शहरं
Join us  
Trending Stories
1
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
2
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
3
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
4
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
5
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
6
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
7
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
8
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
9
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
10
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
11
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
12
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
13
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
14
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
15
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
16
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
17
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
18
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
19
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
20
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस

अलिबाग तालुक्यात शेकापचे नऊ सरपंच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 01:50 IST

तालुक्यातील १५ पैकी ९ ग्रामपंचायतींवर शेकापचे सरपंच निवडून आले असले तरी तेथे त्यांना पाच ग्रामपंचायतींवर बहुमत राखता आलेले नाही.

अलिबाग : तालुक्यातील १५ पैकी ९ ग्रामपंचायतींवर शेकापचे सरपंच निवडून आले असले तरी तेथे त्यांना पाच ग्रामपंचायतींवर बहुमत राखता आलेले नाही. शेकापने सहा ग्रामपंचायतींवर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे. काँग्रेसने आवास आणि खानाव ग्रामपंचायतीवर एकहाती सत्ता काबीज केली आहे, तर शिवसेना आणि भाजपाचा प्रत्येकी एक सरपंच निवडून आला आहे. निकाल लागल्यानंतर तहसीलदार कार्यालयाच्या बाहेर राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकच विजयी जल्लोष केला.२७ मे रोजी अलिबाग तालुक्यातील १५ ग्रामपंचायतींसाठी मतदान प्रक्रि या पार पडली होती. निकाल सोमवारी जाहीर होणार असल्याने सर्वच राजकीय पक्षांसाठी हा दिवस अतिशय महत्त्वाचा होता.१५ ग्रामपंचायतींमध्ये १५८ जागांसाठी मतदान झाले होते. त्यामध्ये सर्वाधिक काँग्रेस, शिवसेना, भाजपा आघाडीचे ८२ उमेदवार निवडून आले तर, शेकापचे ७६ उमेदवार निवडून आले आहेत.किहीम ग्रामपंचायतीमध्ये ११ पैकी आठ उमेदवार आघाडीचे, तर तीन उमेदवार शेकापचे निवडून आले. येथे सरपंचपदी शेकापचा उमेदवार निवडून आला आहे. माणकुले ग्रामपंचायतीमध्ये ९ पैकी चार उमेदवार शेकापचे, तर पाच आघाडीचे निवडून आले आहेत. येथे भाजपाचा सरपंच निवडून आला आहे. आवास ग्रामपंचायतीवर काँग्रेसचे ११ पैकी ११ उमेदवार निवडून आले आहेत. मिळकतखार ग्रामपंचायतीमध्ये पाच उमेदवार आघाडीचे, तर दोन शेकापचे निवडून आले. सरपंच मात्र शेकापचा बसणार आहे. कामार्लेमध्ये सहा आघाडीचे आणि तीन शेकापचे उमेदवार निवडून आले आहेत. येथे सरपंच शिवसेनेचा राहणार आहे. वाडगाव ग्रामपंचायतीत सातपैकी आघाडीचा एक उमेदवार जनतेने निवडून दिला. खिडकीमध्ये सातपैकी दोन उमेदवार शेकापचे उर्वरित आघाडीचे निवडले गेले आहेत. सरपंच मात्र काँग्रेसचा निवडून आला आहे.रेवदंडा ग्रामपंचायतीत आघाडीचे ११ तर शेकापचे सहा उमेदवार निवडून आले आहेत, तर शेकापचा सरपंच विजयी झाला आहे. खानाव ग्रामपंचायतीत १३ पैकी १३ उमेदवार निवडून आणून काँग्रेसने निर्विवाद वर्चस्व अबाधित राखले आहे.पेढांबे, वाघ्रण, शहाबाज, नागाव, खंडाळे आणि चिंचवली या सहा ग्रामपंचायतींवर शेकापने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे. पेढांबेमध्ये आघाडीचा एकच उमेदवार निवडून आला आहे, तर नागावमध्ये आघाडीचे चार, खंडाळेमध्ये एक आणि चिंचवलीमध्ये तीन उमेदवार निवडून आले आहेत.शेकाप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात काँग्रेस, भाजपा आणि शिवसेना एकत्र लढली. त्यामुळे त्यांना अपेक्षित यश संपादन करता आले आहे. त्यामुळे आघाडीचा आत्मविश्वास वाढला आहे. शेकापने ९ ठिकाणी सरपंच निवडून आणून आघाडीला जोरदार धक्का दिला आहे. निकालानंतर विविध राजकीय पक्षांनी विजयी मिरवणुका काढल्या होत्या.