शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
5
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
6
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
7
१२४ वर्षांनंतर अक्षय तृतीया-चतुर्थी-रोहिणी नक्षत्र अन् बुधवारचा दुर्मीळ योग!
8
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
9
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
10
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
11
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
12
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
13
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
14
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
15
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
16
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
17
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
18
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
19
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
20
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल

पुढील वर्षी रायगडचे नवे आणि प्रसन्न रूप पाहायला मिळेल - संभाजीराजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2018 01:33 IST

रायगड विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून पुढील वर्षी गडावरील फसरबंदी, ८४ तलावांची सफाई, तटबंदीची दुरुस्ती आदी कामे पूर्ण झालेली असतील. रायगडचे एक नवे आणि प्रसन्न रूप शिवभक्तांना पाहावयास मिळेल, असा विश्वास खा. संभाजीराजे यांनी व्यक्त केला.

- संदीप जाधवमहाड : रायगड विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून पुढील वर्षी गडावरील फसरबंदी, ८४ तलावांची सफाई, तटबंदीची दुरुस्ती आदी कामे पूर्ण झालेली असतील. रायगडचे एक नवे आणि प्रसन्न रूप शिवभक्तांना पाहावयास मिळेल, असा विश्वास खा. संभाजीराजे यांनी व्यक्त केला. बुधवारी किल्ले रायगडावर अखिल भारतीय शिवराज्याभिषेक समितीच्या वतीने शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते.खा. युवराज संभाजीराजे छत्रपती, युवराज शहाजीराजे, राज्याचे दुग्धविकास मंत्री महादेव जानकर, फिजीचे राजदूत रोंढीरकुमार, कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद छत्रे, शिवराज्याभिषेक समितीचे अध्यक्ष फत्तेसिंह सावंत, पानिपत येथील रोड मराठा समाजाचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते.मंगळवारी गडपूजनाने शिवराज्याभिषेक सोहळ्यास प्रारंभ करण्यात आला. खा. संभाजीराजे छत्रपती आणि युवराज शहाजीराजे यांच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्याचे पूजन करून त्याचप्रमाणे मेघडंबरीतील शिवपुतळ्यावर सुवर्ण मोहोरांचा अभिषेक करून राज्याभिषेक साजरा करण्यात आला. त्यानंतर मेघडंबरी ते शिवसमाधीपर्यंत भव्य अशी पालखी मिरवणूक काढण्यात आली. शिवकालीन वेशामध्ये उपस्थित असलेले, भगवा ध्वज हाती घेऊन शिवरायांचा जयघोष करणारे शिवभक्त रायगडावर शिवकालच अवतरल्याची प्रचिती देत होते.आठ दिवसांपासूनच संभाजीराजे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवराज्याभिषेक दिन उत्सव समितीचे कार्यकर्ते या सोहळ्याची तयारी करीत होते. यावेळी गडावरील उत्खननामध्ये सापडलेल्या विविध शिवकालीन वस्तूंचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. वाहतूककोंडी होऊ नये यासाठी पाचाड नाक्यावरच चारचाकी वाहने थांबण्यात येत होती. त्यामुळे शिवभक्तांना पाचाड नाका ते चित्तदरवाजापर्यंत चार किमी पायपीट करावी लागली.

टॅग्स :Raigadरायगड