शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

पारंपरिक नारळ पाडेकऱ्यांची संख्या घटली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2020 00:31 IST

वर्षभर चांगले उत्पन्न देणारे म्हणून नारळाच्या झाडाकडे पाहिले जाते. कोकणचा परिसर समृद्ध अशा नारळाच्या झाडांनी व्यापला आहे.

आभय आपटेरेवदंडा : वर्षभर चांगले उत्पन्न देणारे म्हणून नारळाच्या झाडाकडे पाहिले जाते. कोकणचा परिसर समृद्ध अशा नारळाच्या झाडांनी व्यापला आहे. प्रत्यक्षात मात्र नारळाला लागणारे उंदीर, किडीचा प्रादुर्भाव यासोबतच नारळ पाडेकऱ्यांची घटत चाललेली संख्या याचा परिणाम येथील बागायती उत्पन्नाला बसत आहे. अलिबाग तालुक्यातील चौल, आक्षी, नागाव व रेवदंडा या बागायती भागात नारळाच्या झाडावरून नारळ पाडण्यासाठी पाडेकरी वेळेवर उपलब्ध होत नसल्याने बागायतदार हवालदिल झाले आहेत.कोकण म्हटले की, नारळ-सुपारीच्या बागा. केरळ राज्याप्रमाणे महत्त्वाचे नारळ उत्पादन देणारा कोकण प्रांत हा समृद्ध म्हणूनच गणला जायचा. या नारळाच्या झाडाच्या काथ्यापासून दोºया, करवंट्यापासून जळाऊ लाकूड, झाडांपासून शाकारणीसाठी लागणारे साहित्य बनविले जात असल्याने या वृक्षाला कल्पवृक्ष असेच मानले जायचे. सोबतच नारळ हे उत्पन्न देणारे फळ यामुळे सर्वाधिक लागवड या भागातच झाली. मात्र, उंचच उंच वाढणारे हे नारळाचे झाड सध्या साºयांच्याच समस्येचा विषय बनला आहे. कारण या झाडावर चढण्यासाठी पूर्वी सहजतेने मिळणारे पाडेकरी आता उपलब्ध होत नसल्याने झाडावरचे नारळ काढायचे तरी कसे? हा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे.सर्वसाधारपणे मागील दहा वर्षांचा विचार करता पाडेकरांचा जो समूह होता, त्यातील (अनेक सभासद) पाडेकरी हयात नाहीत. तर काहींना आता तब्येत साथ देत नसल्याने संख्या कमी झाली आहे. रेवस ते मुरुडपर्यंत अनेक नवीन बागायती तयार झाल्या आहेत. मात्र, पाडेकरी उपलब्ध होत नाहीत ही समस्या आहे. पाडेकºयांचे काम शिकवणाºया संस्था असल्या तरी प्रशिक्षण घेतल्यावर पाडेकरी तयार झालेले दिसत नाहीत.>पाडेकरी पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत; पण उपलब्ध पाडेकºयांपैकी बहुतेक त्यांच्या मर्यादेमध्ये काम करत नाहीत. ३० दिवसांचे काम असेल तर तो पाडेकरी दहा दिवस भरतो.- रूपेश बुरांड, बागायतदार>सुमारे ४५ वर्षे नारळ पाडेकरी म्हणून काम करत असून, सर्वत्र शिक्षणाच्या झालेल्या सोयीमुळे या कामाकडे नवीन पिढी वळायला तयार नाही. काम मेहनतीचे असल्याने शासन दरबारी याची विम्याच्या संरक्षणसाठी दखल घेणे गरजेचे आहे. नारळ पाडल्यावर दोन माडांचे नारळ किंवा एका माडाप्रमाणे पैसे अशी मजुरी घेतली जाते.- परशुराम नाईक, नारळ पाडेकरी, चौल-रामेश्वर>आता ३० ते ४० पाडेकरी शिल्लक असून, मागील दहा वर्षांचा विचार करता ही संख्या चांगलीच घटत आहे. नारळ पाडताना अपघात झाल्यास शासकीय पातळीवर विम्याचे संरक्षण मिळाले तर नवीन पिढी या जोखमीच्या व्यवसायात वळतील.- राजेश मुकादम, बागायतदार, रेवदंडा