शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईला ऑरेंज अलर्ट जारी, उपनगरात जोरदार हजेरी; अंधेरी सबवे बंद!
2
"झोप येत नाहीये...!"; राधिका यादव हत्या प्रकरणात 'लव्ह जिहाद'च्या चर्चेवर आईची शपथ घेत काय म्हणाला इनामुल हक?
3
अमेरिकेत ३८ लाख, मग भारतात Tesla ची कार इतकी महाग का? जाणून घ्या कारण...
4
धावत्या बसमध्येच प्रसूती, नंतर बाळाला बाहेर फेकलं; कथित पती-पत्नीचा अमानुष प्रकार
5
"एकनाथ शिंदे पण त्यातलेच!" संजय गायकवाड आणि संजय शिरसाठ यांचे नाव घेत अंबादास दानवे संतापले!
6
शिंदेंच्या शिवसेनेला नाशिकमध्ये पडणार खिंडार, माजी खासदार हेमंत गोडसेही भाजपच्या वाटेवर?
7
SBI, HDFC सह ६ म्युच्युअल फंडांनी 'या' १३ स्मॉल कॅप कंपन्यांमधून काढले हात! तुमचे तर पैसे नाहीत ना?
8
अमेरिकेने भारताला दिले गिफ्ट, पाकिस्तानचा थयथयाट; घातक फायटर जेटसाठी पाठवले खास इंजिन
9
SBI च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! या तारखेला ATM, UPI, IMPS, NEFT सेवा राहणार बंद; पाहा डिटेल्स
10
Ganpati Extra Buses for Konkan : गुड न्यूज! चाकरमान्यांना बाप्पा पावला; गणेशोत्सवासाठी कोकणात STच्या जादा ५ हजार बस धावणार
11
Air India Plane Crash : मोठा दावा! विमान अपघातापूर्वीच इंधन नियंत्रण स्विच खराब असल्याचा इशारा'CAA'ने दिला होता
12
Raigad Heavy Rain: रायगडमध्ये पावसाचा कहर! सहा तालुक्यांमधील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी
13
पत्नीला जाळून मारल्याप्रकरणी पतीला अटक, पण ती प्रियकरासोबत सापडली जिवंत, सोलापूरातील धक्कादायक प्रकार
14
Accident Video: मृत्यूचा थरार कॅमेऱ्यात कैद! दोन तरुणांना कारने उडवले, एकाचा जागीच मृत्यू
15
...तर निम्मे होतील टोलचे दर, 'अशा' रस्त्यांवर वाहन चालवणाऱ्यांना दिलासा; सरकारनं बनवला नवा प्लॅन
16
Ramayana : तब्बल ४ हजार कोटींमध्ये बनतोय रणबीरचा 'रामायण'; निर्माते म्हणाले, "हॉलिवूडच्या जवळपासही..."
17
संपत्तीवरून वाढला वाद, पत्नीने अवघी १० लाख लावली पतीच्या जीवाची बोली! सुपारी दिली अन्...  
18
नवजात बाळाला मालिश करणं का महत्त्वाचं, कोणतं तेल आहे सर्वात बेस्ट?
19
Bitcoin Return Chart: ५ वर्षांत बनवलं राजा! तुम्हीही १००-२०० रुपयांत खरेदी करू शकता बिटकॉईन
20
जयशंकर यांनी चीनच्या राष्ट्राध्यक्षांना दिला पीएम मोदींचा संदेश; पाकिस्तानला लागणार मिरची..!

महाडमधील नवे गोदाम धूळखात पडून, तालुक्यात केवळ ३०० मेट्रिक टन धान्य उपलब्ध

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2019 03:37 IST

महाड तालुक्यात शासकीय इमारती वारेमाप बांधल्या जात आहेत. नियोजनाचा अभाव आणि प्रशासनाकडून दिली जाणारी चुकीची माहिती यामुळे जनतेचा पैसा या इमारतींवर चुकीच्या पद्धतीने वाया घालवला जात आहे.

