शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
2
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
3
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
4
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
5
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
6
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
7
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
8
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
9
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
10
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
11
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
12
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
13
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
14
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
15
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

निसर्ग चक्रीवादळाने तळकोकण उद्ध्वस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2020 06:00 IST

फळबागांना मोठा फटका : रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये २५० कोटींहून अधिक नुकसान

निखिल म्हात्रे/ मनोज मुळ्ये/महेश सरनाईक ।लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग/रत्नागिरी/सिंधुदुर्ग : कोरोनाच्या संकटातच बुधवारी आलेल्या निसर्ग चक्रीवादळाने तळकोकण उद्ध्वस्त झाला आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. या वादळामुळे शेती, आंबा, नारळी, पोफळीसह फळबागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. या वादळामुळे घरे, गोठे, झाडे, तसेच महावितरणचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. आधीच संकटात सापडलेले कोकणवासीय या वादळामुळे आणखी संकटात पडल्याचे चित्र आहे.

रायगडमध्ये पाच लाख घरांची पडझडरायगड जिल्ह्यात दोन-तीन तालुके वगळता अन्य सर्व ठिकाणी चक्रीवादळाने प्रचंड नुकसान झाले आहे. विविध दुर्घटनांत चौघांचा मृत्यू झाला आहे. सुमारे पाच लाख घरांची पडझड झाली आहे. पावणेदोन लाखांहून अधिक वृक्ष उन्मळून पडले आहेत. विजेचे खांब, तारा तुटून पडल्या आहेत. रस्त्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे दुरुस्ती-मदतकार्यात अडथळे येत आहेत. सहा हजार ७६६.२२ हेक्टरमधील शेती आणि आंबा, नारळी, पोफळीसह फळबागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. सर्वाधिक फटका वीजपुरवठ्याला आणि मोबाईल, इंटरनेट नेटवर्कला बसला आहे. नुकसानीचा आकडा २५० कोटींच्या घरात असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

सिंधुदुर्गात घरांनावादळाचा फटकासिंधुदुर्ग : निसर्ग चक्रीवादळ येथे धडकले नसले तरी त्याचा फटका मात्र जिल्ह्यात सर्वदूर कमीजास्तबसला आहे. मागील दोन दिवससुरू असलेल्या मुसळधार पावसासह वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणीझाडे घरांवर आणि वीज खांबांवर पडली आहेत. त्याचा ३२ घरांनाफटका बसला आहे. करूळघाटात दोन ते तीन ठिकाणी दरडी कोसळल्या असून ते हटविण्याचे काम सुरू आहे.९३ टक्के आपद्ग्रस्तघरे दापोली, मंडणगडचीया वादळाचा मोठाफटका रत्नागिरी जिल्ह्यातीलदापोली आणि मंडणगड या दोन तालुक्यांना बसला. जिल्ह्यात२७ हजार ७८२ घरांचे नुकसानझाले. त्यात ९३ टक्के घरी दापोलीव मंडणगड तालुक्यांतीलआहेत.दापोली, मंडणगडला सर्वाधिक नुकसानरत्नागिरी : जिल्ह्यात २७,७८२ घरांची पडझड झाली आहे. ११ जनावरे मृत झाली असून, ३२०० झाडे पडली आहेत. चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका दापोली, मंडणगड तालुक्यांना बसला आहे. जिल्ह्यात नुकसान झालेल्या २७,७८२ घरांपैकी दापोली तालुक्यातील तब्बल १८ हजार व मंडणगड तालुक्यात आठ हजार घरे आहेत. खेड तालुक्यातील १२६ गावांचे ५७८१ हेक्टरवरील शेतीचे नुकसान झाले आहे. विविध ठिकाणचे ९६० विजेचे खांब कोसळले आहेत. सुमारे पाच हजार लोकांना अगोदरच स्थलांतरीत केल्याने मनुष्यहानी झाली नाही. शाळा, शासकीय इमारती, गोदामे, समाजमंदिर यांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

पंचनामे सुरू: वादळ संपताचसर्वत्र पंचनाम्यांना प्रारंभ झाला असून,अजूनही ते सुरू आहेत. या तिन्ही जिल्ह्यातील नुकसानीचा निश्चित असा आकडा अजून स्पष्ट झाला नसला तरी त्याची व्याप्ती पाहता, कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचे दिसत आहे.‘विशेष पॅकेजची मागणी’नुकसानीचे पंचनामे सुरू करण्यात आले असून, विशेष पॅकेजची विनंती मुख्यमंत्र्यांकडे केल्याचे पालकमंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.

टॅग्स :Cyclone Nisargaनिसर्ग चक्रीवादळ