शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

केंद्रात आतापर्यंत बिगर कॉंग्रेसची सरकारे टिकली नाहीत - शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2017 17:26 IST

केंद्रात आत्तापर्यंत बिगर कॉंग्रेसची सरकारे टिकली नाही, देशात सध्याची परिस्थिती अत्यंत चिंतेची आहे, असे सांगत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर निशाणा साधला.  

ठळक मुद्देकेंद्रात आतापर्यंत बिगर कॉंग्रेसची सरकारे टिकली नाहीत देशात सध्याची परिस्थिती चिंतेची आज महामंदी आणि महागाई वाढली

कर्जत : केंद्रात आत्तापर्यंत बिगर कॉंग्रेसची सरकारे टिकली नाही, देशात सध्याची परिस्थिती अत्यंत चिंतेची आहे, असे सांगत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर निशाणा साधला.  कर्जतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन दिवसांच्या चिंतन शिबिराचा आज समारोप करण्यात आला. यावेळी शरद पवार बोलत होते.  ते म्हणाले, केंद्रात आतापर्यंत कॉंग्रेसचेच सरकार टिकले आहे. बिगर कॉंग्रेसची सरकारे टिकली नाहीत. यापूर्वी अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना ते सर्वांना सोबत घेऊन जात होते. मात्र, सध्याचे केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार असे करताना दिसत नाही. देशातील लोकांना स्वप्ने दाखवून नरेंद्र मोदी सरकार सत्तेवर आले, असे शरद पवार म्हणाले. आज मोठ्याप्रमाणात देशात मंदी वाढली आहे. तसेच, देशाला महागाईने ग्रासले आहे. सत्ता केंद्रित होणे धोकादायक आहे आणि जर, सत्ता केंद्रित झाली की देशातील वस्तुस्थिती कळत नाही, असे शरद पवार यांनी सांगितले. याचबरोबर, राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारवर सुद्धा शरद पवार यांनी टीका केली. राज्यात गेल्या तीन वर्षांत आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. कर्जमाफीच्या मुद्यावरुन राज्य सरकारने शेतक-यांचा अपमान केला आहे. कर्जमाफीच्या फक्त घोषणा या सरकारने  केल्या. मात्र शेतक-यांच्या बॅंक खात्यात पैसे जमा  केले नाहीत, असे शरद पवार यांनी सांगितले. तसेच, शेतक-यांच्या शेतमालाला सध्या बाजारभाव मिळत नाही. लोकांची क्रयशक्ती वाढली पाहिजे, असेही यावेळी शरद पवार म्हणाले. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवार