शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीमध्ये २०७ जागांवर एकमत, कोण किती जागा लढवणार? अमित साटमांनी सांगितला आकडा
2
‘अरवली’बाबत सुप्रीम कोर्टाने स्वत: घेतली दखल, सरन्यायाधीश सोमवारी करणार सुनावणी
3
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
4
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
5
तैवानमध्ये मोठा भूकंप, इमारती हादरल्या, लोकांमध्ये दहशत, आसामपर्यंत जाणवले धक्के
6
ठाण्यात मनसेला मोठा धक्का, राजन गावंड यांचा शिंदेसेनेत जाहीर प्रवेश   
7
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
8
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
9
’मंगेश काळोखे यांच्या मारेकऱ्यांवर मोक्का लावून कठोरात कठोर कारवाई करणार’, एकनाथ शिंदे यांचं आश्वासन
10
मैदानातच आला हृदयविकाराचा झटका, प्रसिद्ध प्रशिक्षकाचं निधन, बांगलादेश क्रिकेटवर शोककळा  
11
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
12
VIDEO: खतरनाक! समुद्राच्या तळाशी पोहणाऱ्या डायव्हरवर अचानक ऑक्टोपसने केला हल्ला अन् मग...
13
ठाण्यात तीन प्रभागावरून युती अडली; आज तोडगा निघण्याची शक्यता, १२ जागांवरून अडले घोडे
14
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
15
खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय, निषेध करत सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
16
"PM मोदींचा हा वन मॅन शो फक्त..."; मनरेगाच्या नामांतरावरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल, काँग्रेस ५ जानेवारीपासून रस्त्यावर उतरणार
17
VIDEO : इटलीच्या बॅटरकडून शाहीन आफ्रिदीची धुलाई; पाक गोलंदाजावर 'लंगडी' घालत मैदान सोडण्याची वेळ!
18
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
19
जळगाव: बापच बनला हैवान! चौथी मुलगी झाल्याच्या रागातून अवघ्या ३ दिवसांच्या मुलीची हत्या
20
बांगलादेशमध्ये एका मिस्ट्री गर्लची एंट्री, बनू शकते भविष्यातील शेख हसीना किंवा खलिदा झिया
Daily Top 2Weekly Top 5

अलिबाग तालुक्यात शेकापचे नऊ सरपंच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 01:50 IST

तालुक्यातील १५ पैकी ९ ग्रामपंचायतींवर शेकापचे सरपंच निवडून आले असले तरी तेथे त्यांना पाच ग्रामपंचायतींवर बहुमत राखता आलेले नाही.

अलिबाग : तालुक्यातील १५ पैकी ९ ग्रामपंचायतींवर शेकापचे सरपंच निवडून आले असले तरी तेथे त्यांना पाच ग्रामपंचायतींवर बहुमत राखता आलेले नाही. शेकापने सहा ग्रामपंचायतींवर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे. काँग्रेसने आवास आणि खानाव ग्रामपंचायतीवर एकहाती सत्ता काबीज केली आहे, तर शिवसेना आणि भाजपाचा प्रत्येकी एक सरपंच निवडून आला आहे. निकाल लागल्यानंतर तहसीलदार कार्यालयाच्या बाहेर राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकच विजयी जल्लोष केला.२७ मे रोजी अलिबाग तालुक्यातील १५ ग्रामपंचायतींसाठी मतदान प्रक्रि या पार पडली होती. निकाल सोमवारी जाहीर होणार असल्याने सर्वच राजकीय पक्षांसाठी हा दिवस अतिशय महत्त्वाचा होता.१५ ग्रामपंचायतींमध्ये १५८ जागांसाठी मतदान झाले होते. त्यामध्ये सर्वाधिक काँग्रेस, शिवसेना, भाजपा आघाडीचे ८२ उमेदवार निवडून आले तर, शेकापचे ७६ उमेदवार निवडून आले आहेत.किहीम ग्रामपंचायतीमध्ये ११ पैकी आठ उमेदवार आघाडीचे, तर तीन उमेदवार शेकापचे निवडून आले. येथे सरपंचपदी शेकापचा उमेदवार निवडून आला आहे. माणकुले ग्रामपंचायतीमध्ये ९ पैकी चार उमेदवार शेकापचे, तर पाच आघाडीचे निवडून आले आहेत. येथे भाजपाचा सरपंच निवडून आला आहे. आवास ग्रामपंचायतीवर काँग्रेसचे ११ पैकी ११ उमेदवार निवडून आले आहेत. मिळकतखार ग्रामपंचायतीमध्ये पाच उमेदवार आघाडीचे, तर दोन शेकापचे निवडून आले. सरपंच मात्र शेकापचा बसणार आहे. कामार्लेमध्ये सहा आघाडीचे आणि तीन शेकापचे उमेदवार निवडून आले आहेत. येथे सरपंच शिवसेनेचा राहणार आहे. वाडगाव ग्रामपंचायतीत सातपैकी आघाडीचा एक उमेदवार जनतेने निवडून दिला. खिडकीमध्ये सातपैकी दोन उमेदवार शेकापचे उर्वरित आघाडीचे निवडले गेले आहेत. सरपंच मात्र काँग्रेसचा निवडून आला आहे.रेवदंडा ग्रामपंचायतीत आघाडीचे ११ तर शेकापचे सहा उमेदवार निवडून आले आहेत, तर शेकापचा सरपंच विजयी झाला आहे. खानाव ग्रामपंचायतीत १३ पैकी १३ उमेदवार निवडून आणून काँग्रेसने निर्विवाद वर्चस्व अबाधित राखले आहे.पेढांबे, वाघ्रण, शहाबाज, नागाव, खंडाळे आणि चिंचवली या सहा ग्रामपंचायतींवर शेकापने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे. पेढांबेमध्ये आघाडीचा एकच उमेदवार निवडून आला आहे, तर नागावमध्ये आघाडीचे चार, खंडाळेमध्ये एक आणि चिंचवलीमध्ये तीन उमेदवार निवडून आले आहेत.शेकाप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात काँग्रेस, भाजपा आणि शिवसेना एकत्र लढली. त्यामुळे त्यांना अपेक्षित यश संपादन करता आले आहे. त्यामुळे आघाडीचा आत्मविश्वास वाढला आहे. शेकापने ९ ठिकाणी सरपंच निवडून आणून आघाडीला जोरदार धक्का दिला आहे. निकालानंतर विविध राजकीय पक्षांनी विजयी मिरवणुका काढल्या होत्या.