शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
4
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
5
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
6
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
7
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
8
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
9
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
10
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
11
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
12
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
13
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
14
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
15
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
16
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
17
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
18
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
19
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
20
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली

रायगडाच्या लोकसभा उमेदवारी साठी आता शिवसेनेची एन्ट्री, विकास गोगावले यांचे झळकले भावी खासदार म्हणून बॅनर

By राजेश भोस्तेकर | Updated: March 9, 2024 13:45 IST

आमदार भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांचे भावी खासदार म्हणून महाडमध्ये बॅनर झळकले आहेत. त्यामुळे आता जिल्ह्यात महायुतीमध्येच उमेदवारीवरून रणसंग्राम निर्माण झाला आहे. 

अलिबाग : रायगड लोकसभा जागेचा तिढा अद्याप सुटलेला नाही आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांच्यात उमेदवारीवरून रस्सीखेच सुरू आहे. जिल्ह्यातील शिवसेना आमदार यांचा सुनील तटकरे यांना उमेदवारी मिळावी अशी मागणी असताना शिवसेना शिंदे गटातर्फे युवा सेनेने लोकसभा निवडणुकीत उडी मारली आहे. आमदार भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांचे भावी खासदार म्हणून महाडमध्ये बॅनर झळकले आहेत. त्यामुळे आता जिल्ह्यात महायुतीमध्येच उमेदवारीवरून रणसंग्राम निर्माण झाला आहे. 

लोकसभा निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडी तर्फे बैठकांचे सत्र सुरू आहे. कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. रायगडात यावेळी लोकसभा जागेवरून महायुतीमध्येच रस्सीखेच सुरू झाली आहे. भाजप ही रायगडाची जागा लढविण्यास इच्छुक आहे. केंद्र स्तरावर रायगड भाजप नेत्याची मोर्चे बांधणी सुरू आहे. सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे हे विद्यमान खासदार आहेत. तटकरे हे निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. रायगडची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळावी असा पक्षाचा आग्रह आहे. त्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात रायगड लोकसभा जागेवरून आपापसात झगडा सुरू आहे. 

एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांच्यातील जागेचा तिढा सुटलेला नाही आहे. त्यात आता शिवसेना शिंदे गटाच्या युवा सेनेने लोकसभा उमेदवारी साठी उडी घेतली आहे. शिंदे गटाचे प्रतोद आमदार भरत गोगावले यांचे सुपुत्र विकास गोगावले यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. महाड मध्ये विकास गोगावले यांचे भावी खासदार म्हणून बॅनर झळकले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे रायगडाची जागा मिळावी यासाठी मागणी करणार असल्याचे युवा  सेनेकडून सांगितले जात आहे. 

अलिबागचे आमदार महेंद्र दळवी, आमदार भरत गोगावले तर पालकमंत्री उदय सामंत यांनी विद्यमान खासदार सुनील तटकरे यांनाच उमेदवारी मिळावी अशी प्रतिक्रिया आधी बोलून दाखवली आहे. मात्र युवा सेनेच्या सेनेच्या एन्ट्रीने रायगड लोकसभा जागेवरून ट्विस्ट निर्माण झाला आहे. त्यामुळे महायुतीत वरिष्ठ पातळीवर नेते मंडळी रायगडाच्या जागेचा तिढा सोडविणार कसा याकडे आता जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.