शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

चार बेपत्ता बोटींपैकी दोन बोटींशी वायरलेस संपर्क यशस्वी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2017 19:34 IST

मच्छीमारीकरीता अरबी समुद्रात गेलेल्या आणि बेपत्ता झालेल्या मच्छिमारी बोटींची संख्या आता तीन वरुन चार झाली आहे.

- जयंत धुळप

रायगड, दि. 20 - मच्छीमारीकरीता अरबी समुद्रात गेलेल्या आणि बेपत्ता झालेल्या चार मच्छीमारी बोटींपैकी करंजा मच्छीमार सोसायटीचे सदस्य हरिश्चंद्र नाखवा यांची ‘मानसशिवालय’ व कृष्णा महादेव कोळी यांची ‘हेरंभशिवलिंग’ या दोन बोटींशी वायरलेस यंत्रणोद्वारे संध्याकाळी सहा वाजण्याच्या सूमारास संपर्क झाला असून या दोन्ही बोटी मुरुड-जंजीरा समुद्रातील बॉम्बेहाय प्लॅटफॉर्म जवळ सुरक्षीत असून या दोन बोटीवरील एकूण 16 खलाशी देखील सुखरुप असल्याची माहिती करंजा मच्छीमार सोसायटीचे अध्यक्ष शिवदास नाखवा यांनी दिली असल्याचे सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयूक्त अविनाश नाखवा यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

दरम्यान अलिबाग तालुक्यांतील रेवस मच्छीमार सोसायटीचे सदस्य किशोर शाम कोळी यांची ‘पौर्णिमाप्रसाद’ आणि कमलाकर कोळी यांची ‘गंगासागर’ या दोन बोटींचा अद्याप कोणत्याही प्रकारे थांगपत्ता लागू शकलेला नाही. या दोन बोटींवर अनूक्रमे 18 व 8 असे एकूण 26 खलाशी असल्याचे नाखवा यांनी सांगीतले. उद्या गुरुवारी तटरक्षक दलाच्या माध्यमातून या दोन बोटींच्या शोधार्थ मोहीम सूरु राहाणार आहे.

बोटींच्या शोधाकरिता भारतीय तटरक्षक दलास कळविण्यात आले असून त्यांच्या माध्यमातून बेपत्ता बोटींचा शोध सुरु करण्यात आला आहे. अरबी समुद्रात ताशी 60 किमी वेगाचे वारे वाहण्याची शक्यता असल्याचे भारतीय तटरक्षक दलाने कळविले असल्याने जिल्ह्यातील मच्छीमार बांधवांनी मच्छीमारीकरीता समुद्रात जावू नये असे आवाहन नाखवा यांनी केले आहे.