- सिकंदर अनवारेदासगाव -  महाड तालुक्यात शासकीय इमारती वारेमाप बांधल्या जात आहेत. नियोजनाचा अभाव आणि प्रशासनाकडून दिली जाणारी चुकीची माहिती यामुळे जनतेचा पैसा या इमारतींवर चुकीच्या पद्धतीने वाया घालवला जात आहे. महाडमध्ये कोळोसे येथे नव्याने बांधण्यात आलेले धान्य गोदाम बांधकाम पूर्ण होऊन वर्ष झाले तरी अद्याप सुरू झालेले नाही. शासनाने एकीकडे पुरवठा विभागाकडून देण्यात येणारे धान्य जवळपास बंद केले आहे असे असताना पुन्हा नव्या गोदामाची गरज कशासाठी असा प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या महाडमध्ये तीन धान्य गोदामे आहेत. त्यांची एकूण धान्य साठवण क्षमता १२५० मेट्रिक टन आहे तर नव्याने बांधण्यात आलेले गोदाम १०८० मेट्रिक टन क्षमतेचे आहे. तालुक्यात सध्या केवळ ३०० मेट्रिक टन धान्य उपलब्ध होते.शासकीय इमारती बांधताना त्या त्या ठिकाणी असलेल्या गरजेचा विचार केला जात नाही. जिल्हा परिषदेमार्फत आणि शासनाकडून विविध योजनांतून महाड तालुक्यात अनेक इमारती बांधण्यात आल्या आहेत. जिल्हा परिषदेने तर आरोग्य उपकेंद्रांवर कोट्यवधी रुपये खर्ची घातले आहेत. अशाच प्रकारे चुकीचे नियोजन करत जनतेचा पैसा वाया घालवण्याचा प्रकार पुन्हा एकदा समोर आला आहे. कोळोसे या ठिकाणी शासनाने नवे धान्य गोदाम बांधले आहे. आधीच महाड तालुक्यात जवळपास तीन धान्य गोदामे आहेत. ही गोदामे सद्यस्थितीत पुरेशी असताना केवळ योजना राबवायची म्हणून हे नवे गोदाम बांधण्यात आले आहे. नाबार्डमधून या गोदामाची निर्मिती झाली असून जवळपास दीड कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. कोळोसे गावातील शासकीय जागेवर ही इमारत बांधली असली तरी रस्त्याचा प्रश्न आजही प्रलंबित आहे. या गोदामाकडे जाण्याकरिता अरुंद रस्ता आहे तो देखील खासगी मालकीचा आहे. यामुळे महाड पुरवठा विभागाने त्रुटी दाखवत हे गोदाम ताब्यात घेण्यास सुरवातीला नकार दिला. मात्र, आता हे गोदाम पुरवठा विभागाने विनातक्रार ताब्यात घेतले आहे. हे गोदाम ताब्यात घेतल्यापासून अद्याप उद्घाटन झालेले नाहीच, शिवाय याचा वापरदेखील सुरू झालेला नाही. यामुळे गोदाम धूळखात पडले असून इमारतीच्या काचा तुटून पडल्या आहेत. विजेचे दिवेदेखील फुटले आहेत.तीन गोदामांची क्षमता १२५० मेट्रिक टनमहाड तालुक्यात यापूर्वी मोठ्या प्रमाणात धान्य येत होते. शासनाच्या पुरवठा विभागाकडून या धान्याचा पुरवठा होत होता. आलेले धान्य योग्य प्रकारे साठवून ठेवण्याकरिता महाड शहर, बिरवाडी, या ठिकाणी एकूण तीन गोदामे आहेत. महाड शहरात नवेनगरमध्ये असलेल्या गोदामात ५०० मेट्रिक टन धान्य साठवण क्षमता आहे तर बिरवाडी येथील गोदामात २५० मेट्रिक टन धान्य साठवण करता येते.महाडमधील एस.टी. स्थानकाजवळील धान्य गोदामात सध्या प्रांत कार्यालय सुरू करण्यात आले आहे. अर्ध्या भागात प्रांत कार्यालय तर अर्धा भाग रिक्तच आहे. याची धान्य साठवण क्षमता देखील ५०० मेट्रिक टन आहे. तीनही गोदामाची एकूण क्षमता १२५० मेट्रिक टन इतकी आहे. सध्या महाड तालुक्यात केवळ ३०० मेट्रिक टन धान्य शासनाकडून उपलब्ध होते असे असताना पुन्हा १०८० मेट्रिक टन धान्य गोदाम इमारत कोणासाठी असा प्रश्न निर्माण झाला आहे.शासनाकडून आता केवळ अंत्योदय आणि बी.पी.एल. रेशनकार्डधारकांसाठीच धान्यपुरवठा केला जातो. यामध्ये देखील तांदूळ आणि गहू या दोनच धान्यांचा समावेश आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या तीनही गोदामांची क्षमता आता येत असलेल्या धान्यापेक्षा अधिक आहे.

टॅग्स :Raigadरायगड