शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

रायगडाच्या लोकसभा उमेदवारी साठी आता शिवसेनेची एन्ट्री, विकास गोगावले यांचे झळकले भावी खासदार म्हणून बॅनर

By राजेश भोस्तेकर | Updated: March 9, 2024 13:45 IST

आमदार भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांचे भावी खासदार म्हणून महाडमध्ये बॅनर झळकले आहेत. त्यामुळे आता जिल्ह्यात महायुतीमध्येच उमेदवारीवरून रणसंग्राम निर्माण झाला आहे. 

अलिबाग : रायगड लोकसभा जागेचा तिढा अद्याप सुटलेला नाही आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांच्यात उमेदवारीवरून रस्सीखेच सुरू आहे. जिल्ह्यातील शिवसेना आमदार यांचा सुनील तटकरे यांना उमेदवारी मिळावी अशी मागणी असताना शिवसेना शिंदे गटातर्फे युवा सेनेने लोकसभा निवडणुकीत उडी मारली आहे. आमदार भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांचे भावी खासदार म्हणून महाडमध्ये बॅनर झळकले आहेत. त्यामुळे आता जिल्ह्यात महायुतीमध्येच उमेदवारीवरून रणसंग्राम निर्माण झाला आहे. 

लोकसभा निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडी तर्फे बैठकांचे सत्र सुरू आहे. कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. रायगडात यावेळी लोकसभा जागेवरून महायुतीमध्येच रस्सीखेच सुरू झाली आहे. भाजप ही रायगडाची जागा लढविण्यास इच्छुक आहे. केंद्र स्तरावर रायगड भाजप नेत्याची मोर्चे बांधणी सुरू आहे. सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे हे विद्यमान खासदार आहेत. तटकरे हे निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. रायगडची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळावी असा पक्षाचा आग्रह आहे. त्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात रायगड लोकसभा जागेवरून आपापसात झगडा सुरू आहे. 

एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांच्यातील जागेचा तिढा सुटलेला नाही आहे. त्यात आता शिवसेना शिंदे गटाच्या युवा सेनेने लोकसभा उमेदवारी साठी उडी घेतली आहे. शिंदे गटाचे प्रतोद आमदार भरत गोगावले यांचे सुपुत्र विकास गोगावले यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. महाड मध्ये विकास गोगावले यांचे भावी खासदार म्हणून बॅनर झळकले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे रायगडाची जागा मिळावी यासाठी मागणी करणार असल्याचे युवा  सेनेकडून सांगितले जात आहे. 

अलिबागचे आमदार महेंद्र दळवी, आमदार भरत गोगावले तर पालकमंत्री उदय सामंत यांनी विद्यमान खासदार सुनील तटकरे यांनाच उमेदवारी मिळावी अशी प्रतिक्रिया आधी बोलून दाखवली आहे. मात्र युवा सेनेच्या सेनेच्या एन्ट्रीने रायगड लोकसभा जागेवरून ट्विस्ट निर्माण झाला आहे. त्यामुळे महायुतीत वरिष्ठ पातळीवर नेते मंडळी रायगडाच्या जागेचा तिढा सोडविणार कसा याकडे आता जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.