शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
2
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
3
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
4
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
5
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
6
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
7
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
8
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
9
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
10
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
11
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
12
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
13
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
14
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
15
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
16
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
17
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
18
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
19
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
20
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?

पारंपरिक नारळ पाडेकऱ्यांची संख्या घटली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2020 00:31 IST

वर्षभर चांगले उत्पन्न देणारे म्हणून नारळाच्या झाडाकडे पाहिले जाते. कोकणचा परिसर समृद्ध अशा नारळाच्या झाडांनी व्यापला आहे.

आभय आपटेरेवदंडा : वर्षभर चांगले उत्पन्न देणारे म्हणून नारळाच्या झाडाकडे पाहिले जाते. कोकणचा परिसर समृद्ध अशा नारळाच्या झाडांनी व्यापला आहे. प्रत्यक्षात मात्र नारळाला लागणारे उंदीर, किडीचा प्रादुर्भाव यासोबतच नारळ पाडेकऱ्यांची घटत चाललेली संख्या याचा परिणाम येथील बागायती उत्पन्नाला बसत आहे. अलिबाग तालुक्यातील चौल, आक्षी, नागाव व रेवदंडा या बागायती भागात नारळाच्या झाडावरून नारळ पाडण्यासाठी पाडेकरी वेळेवर उपलब्ध होत नसल्याने बागायतदार हवालदिल झाले आहेत.कोकण म्हटले की, नारळ-सुपारीच्या बागा. केरळ राज्याप्रमाणे महत्त्वाचे नारळ उत्पादन देणारा कोकण प्रांत हा समृद्ध म्हणूनच गणला जायचा. या नारळाच्या झाडाच्या काथ्यापासून दोºया, करवंट्यापासून जळाऊ लाकूड, झाडांपासून शाकारणीसाठी लागणारे साहित्य बनविले जात असल्याने या वृक्षाला कल्पवृक्ष असेच मानले जायचे. सोबतच नारळ हे उत्पन्न देणारे फळ यामुळे सर्वाधिक लागवड या भागातच झाली. मात्र, उंचच उंच वाढणारे हे नारळाचे झाड सध्या साºयांच्याच समस्येचा विषय बनला आहे. कारण या झाडावर चढण्यासाठी पूर्वी सहजतेने मिळणारे पाडेकरी आता उपलब्ध होत नसल्याने झाडावरचे नारळ काढायचे तरी कसे? हा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे.सर्वसाधारपणे मागील दहा वर्षांचा विचार करता पाडेकरांचा जो समूह होता, त्यातील (अनेक सभासद) पाडेकरी हयात नाहीत. तर काहींना आता तब्येत साथ देत नसल्याने संख्या कमी झाली आहे. रेवस ते मुरुडपर्यंत अनेक नवीन बागायती तयार झाल्या आहेत. मात्र, पाडेकरी उपलब्ध होत नाहीत ही समस्या आहे. पाडेकºयांचे काम शिकवणाºया संस्था असल्या तरी प्रशिक्षण घेतल्यावर पाडेकरी तयार झालेले दिसत नाहीत.>पाडेकरी पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत; पण उपलब्ध पाडेकºयांपैकी बहुतेक त्यांच्या मर्यादेमध्ये काम करत नाहीत. ३० दिवसांचे काम असेल तर तो पाडेकरी दहा दिवस भरतो.- रूपेश बुरांड, बागायतदार>सुमारे ४५ वर्षे नारळ पाडेकरी म्हणून काम करत असून, सर्वत्र शिक्षणाच्या झालेल्या सोयीमुळे या कामाकडे नवीन पिढी वळायला तयार नाही. काम मेहनतीचे असल्याने शासन दरबारी याची विम्याच्या संरक्षणसाठी दखल घेणे गरजेचे आहे. नारळ पाडल्यावर दोन माडांचे नारळ किंवा एका माडाप्रमाणे पैसे अशी मजुरी घेतली जाते.- परशुराम नाईक, नारळ पाडेकरी, चौल-रामेश्वर>आता ३० ते ४० पाडेकरी शिल्लक असून, मागील दहा वर्षांचा विचार करता ही संख्या चांगलीच घटत आहे. नारळ पाडताना अपघात झाल्यास शासकीय पातळीवर विम्याचे संरक्षण मिळाले तर नवीन पिढी या जोखमीच्या व्यवसायात वळतील.- राजेश मुकादम, बागायतदार, रेवदंडा