शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

केंद्रात आतापर्यंत बिगर कॉंग्रेसची सरकारे टिकली नाहीत - शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2017 17:26 IST

केंद्रात आत्तापर्यंत बिगर कॉंग्रेसची सरकारे टिकली नाही, देशात सध्याची परिस्थिती अत्यंत चिंतेची आहे, असे सांगत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर निशाणा साधला.  

ठळक मुद्देकेंद्रात आतापर्यंत बिगर कॉंग्रेसची सरकारे टिकली नाहीत देशात सध्याची परिस्थिती चिंतेची आज महामंदी आणि महागाई वाढली

कर्जत : केंद्रात आत्तापर्यंत बिगर कॉंग्रेसची सरकारे टिकली नाही, देशात सध्याची परिस्थिती अत्यंत चिंतेची आहे, असे सांगत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर निशाणा साधला.  कर्जतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन दिवसांच्या चिंतन शिबिराचा आज समारोप करण्यात आला. यावेळी शरद पवार बोलत होते.  ते म्हणाले, केंद्रात आतापर्यंत कॉंग्रेसचेच सरकार टिकले आहे. बिगर कॉंग्रेसची सरकारे टिकली नाहीत. यापूर्वी अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना ते सर्वांना सोबत घेऊन जात होते. मात्र, सध्याचे केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार असे करताना दिसत नाही. देशातील लोकांना स्वप्ने दाखवून नरेंद्र मोदी सरकार सत्तेवर आले, असे शरद पवार म्हणाले. आज मोठ्याप्रमाणात देशात मंदी वाढली आहे. तसेच, देशाला महागाईने ग्रासले आहे. सत्ता केंद्रित होणे धोकादायक आहे आणि जर, सत्ता केंद्रित झाली की देशातील वस्तुस्थिती कळत नाही, असे शरद पवार यांनी सांगितले. याचबरोबर, राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारवर सुद्धा शरद पवार यांनी टीका केली. राज्यात गेल्या तीन वर्षांत आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. कर्जमाफीच्या मुद्यावरुन राज्य सरकारने शेतक-यांचा अपमान केला आहे. कर्जमाफीच्या फक्त घोषणा या सरकारने  केल्या. मात्र शेतक-यांच्या बॅंक खात्यात पैसे जमा  केले नाहीत, असे शरद पवार यांनी सांगितले. तसेच, शेतक-यांच्या शेतमालाला सध्या बाजारभाव मिळत नाही. लोकांची क्रयशक्ती वाढली पाहिजे, असेही यावेळी शरद पवार म्हणाले. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवार