शहरं
Join us  
Trending Stories
1
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
2
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
3
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
4
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
5
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
6
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
7
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
8
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
9
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...
10
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)
11
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
12
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
13
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
14
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
15
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: ‘हे’ प्रभावी शिव मंत्र म्हणा, भाग्याची साथ मिळेल; लाभच लाभ होतील!
16
BCCI New Rules For IPL Celebration : बंगळुरुमधील 'त्या' दुर्घटनेनंतर आता BCCI नं घेतला मोठा निर्णय
17
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!
18
अणुबॉम्ब केवळ बहाणा, इराणवर हल्ला करण्यामागचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा हेतू वेगळाच, समोर येतेय अशी माहिती
19
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: इच्छा पूर्ण होतील, महादेव शुभ करतील; अद्भूत योगात ‘असे’ करा व्रत!
20
७ महिन्यांत १ लाखाचे झाले ३.५ लाख! 'या' डिफेन्स स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश, आता तुमची पाळी?

पाणीटंचाई निवारणासाठी जिल्ह्यात नऊ कोटींची तरतूद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2020 00:21 IST

निखिल म्हात्रे अलिबाग : उन्हाच्या झळा आता तीव्र होत आहेत. जिल्ह्यातील पाणीटंचाईही आता डोके वर काढण्याच्या तयारीत आहे. पाणीटंचाईपासून ...

निखिल म्हात्रेअलिबाग : उन्हाच्या झळा आता तीव्र होत आहेत. जिल्ह्यातील पाणीटंचाईही आता डोके वर काढण्याच्या तयारीत आहे. पाणीटंचाईपासून सर्वसामान्यांना दिलासा मिळावा, यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत नऊ कोटी ३९ लाख दहा हजार रुपयांचा पाणीटंचाई कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. सातत्याने पाणीटंचाईवर मात करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. मात्र, पाणीटंचाईची समस्या पूर्णत: कधी संपुष्टात येणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा आराखडा तयार केला जातो. मात्र, त्यातील कोट्यवधी रुपये खर्चच होत नसल्याचे मागील सात वर्षांच्या आकडेवारीवर नजर टाकली असता दिसून येते.रायगड जिल्ह्यात दरवर्षी सरासरी साडेतीन हजार मिलीमीटर इतका पाऊस पडतो; परंतु मोठ्या प्रमाणात पाऊस पडूनही त्याचे योग्य नियोजन करण्यात येत नसल्याने पाणीटंचाईची समस्या निर्माण होऊन त्या ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो. जिल्ह्यात पेण, कर्जत, महाड, पोलादपूर, म्हसळा, श्रीवर्धन या तालुक्यांमध्ये टंचाईची तीव्रता अधिक असते. या भागात टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो. टँकर वेळेवर सुरू झाले नाही तर पिण्याच्या पाण्यासाठी तेथील नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागते. काही ठिकाणी तर नागरिकांना पैसे खर्च करून पाणी आणावे लागते.पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पाणीटंचाई कृती आराखडाही दरवर्षी तयार केला जातो. प्रामुख्याने टंचाई निवारणासाठी कोट्यवधी रुपयांची तरतूद केली जाते. यामध्ये टँकरने पाणीपुरवठा करणे, नवीन विंधन विहिरींची कामे करणे, विंधन विहिरींची दुरुस्ती करणे, नळ पाणी योजनांची तात्पुरती दुरुस्ती, अशी कामे प्रस्तावित असतात. जिल्हा परिषदेचा ग्रामीण पाणीपुरवठा विभाग आाणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्या माध्यमातून ही कामे केली जातात. मागील सात वर्षांतील टंचाई कृती आराखडा आणि प्रत्यक्ष खर्च याच्या आकडेवारीवर नजर टाकली, तर छोटी-मोठी कामे वगळता अन्य निधी तसाच पडून राहतो.।प्रक्रियेमध्ये वेळ जात असल्याने विलंबटँकर किंवा बोअरवेल विहीर दुरुस्तीची मागणी आली की, त्याचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे पाठवला जातो. प्रशासनाची मंजुरी मिळाल्यानंतर कामाचे अंदाजपत्रक तयार केले जाते. त्यानंतर कामासाठी ठेकेदार नेमला जाऊन कामाला सुरुवात होते. या प्रक्रियेमध्ये बराच कालावधी जातो. यातच उन्हाळ्याचे दिवस निघून जातात आणि कामे तशीच राहतात. कायदेशीर प्रक्रि या दिवाळीपूर्वीच पूर्ण होणे आवश्यक असल्याचे मत भाजपचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते यांनी ‘लोकमत’कडे व्यक्तके ले.।वर्ष प्रस्तावित आराखडा प्रत्यक्ष खर्च२०१२ - १३ ६ कोटी ६ लाख ७५ हजार २ कोटी १६ लाख ५३ हजार२०१३ - १४ ६ कोटी ३ लाख ९२ हजार १ कोटी ६० लाख ३ हजार२०१४-१५ ६ कोटी ८९ लाख ४४ हजार १ कोटी ४७ लाख १ हजार२०१५-१६ ७ कोटी ८८ लाख ८० हजार १ कोटी १५ लाख२०१६-१७ ६ कोटी २५ लाख १० हजार १ कोटी २२ लाख ९५ हजार२०१७-१८ ८ कोटी ३३ लाख १ हजार ३ कोटी२०१८-१९ ९ कोटी ४० लाख ९९ हजार ३ कोटी ३ लाख ४९ हजार