शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
5
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
6
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
7
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
8
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
9
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
10
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
11
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
12
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
13
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
14
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
15
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
16
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
17
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
18
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
19
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
20
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश

दासगावची नवीन वसाहत विहिरीच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2018 01:05 IST

मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम वेगाने सुरू असून, या कामात दासगावमधील नवीन वसाहतीच्या पिण्याच्या पाण्याचा मूळ स्रोत असलेली विहीर बुजवण्यात येत आहे.

- सिकंदर अनवारेदासगाव : मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम वेगाने सुरू असून, या कामात दासगावमधील नवीन वसाहतीच्या पिण्याच्या पाण्याचा मूळ स्रोत असलेली विहीर बुजवण्यात येत आहे, त्यामुळे वसाहतीला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उद्भवणार आहे. पर्यायी व्यवस्था उपलब्ध न होताच विहीर बुजवण्यात येत असल्याने ग्रामस्थांमधून नाराजी व्यक्त होत आहे.महामार्गाचे काम सध्या जोराने सुरू आहे. या कामात विविध ठिकाणचे पिण्याच्या पाण्याचे स्रोत नष्ट होत आहेत. दासगावमध्ये नवीन वसाहतीला महामार्गाजवळच असलेली विहीर तहान भागवत आहे. २००५ मध्ये भूस्खलनामध्ये बाधित कुटुंबांसाठी ही वसाहत निर्माण करण्यात आली आहे. येथील ग्रामस्थांना या विहिरींमुळे मे महिन्यापर्यंत पाणी पुरत होते. महामार्ग चौपदरीकरणात ही विहीर बुजवली जाणार आहे.दासगाव बंदर परिसरातील ग्रामस्थ २००५ मधील भूस्खलनानंतर या नवीन वसाहतीमध्ये राहण्यास आले. या ठिकाणी वहूर-दासगाव पाणीपुरवठा योजनेतून पाणीपुरवठा केला जातो. मात्र, अनेक वेळा हा पुरवठा वारंवार खंडित होतो. त्या वेळी विहिरीचा मोठा आधार असतो. ही विहीरदेखील बुजवल्यास भविष्यात ग्रामस्थांना पाण्यासाठी फिरावे लागणार आहे.चौपदरीकरणाच्या कामात विहीर बाधित झाल्यानंतर प्रशासनाकडून या विहिरीचा मोबदला ग्रामपंचायतीकडे देण्यात आला आहे. प्रशासनाने ग्रामस्थांच्या संभावित पिण्याच्या पाण्याचा प्रश्न लक्षात घेता नवीन विहिरीच्या कामास सुरुवात करणे आवश्यक आहे. या ठिकाणी वहूर गावातील मन्सूर झटाम यांनी चार गुंठे जागा दिली आहे. या जागेत नवीन विहीर करणे आवश्यक आहे. मात्र, या बाबत अद्याप कोणतीच हालचाल दिसून येत नाही. भविष्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न पाहता, पर्यायी व्यवस्था जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत ही विहीर बुजवली जाऊ नये, अशी भूमिका सरपंचांनी घेतली आहे.