शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
2
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
3
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
6
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
7
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
8
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
9
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
10
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
11
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
12
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
13
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
14
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
15
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
16
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
17
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
18
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
19
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
20
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी

अलिबाग तालुक्यात शेकापचे नऊ सरपंच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 01:50 IST

तालुक्यातील १५ पैकी ९ ग्रामपंचायतींवर शेकापचे सरपंच निवडून आले असले तरी तेथे त्यांना पाच ग्रामपंचायतींवर बहुमत राखता आलेले नाही.

अलिबाग : तालुक्यातील १५ पैकी ९ ग्रामपंचायतींवर शेकापचे सरपंच निवडून आले असले तरी तेथे त्यांना पाच ग्रामपंचायतींवर बहुमत राखता आलेले नाही. शेकापने सहा ग्रामपंचायतींवर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे. काँग्रेसने आवास आणि खानाव ग्रामपंचायतीवर एकहाती सत्ता काबीज केली आहे, तर शिवसेना आणि भाजपाचा प्रत्येकी एक सरपंच निवडून आला आहे. निकाल लागल्यानंतर तहसीलदार कार्यालयाच्या बाहेर राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकच विजयी जल्लोष केला.२७ मे रोजी अलिबाग तालुक्यातील १५ ग्रामपंचायतींसाठी मतदान प्रक्रि या पार पडली होती. निकाल सोमवारी जाहीर होणार असल्याने सर्वच राजकीय पक्षांसाठी हा दिवस अतिशय महत्त्वाचा होता.१५ ग्रामपंचायतींमध्ये १५८ जागांसाठी मतदान झाले होते. त्यामध्ये सर्वाधिक काँग्रेस, शिवसेना, भाजपा आघाडीचे ८२ उमेदवार निवडून आले तर, शेकापचे ७६ उमेदवार निवडून आले आहेत.किहीम ग्रामपंचायतीमध्ये ११ पैकी आठ उमेदवार आघाडीचे, तर तीन उमेदवार शेकापचे निवडून आले. येथे सरपंचपदी शेकापचा उमेदवार निवडून आला आहे. माणकुले ग्रामपंचायतीमध्ये ९ पैकी चार उमेदवार शेकापचे, तर पाच आघाडीचे निवडून आले आहेत. येथे भाजपाचा सरपंच निवडून आला आहे. आवास ग्रामपंचायतीवर काँग्रेसचे ११ पैकी ११ उमेदवार निवडून आले आहेत. मिळकतखार ग्रामपंचायतीमध्ये पाच उमेदवार आघाडीचे, तर दोन शेकापचे निवडून आले. सरपंच मात्र शेकापचा बसणार आहे. कामार्लेमध्ये सहा आघाडीचे आणि तीन शेकापचे उमेदवार निवडून आले आहेत. येथे सरपंच शिवसेनेचा राहणार आहे. वाडगाव ग्रामपंचायतीत सातपैकी आघाडीचा एक उमेदवार जनतेने निवडून दिला. खिडकीमध्ये सातपैकी दोन उमेदवार शेकापचे उर्वरित आघाडीचे निवडले गेले आहेत. सरपंच मात्र काँग्रेसचा निवडून आला आहे.रेवदंडा ग्रामपंचायतीत आघाडीचे ११ तर शेकापचे सहा उमेदवार निवडून आले आहेत, तर शेकापचा सरपंच विजयी झाला आहे. खानाव ग्रामपंचायतीत १३ पैकी १३ उमेदवार निवडून आणून काँग्रेसने निर्विवाद वर्चस्व अबाधित राखले आहे.पेढांबे, वाघ्रण, शहाबाज, नागाव, खंडाळे आणि चिंचवली या सहा ग्रामपंचायतींवर शेकापने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे. पेढांबेमध्ये आघाडीचा एकच उमेदवार निवडून आला आहे, तर नागावमध्ये आघाडीचे चार, खंडाळेमध्ये एक आणि चिंचवलीमध्ये तीन उमेदवार निवडून आले आहेत.शेकाप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात काँग्रेस, भाजपा आणि शिवसेना एकत्र लढली. त्यामुळे त्यांना अपेक्षित यश संपादन करता आले आहे. त्यामुळे आघाडीचा आत्मविश्वास वाढला आहे. शेकापने ९ ठिकाणी सरपंच निवडून आणून आघाडीला जोरदार धक्का दिला आहे. निकालानंतर विविध राजकीय पक्षांनी विजयी मिरवणुका काढल्या होत्या.