शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

"माघी गणेशाेत्सवात कुलाबा किल्ल्यावर जाण्यास शुल्क आकारू नये"

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 01:53 IST

खासदार सुनील तटकरे यांची केंद्रीय मंत्री प्रल्हादसिंग पटेल यांच्याकडे पत्राद्वारे मागणी

रायगड : माघी गणेशाेत्सवानिमित्त कुलाबा किल्ल्यात येणाऱ्या भाविकांकडून प्रवेश फी आकारू नये, अशी मागणी रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी केली. याबाबतचे पत्र त्यांनी केंद्रीय पर्यटन व सांस्कृतिक राज्यमंत्री प्रल्हादसिंग पटेल यांना दिले. १४ आणि १५ फेब्रुवारी २०२१ या कालावधीत माघी गणेशोत्सव कुलाबा किल्ल्यात साजरा होणार आहे.१५ फेब्रुवारी २०२१ राेजी माघी गणेशाेत्सव राज्यात माेठ्या उत्साहात आणि जल्लाेषात साजरा करण्याची परंपरा आहे. अलिबाग येथील ऐतिहासिक कुलाबा किल्ला हा सुमारे साडेतीनशे वर्षे जुना आहे. याच कुलाबा किल्ल्यामध्ये श्री सिद्धिविनायकाचे मंदिर आहे. तेथे माेठ्या प्रमाणात गणेशाचा जन्मदिवस म्हणजेच माघी गणेशाेत्सव धूमधडाक्यात साजरा करण्यात येताे. माघी गणेशाेत्सवासाठी राज्याच्या कानाकाेपऱ्यांतून भाविक हजाराेंच्या संख्येने दर्शनासाठी येतात. या दिवशी स्थानिक उत्सव समितीच्या माध्यमातून महाप्रसादाचा कार्यक्रमही पार पडताे. माघी गणेशाेत्सवानिमित्तही माेठ्या संख्येने भाविक किल्ल्यातील श्री सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी येणार आहेत. त्यामुळे १४ आणि १५ फेब्रुवारी २०२१ या कालावधीत कुलाबा किल्ल्यात जाणाऱ्या भाविकांकडून काेणतेही शुल्क आकारू नये, अशी मागणी खासदार सुनील तटकरे यांनी केली आहे. संबंधितांना तातडीने आदेश देऊन अंंमलबजावणी करण्यास सांगावे, अशी विनंतीही खासदार तटकरे यांनी केंद्रीय राज्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात केली.दरम्यान, माघी गणेशोत्सवानिमित्त राज्य सरकारकडून नियमावली जाहीर करण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांच्या चौकटीत राहून हा उत्सव साजरा करा, असा निर्देश राज्य सरकारने उत्सव समित्यांसह विविध मंडळांना दिले आहेत. गणेशमूर्ती, मंडपाच्या आकारावर निर्बंध ठेवण्यात आले आहे.कोरोनामुळे खबरदारी म्हणून राज्य सरकारकडून मंडळांसाठी काही नियम मंडपउभारणीसाठी पालिकेची अथवा स्थानिक प्रशासनाची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे.मंडप मर्यादित आकाराचा असावा. आगमन-विसर्जन मिरवणुका काढता येणार नाही. सार्वजनिक मूर्तीची उंची चार फूट तर घरगुती मूर्तीची उंची दोन फूट असावी. शक्य असल्यास धातूच्या किंवा संगमरवरी मूर्तीचे पूजन करावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.मंडपात एका वेळी १० पेक्षा जास्त कार्यकर्ते आणि १५ पेक्षा अधिक भाविक नसावे.सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी सामाजिक उपक्रम, रक्तदान किंवा आरोग्य शिबिर अशा कार्यक्रमांना प्राधान्य द्यावे.ऑनलाइन किंवा केबल नेटवर्कच्या माध्यमातून दर्शनाची सोय करावी. मंडपात सामाजिक अंतराचे पालन करावे. वेळोवेळी मंडपाचे निर्जंतुकीकरण करावे. येणा-या भाविकांची तापमान तपासणी, मुखपट्टीचा वापर, स्वच्छतेचे नियम आदींबाबत दक्षता बाळगावी.विसर्जनालाही केवळ पाच कार्यकर्त्यांना परवानगी असेल. 

टॅग्स :sunil tatkareसुनील तटकरे