शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर दोन्ही उपमुख्यमंत्री साधे मंत्री म्हणून फिरले पाहिजेत"; ठाकरेंचं नियमावर बोट, सरकारला सुनावले खडेबोल
2
"मी आरशात बघतो, पण तुम्ही शेतकऱ्यांकडे तरी बघा"; CM फडणवीसांच्या टीकेला उद्धव ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
बँकांत तब्बल १७६ कोटी रुपये पडून, तुमचे तर नाहीत ना? मालकच मिळेनात, १० वर्षांपासून ग्राहक फिरकले नाहीत, पैसे नेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
4
बिहारमध्ये काँग्रेसचं टेन्शन वाढलं...! 57 पेक्षा जास्त जागा द्यायला लालूंचा नकार; आता काय होणार?
5
VIDEO: रोहित शर्मा सुरक्षा रक्षकावर भडकला; मुंबईच्या शिवाजी पार्कवर नेमकं काय घडलं? पाहा...
6
"३१ हजार कोटींच्या पॅकेजचे समर्थन करायला तयार, पण माझी एक अट", उद्धव ठाकरेंची राज्य सरकारकडे मोठी मागणी
7
'मिस्टर मोदी, तुम्ही दुबळे आहात...', अफगाणी परराष्ट्र मंत्र्यांच्या पत्रकार परिषदेवरुन राहुल गांधींचा हल्लाबोल
8
गजकेसरीसह ३ राजयोगांचा वरदान काळ: ९ राशींचे मंगल, हाती पैसा खेळेल; सुख-समृद्धी, शुभ-भरभराट!
9
FD मध्ये गुंतवणूक करायचीय? हे आहेत 10 बेस्ट बँक ऑप्शन्स, येथे मिळतोय जवळपास 9% परतावा; जाणून घ्या सविस्तर
10
Diwali 2025: रांगोळीत दडलंय लक्ष्मी कृपेचं गूढ, एकदा समजून घ्याल तर स्टिकर वापरणार नाही!
11
राहुल गांधींना नोबेल मिळण्यासाठी मोर्चेंबांधणी? काँग्रेसने केली मारिया मचाडो यांच्याशी तुलना
12
"बोलायचं स्वदेशीचं आणि घडी वापरायची विदेशी"; CM योगी आदित्यनाथांनी खासदार रवि किशन यांना भरसभेत सुनावले
13
Shubman Gill Record : टीम इंडियातील 'प्रिन्स'ची कमाल; क्रिकेटच्या मैदानातील 'डॉन'चा महारेकॉर्ड मोडला
14
"लोकसभा निवडणुकीत भुमरेंनी माझ्या विरोधात १२० कोटी वाटले, शेतकऱ्यांना दारू पाजून...!" खैरेंचा गंभीर आरोप
15
जे पेरले तेच उगवले! पाकिस्तानी लष्कराचा लाड त्यांच्याच अंगलट आला; 'तहरीक-ए-लब्बैक' संघटनेने डोकेदुखी वाढवली
16
सचिन तेंडुलकरची साद, माणिकराव कोकाटेंचा तत्काळ प्रतिसाद; खेळाडूंसाठी घेतला मोठा निर्णय
17
E20 पेट्रोलबाबतचा संभ्रम संपला! बाजारात कोणत्या पेट्रोलमध्ये इथेनॉल आहे आणि कोणत्या नाही...
18
झाड नाही, 'काळजाचा तुकडा' तोडला! २० वर्षे जपलेल्या वृक्षासाठी आजींचा आक्रोश; व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल
19
राज ठाकरेंचा वरदहस्त दूर अन् वैभव खेडेकरांचे ग्रहच फिरले? भाजप प्रवेश रखडला, आता दुसरीकडे...
20
अनिल अंबानी ग्रुपच्या CFO ला अटक; बनावट बँक हमी प्रकरणात ED ची मोठी कारवाई

नेरळ-कळंब रस्ता अपूर्णच, पहिल्याच पावसात खड्ड्यांचे साम्राज्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2019 00:36 IST

नेरळ-कळंब हा महत्त्वाचा जिल्हा मार्ग असून, पहिल्याच पावसात हा रस्ता अनेक ठिकाणी धोकादायक बनला आहे.

नेरळ : नेरळ-कळंब रस्ता पहिल्याच पावसात धोकादायक बनला आहे. सुमारे तीन कोटी रुपये खर्चूनही हा रस्ता साई मंदिर परिसरात अपूर्णच ठेवण्यात आल्याने पहिल्याच पावसात या ठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. अनेक ठिकाणी डबकी साचली आहेत. पाण्याचा निचरा होण्यासाठी उपाययोजना करण्यात न आल्याने पावसाचे पाणी रस्त्यावरून वाहत असल्याने अनेक ठिकाणी रस्ता धोकादायक बनला असून, प्रवासी आणि चालकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.नेरळ-कळंब हा महत्त्वाचा जिल्हा मार्ग असून, पहिल्याच पावसात हा रस्ता अनेक ठिकाणी धोकादायक बनला आहे. बांधकाम विभागाचे अधिकारी या रस्त्याकडे दुर्लक्ष करत असल्याने या रस्त्याची पुरती वाट लागल्याचे परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे. पोशीर गावाजवळ एका खासगी गृहप्रकल्पासाठी विद्युत केबल टाकण्यासाठी साइडपट्टी खोदल्याने येथून प्रवास धोकादायक बनला आहे. या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे सूचना फलक लावण्यात आलेले नाही. रात्रीच्या वेळी येथे मोठा अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे, तसेच हे खोदकाम करताना नव्याने केलेला रस्ता उखडला आहे.अनेक वर्षे हा रस्ता धोकादायक होता. यंदा काही भागात नव्याने रस्ता तयार करण्यात आला असला तरी काही ठिकाणी अपूर्णावस्थेत ठेवण्यात आला आहे. ज्या ठिकाणी डांबरीकरण करण्यात आले आहे, त्या ठिकाणी साइडपट्टी खोदण्यात आल्या आहेत.धामोते परिसरात विकासकांकडून मोठ्या प्रमाणात बिल्डिंग उभारण्याचे काम सुरू आहे; परंतु पाण्याचा निचरा होण्यासाठी कोणत्याही प्रकारची व्यवस्था केली नसल्याने यंदाही रस्ता पाण्याखाली आला आहे. धोमोते भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे, पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास संपूर्ण परिसर जलमय होऊन अनेक गावांचा संपर्क तुटण्याची शक्यता नाकारता येत नाही.पोशीर गावाजवळ साइडपट्टी खोदल्याने संबंधित कंपनी विरोधात कारवाई करण्यात यावी, असे कार्यकारी अभियंता यांना लेखी स्वरूपात कळविले आहे. त्यांनी खोदलेली साइडपट्टी लवकरात लवकर बुजवावी, अन्यथा अपघात झाल्यास त्यांनाच जबाबदार धरण्यात येईल. तसेच नेरळ-कळंब रस्त्याचे काम एका ठेकेदार कंपनीला दिले असून त्यांनी हे काम साईमंदिर ते नेरळ रेल्वे गेटपर्यंत पूर्ण केले नसल्याने पहिल्याच पावसात खड्डे तयार झाले असून त्यांना नोटीस देऊन खड्डे भरण्यास सांगितले जाईल.- अजयकुमार सर्वगौड,उप अभियंता,सार्वजनिक बांधकाम विभाग

टॅग्स :Raigadरायगड