शहरं
Join us  
Trending Stories
1
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
2
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
3
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
4
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
5
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
6
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
7
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
8
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
9
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
10
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
11
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
12
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बलापूरमधील धक्कादायक घटना
13
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
14
Laura Wolvaardt Century : लॉराचा शतकी तोरा! वर्ल्ड कपमध्ये मिताली राजच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी
15
जिल्हाधिकाऱ्यांना मुख्य सचिव बनून केला फोन, दिले असे आदेश, पिता-पुत्रासह तिघांना अटक, असं फुटलं बिंग
16
हॉटेलमध्ये आलेल्या 'त्या' डॉक्टर तरूणीची अवस्था काय होती?; मालकाने सांगितला घटनाक्रम
17
२९ वर्षांपूर्वीचे रेखा-काजोलचे आयकॉनिक फोटोशूट नीसा आणि ओरीने केले रीक्रिएट; सोशल मीडियावर खळबळ!
18
'ट्रम्पने 50 वेळा मोदींचा अपमान केला, तरीही मोदी गप्प; इंदिरा गांधींसारखे धाडस हवे'- राहुल गांधी
19
UP: योगी सरकारच्या धोरणांमुळे विमान वाहतुकीत विक्रमी वाढ!
20
सलमान खान स्वत: 'बिग बॉस'चे सगळे एपिसोड्स बघतो का? अखेर निर्मात्यांनी केला खुलासा

निसर्ग चक्रीवादळाने तळकोकण उद्ध्वस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2020 06:00 IST

फळबागांना मोठा फटका : रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये २५० कोटींहून अधिक नुकसान

निखिल म्हात्रे/ मनोज मुळ्ये/महेश सरनाईक ।लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग/रत्नागिरी/सिंधुदुर्ग : कोरोनाच्या संकटातच बुधवारी आलेल्या निसर्ग चक्रीवादळाने तळकोकण उद्ध्वस्त झाला आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. या वादळामुळे शेती, आंबा, नारळी, पोफळीसह फळबागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. या वादळामुळे घरे, गोठे, झाडे, तसेच महावितरणचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. आधीच संकटात सापडलेले कोकणवासीय या वादळामुळे आणखी संकटात पडल्याचे चित्र आहे.

रायगडमध्ये पाच लाख घरांची पडझडरायगड जिल्ह्यात दोन-तीन तालुके वगळता अन्य सर्व ठिकाणी चक्रीवादळाने प्रचंड नुकसान झाले आहे. विविध दुर्घटनांत चौघांचा मृत्यू झाला आहे. सुमारे पाच लाख घरांची पडझड झाली आहे. पावणेदोन लाखांहून अधिक वृक्ष उन्मळून पडले आहेत. विजेचे खांब, तारा तुटून पडल्या आहेत. रस्त्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे दुरुस्ती-मदतकार्यात अडथळे येत आहेत. सहा हजार ७६६.२२ हेक्टरमधील शेती आणि आंबा, नारळी, पोफळीसह फळबागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. सर्वाधिक फटका वीजपुरवठ्याला आणि मोबाईल, इंटरनेट नेटवर्कला बसला आहे. नुकसानीचा आकडा २५० कोटींच्या घरात असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

सिंधुदुर्गात घरांनावादळाचा फटकासिंधुदुर्ग : निसर्ग चक्रीवादळ येथे धडकले नसले तरी त्याचा फटका मात्र जिल्ह्यात सर्वदूर कमीजास्तबसला आहे. मागील दोन दिवससुरू असलेल्या मुसळधार पावसासह वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणीझाडे घरांवर आणि वीज खांबांवर पडली आहेत. त्याचा ३२ घरांनाफटका बसला आहे. करूळघाटात दोन ते तीन ठिकाणी दरडी कोसळल्या असून ते हटविण्याचे काम सुरू आहे.९३ टक्के आपद्ग्रस्तघरे दापोली, मंडणगडचीया वादळाचा मोठाफटका रत्नागिरी जिल्ह्यातीलदापोली आणि मंडणगड या दोन तालुक्यांना बसला. जिल्ह्यात२७ हजार ७८२ घरांचे नुकसानझाले. त्यात ९३ टक्के घरी दापोलीव मंडणगड तालुक्यांतीलआहेत.दापोली, मंडणगडला सर्वाधिक नुकसानरत्नागिरी : जिल्ह्यात २७,७८२ घरांची पडझड झाली आहे. ११ जनावरे मृत झाली असून, ३२०० झाडे पडली आहेत. चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका दापोली, मंडणगड तालुक्यांना बसला आहे. जिल्ह्यात नुकसान झालेल्या २७,७८२ घरांपैकी दापोली तालुक्यातील तब्बल १८ हजार व मंडणगड तालुक्यात आठ हजार घरे आहेत. खेड तालुक्यातील १२६ गावांचे ५७८१ हेक्टरवरील शेतीचे नुकसान झाले आहे. विविध ठिकाणचे ९६० विजेचे खांब कोसळले आहेत. सुमारे पाच हजार लोकांना अगोदरच स्थलांतरीत केल्याने मनुष्यहानी झाली नाही. शाळा, शासकीय इमारती, गोदामे, समाजमंदिर यांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

पंचनामे सुरू: वादळ संपताचसर्वत्र पंचनाम्यांना प्रारंभ झाला असून,अजूनही ते सुरू आहेत. या तिन्ही जिल्ह्यातील नुकसानीचा निश्चित असा आकडा अजून स्पष्ट झाला नसला तरी त्याची व्याप्ती पाहता, कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचे दिसत आहे.‘विशेष पॅकेजची मागणी’नुकसानीचे पंचनामे सुरू करण्यात आले असून, विशेष पॅकेजची विनंती मुख्यमंत्र्यांकडे केल्याचे पालकमंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.

टॅग्स :Cyclone Nisargaनिसर्ग चक्रीवादळ