शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
2
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
3
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
4
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
5
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
6
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
7
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
8
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
9
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
10
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
11
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
12
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
13
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
14
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
15
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
16
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
17
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
18
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
19
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
20
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

आता सरकार म्हणेल, तेल कमी खा, कोलेस्ट्राॅल कमी करा; वाढत्या खाद्य तेलांच्या किमतीवरून संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2021 02:01 IST

सर्वसामान्यांना सुखकारक जीवन जगता येईल, अशी काेणतीही ठाेस पावले केंद्र सरकारने बजेटमध्ये उचललेली नाहीत. खाद्यतेलांच्या किमतीत २०२०च्या तुलनेत तब्बल ४० रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे कमी तेल खाल्ल्याने तुमचे कोलेस्ट्राॅल कंट्राेलमध्ये राहील.

 रायगड : सर्वसामान्यांना सुखकारक जीवन जगता येईल, अशी काेणतीही ठाेस पावले केंद्र सरकारने बजेटमध्ये उचललेली नाहीत. खाद्यतेलांच्या किमतीत २०२०च्या तुलनेत तब्बल ४० रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे कमी तेल खाल्ल्याने तुमचे कोलेस्ट्राॅल कंट्राेलमध्ये राहील. नागरिकांच्या आराेग्यासाठी हे चांगलेच आहे, असा सल्ला माेदी सरकार तेलाच्या किमतीवरुन द्यायला विसरणार नाही, अशा संतप्त प्रतिक्रिया जिल्ह्यात उमटत आहेत.सरकारने पेट्राेल-डिझेलच्या किमतीमध्ये भरमसाठ वाढ केल्याने जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीवर त्याचा विपरीत परिणाम झाला आहे. किराणा सामानाबराेबरच भाजीपाला, फळे व अन्य आवश्यक वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत. त्यामुळे सामान्यांचे बजेट खिळखिळे झाले आहे. सातत्याने वाढणाऱ्या महागाईमुळे जगायचे कसे, असा प्रश्न पडला आहे. पालेभाज्यांच्या किमती वाढलेल्या असतानाच जेवणामध्ये आवश्यक असणारा प्रमुख घटक म्हणजे खाद्यतेल म्हणजेच गाेडतेलाच्या किमतीही सध्या वाढल्या आहेत. त्यामुळे तेलाची फाेडणी देताना गृहिणी हात आखडता घेत आहेत. मसालाही महागला आहे, गॅसही महागला आहे. त्यातच आता खाद्यतेलांच्या किमतीही वाढल्याने अर्थकारण बिघडले आहे. एक लीटर करडईचे तेल १२० रुपयांना बाजारात मिळत आहे, तर सूर्यफुल १६५ रुपये लीटर, शेंगदाणा तेल १८० रुपये लीटर, साेयाबीन तेल १०० रुपये लीटर आणि सरकीचे तेल १४० रुपये लीटरने बाजारात मिळत आहे. प्रत्येक तेलाच्या दरात १० रुपयांपासून ४० रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. सातत्याने वाढणाऱ्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांनी जगायचे कसे, असा प्रश्न आता त्यांच्यामधून विचारला जात आहे.  कशामुळे झाली वाढ? केंद्र सरकारने नुकत्याच सादर केलेल्या बजेटमध्ये पेट्राेल-डिझेलच्या किमतीमध्ये काेणतीही सूट दिलेली नाही. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढण्यावर त्याचा थेट परिणाम झाला आहे. मार्चमध्ये खाद्यतेलांच्या किमतीमध्ये उच्चांकी वाढ झाली आहे. प्रत्येक खाद्यतेलामध्ये १० रुपयांपासून ४० रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. गृहिणींच्या प्रतिक्रिया आम्हाला वाटले हाेते की, माेदी सरकार बजेटमध्ये सर्वसामान्यांना दिलासा देईल, मात्र घाेर निराशा केली आहे. खाद्यतेलांच्या किमती तब्बल ४० रुपयांनी वाढल्या आहेत. तेलामुळे काेलेस्ट्राॅलचे प्रमाण वाढते. तेलाच्या किमती वाढल्याने नागरिक कमी तेल खातील आणि कमी तेल शरिरात गेल्याने त्यांचे आराेग्य सुदृढ राहील, असे सांगायलाही सरकार कमी पडणार नाही.- सुषमा पाटील, गृहिणी सरकारने सर्वच जीवनावश्यक वस्तूंच्या किमती भरमसाठ वाढवून ठेवल्या आहेत. त्यामध्ये कडधान्ये, भाजीपाला, गॅस सिलिंडरसह खाद्यतेलाचा समावेश आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे आर्थिक गणित काेलमडले आहे. एकदा करण्यात आलेली दरवाढ कमी केली जात नाही आणि केलीच तर ती काही पैशांमध्ये असते.- मीनाक्षी पाटील, गृहिणी खाद्यतेलांच्या किमती या गेल्यावर्षीच्या तुलनेत किमान ४० रुपयांनी वाढल्या आहेत. बाजारात अशी काेणतीही वस्तू नसेल ज्याची किमत वाढलेली नाही. महागाई वाढली मात्र महिन्याचे उत्पन्न पूर्वीइतकेच आहे. त्यामुळे जगायचे कसे, असा प्रश्न आहे. आता स्वयंपाक करताना तेल जरा जपूनच वापरावे लागणार आहे.- दीपाली म्हात्रे, गृहिणीपेट्राेल-डिझेलच्या दरात वाढ झाल्याचा हा परिणाम आहे. त्याचप्रमाणे आपल्याकडे तेल आयात केले जाते. सध्या मागणी वाढली आहे आणि मालही उपलब्ध हाेत नाही.- अशोक अग्रवाल, व्यापारी 

टॅग्स :Raigadरायगड