शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
3
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
4
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
5
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
6
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
7
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
8
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
9
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
10
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
11
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
12
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
13
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
14
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
15
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
16
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
17
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
18
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
19
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
20
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?

वृक्षांची होळी नको - मानकवळे

By admin | Updated: March 11, 2017 02:20 IST

होळी हा सण सर्वत्र साजरा क रण्यात येतो; परंतु होळीसाठी दरवर्षी हजारो वृक्षांची तोड केली जाते आणि त्याचा परिणाम निसर्गावर होताना दिसत आहे.

- सुनील बुरुमकर, कार्लेखिंडहोळी हा सण सर्वत्र साजरा क रण्यात येतो; परंतु होळीसाठी दरवर्षी हजारो वृक्षांची तोड केली जाते आणि त्याचा परिणाम निसर्गावर होताना दिसत आहे. त्याकरिता निसर्गप्रेमींनी याची जाण ठेवून झाडांचे जतन होण्यासाठी या वृक्षतोडीच्या विरोधात आवाज उठविला आहे. असेच एक निसर्गप्रेमी प्रा. उदय मानकवळे हे निसर्गासाठी झटत असून, वृक्षतोड थांबविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. ‘झाडे तोडण्यापेक्षा झाडे लावा’ हा संदेश ते देत आहेत.हिंदू संस्कृतीप्रमाणे या सणाला पुरातन कथांचा आधार असतो आणि त्यानुसार आपण सण साजरे करत असतो. पुरातन दंतकथांच्या आधारावर ज्या दिवशी वाईट किंवा दृष्ट प्रवृत्तीचा नाश होतो त्याची आठवण आणि आपल्याकडून वर्षभरातून कळत- नकळत वाईट गोष्टी घडलेल्या असतात. त्यापासून माफी मागून नवीन वर्ष सुखाचे आणि चांगले जावो, अशी प्रार्थना करतो. हा त्या मागेचा हेतू असतो. होळी हा सण अगदी पुरातन काळापासून परंपरागत पद्धतीने म्हणजे जिवंत झाडे तोडून ती जाळून होळी करत; पण आपण त्या गोष्टीकडे कधी गांभीर्याने पाहिले नाही. झाडे तोडल्यामुळे होणारा निसर्गाचा ऱ्हास, त्यामुळे आपण आज त्याचे परिणाम भोगत आहोत. याच विरोधात गेली २० वर्षे पेण येथील वृक्षमित्र प्रा. उदय मानकवळे हे आवाज उठवत आहेत; परंतु त्यांना तेवढे यश मिळत नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. शासनामार्फत याचे काटेकोरपणे पालन करण्याची गरज आहे. मानकवळे हे स्वत: दरवर्षी दहा हजार झाडांची स्वखर्चाने निर्मिती करून ते ती झाडे लावण्यासाठी दान करतात. तसेच पत्रके वाटून गावातील किंवा वाडीमध्ये जाऊन झाडांविषयी महत्त्व पटवून वृक्षतोड होऊ नये यासाठी जनजागृती करण्याचे काम गेली कित्येक वर्षे करीत आहेत.मानकवळे यांच्या म्हणण्यानुसार पर्यावरण संतुलनासाठी मनुष्यप्राणी व इतर जीवजंतूंना जगण्यासाठी किमान ३३ टक्के भूभागावर जंगले किंवा नैसर्गिक एको सिस्टीम असणे आवश्यक आहे; परंतु महाराष्ट्रात केवळ १९ टक्के वनक्षेत्र अस्तित्वात आहे आणि ते घटत घटत १६ टक्क्यांवर येऊन थांबले आहे. नैसर्गिक असंतुलनामुळे विविध आजारांना आपण बळी पडत आहेत. होळीमध्ये जिवंत झाडे तोडून जाळली जाणारी झाडे जाळत नाहीत, तर मानवाचे भविष्य, येणाऱ्या पिढ्यांचे भविष्य जाळत आहेत. त्यामुळे हे टाळून सण आनंदाने व आरोग्याने साजरे करावे, असे त्यांनी आवाहन केले आहे. वृक्ष संवर्धनाची गरज1प्रत्येक झाडाचे जतन केले पाहिजे, कारण प्रत्येक झाडामध्ये ईश्वर आहे आणि झाडाची कत्तल करणे म्हणजे ईश्वराची कत्तल केल्यासारखी आहे, त्यामुळे वृक्ष संवर्धन महत्त्वाचे आहे. 2रायगड जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून पथक नेमून वृक्षतोड करू नये याबाबत माहिती देण्याचे काम वन विभागामार्फत चालू आहे. तसेच अलिबाग तालुक्यात संयुक्त वन व्यवस्थापन समिती यांच्यामार्फतही जनजागृती केली जात आहे. 3‘जंगल वाचले तर जीवन वाचेल’ अशी माहिती गावागावातून दिली जात आहे. यावर्षी २५ हजार पत्रके छापून ती शाळा, कॉलेज, बसस्टँड व अन्य ठिकाणी वाटली जात आहेत. तसेच रात्रीची गस्तसुद्धा घातली जात आहे.