शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "अजित पवार, सगळ्यांचा नाद करायचा, पण..."; भाजपा नेते राजन पाटलांच्या मुलाचं थेट चॅलेंज
2
भारताला 'हिंदू राष्ट्र' घोषित करण्याची गरज नाही, हिंदू म्हणजे अशी व्यक्ती जी...- मोहन भागवत
3
"मुलाच्या मनात माझा आदर वाढेल"; डिनर पार्टीत ट्रम्प यांनी रोनाल्डोसोबत शेअर केला घरातला खास किस्सा
4
Mumbai Airport: मुंबई विमानतळ २० नोव्हेंबर रोजी ६ तास बंद राहणार, कारण काय?
5
अनगरात 'सही'चा खेळ! अर्ज बाद होताच उज्ज्वला थिटेंचा आरोप, 'मुलगा सोबत असूनही सही राहिलीच कशी?
6
FD-RD विसरा! सुरक्षित गुंतवणूक हवी असल्यास FMP ठरेल स्मार्ट चॅाईस, लो रिस्क हाय रिटर्नचा स्मार्ट कॅाम्बो
7
भाजपाची घराणेशाही! एकाच कुटुंबातील ६ जणांना तिकीट; पत्नी, भाऊ, वहिनी, मेहुणा... सगळेच रिंगणात
8
Mahayuti: भाजप- शिंदे गटात माजी नगरसेवक फोडण्याची स्पर्धा, निवडणुकीपूर्वी महायुतीत अंतर्गत वाद शिगेला!
9
शेअर बाजारात आजही घसरण, २५,९०० च्या खाली निफ्टी; IT Stocks मध्ये मोठी खरेदी
10
Video: "लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम..."; अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा घणाघात, भाजपावर निशाणा
11
Delhi Blast: युनूस सरकारचा दावा खोटा; अटकेत असलेला इख्तियार बांगलादेशचा पर्दाफाश करणार !
12
आजचे राशीभविष्य - १९ नोव्हेंबर २०२५, जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्ती इत्यादीसाठी आजचा दिवस अनुकूल
13
Politics: "मला आणि माझा मुलाला मारण्याचा कट" भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नेत्याचा शिंदेसेनेवर गंभीर आरोप!
14
Supreme Court: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर टांगती तलवार, आरक्षणाच्या मर्यादेवर आज सुनावणी!
15
Mumbai Airport: विमानतळ परिसरातील मार्ग आजपासून २ दिवस बंद; 'या' पर्यायी मार्गाचा करा वापर!
16
CNG Supply: मुंबईकरांना मोठा दिलासा! ३ दिवसांनंतर सीएनजी पुरवठा पूर्ववत, प्रवाशांनी सोडला सुटकेचा निःश्वास
17
Farmers Relief: मुसळधार पाऊस किंवा वन्य प्राण्यांनी पीक तुडवले, नुकसान भरपाई मिळणार,  पण एक अट!
18
Mahayuti: एकमेकांचे माजी नगरसेवक, पदाधिकारी पळवण्यावरून महायुतीत घमासान! 
19
Government Decision: 'नोटरी'वर झालेले जमीन व्यवहारही आता कायदेशीर; ३ कोटी नागरिकांना मोठा दिलासा
20
एकाचवेळा तीन बिबट्यांच्या घराला घिरट्या; शिकारीच्या शोधात आलेले सीसीटीव्ही कॅमेरात कैद 
Daily Top 2Weekly Top 5

दासगावची नवीन वसाहत विहिरीच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2018 01:05 IST

मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम वेगाने सुरू असून, या कामात दासगावमधील नवीन वसाहतीच्या पिण्याच्या पाण्याचा मूळ स्रोत असलेली विहीर बुजवण्यात येत आहे.

- सिकंदर अनवारेदासगाव : मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम वेगाने सुरू असून, या कामात दासगावमधील नवीन वसाहतीच्या पिण्याच्या पाण्याचा मूळ स्रोत असलेली विहीर बुजवण्यात येत आहे, त्यामुळे वसाहतीला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उद्भवणार आहे. पर्यायी व्यवस्था उपलब्ध न होताच विहीर बुजवण्यात येत असल्याने ग्रामस्थांमधून नाराजी व्यक्त होत आहे.महामार्गाचे काम सध्या जोराने सुरू आहे. या कामात विविध ठिकाणचे पिण्याच्या पाण्याचे स्रोत नष्ट होत आहेत. दासगावमध्ये नवीन वसाहतीला महामार्गाजवळच असलेली विहीर तहान भागवत आहे. २००५ मध्ये भूस्खलनामध्ये बाधित कुटुंबांसाठी ही वसाहत निर्माण करण्यात आली आहे. येथील ग्रामस्थांना या विहिरींमुळे मे महिन्यापर्यंत पाणी पुरत होते. महामार्ग चौपदरीकरणात ही विहीर बुजवली जाणार आहे.दासगाव बंदर परिसरातील ग्रामस्थ २००५ मधील भूस्खलनानंतर या नवीन वसाहतीमध्ये राहण्यास आले. या ठिकाणी वहूर-दासगाव पाणीपुरवठा योजनेतून पाणीपुरवठा केला जातो. मात्र, अनेक वेळा हा पुरवठा वारंवार खंडित होतो. त्या वेळी विहिरीचा मोठा आधार असतो. ही विहीरदेखील बुजवल्यास भविष्यात ग्रामस्थांना पाण्यासाठी फिरावे लागणार आहे.चौपदरीकरणाच्या कामात विहीर बाधित झाल्यानंतर प्रशासनाकडून या विहिरीचा मोबदला ग्रामपंचायतीकडे देण्यात आला आहे. प्रशासनाने ग्रामस्थांच्या संभावित पिण्याच्या पाण्याचा प्रश्न लक्षात घेता नवीन विहिरीच्या कामास सुरुवात करणे आवश्यक आहे. या ठिकाणी वहूर गावातील मन्सूर झटाम यांनी चार गुंठे जागा दिली आहे. या जागेत नवीन विहीर करणे आवश्यक आहे. मात्र, या बाबत अद्याप कोणतीच हालचाल दिसून येत नाही. भविष्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न पाहता, पर्यायी व्यवस्था जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत ही विहीर बुजवली जाऊ नये, अशी भूमिका सरपंचांनी घेतली आहे.