनी हे काम साईमंदिर ते नेरळ रेल्वे गेटपर्यंत पूर्ण केले नसल्याने पहिल्याच पावसात खड्डे तयार झाले असून त्यांना नोटीस देऊन खड्डे भरण्यास सांगितले जाईल.- अजयकुमार सर्वगौड,उप अभियंता,सार्वजनिक बांधकाम विभाग

टॅग्स :Raigadरायगड