शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

नेरळ रस्त्यांचा वाद उफाळला, आयुक्तांकडे तक्रारीची मागणी, नेरळ संघर्ष समितीकडे लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2017 02:21 IST

नेरळमध्ये एमएमआरडीएच्या माध्यमातून होत असलेल्या रस्त्यांची कामे ही निकृष्ट व सदोष असल्याने या रस्त्यांच्या कामाची चौकशी व्हावी व रस्ता एमएमआरडीएने ताब्यात घेऊन करावा, अशी मागणी नागरिकांनी संघर्ष समितीच्या बैठकीत केली आहे.

नेरळ : नेरळमध्ये एमएमआरडीएच्या माध्यमातून होत असलेल्या रस्त्यांची कामे ही निकृष्ट व सदोष असल्याने या रस्त्यांच्या कामाची चौकशी व्हावी व रस्ता एमएमआरडीएने ताब्यात घेऊन करावा, अशी मागणी नागरिकांनी संघर्ष समितीच्या बैठकीत केली आहे. त्यामुळे केवळ रस्त्यांचा मुद्दा घेऊन तयार झालेली नेरळ संघर्ष समिती नेरळकरांना साथ देणार की पाठ दाखवणार, याकडे नेरळकरांचे लक्ष लागले आहे.नेरळ संघर्ष समितीचे अध्यक्ष व सदस्य यांच्यामुळे काही ठिकाणी रस्त्यांची कामे होऊनही बहुतांश निकृष्ट असल्याचे जिल्हा परिषदेच्या बांधकाम खात्याने मान्य केले. त्यामुळे संघर्ष समितीच्या बैठकीत एमएमआरडीएच्या माध्यामातून होत असलेल्या रस्त्यांच्या कामाची चौकशी व्हावी व रस्ता एमएमआरडीएने ताब्यात घेऊन स्वत: करावा, अशी नागरिकांच्या वतीने मागणी करण्यात आली. त्याला समितीने होकार दिला. परंतु अनेक प्रश्नांना बगल देऊन संपन्न झालेल्या बैठकीला संघर्ष समितीचे अध्यक्ष व सदस्य एमएमआरडीए व संबंधित विभागांकडे तक्रार व पाठपुरावा करणार का? नेरळकरांनी केलेल्या मागणीला संघर्ष समिती साथ देणार की पाठ दाखवणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.या वेळी समिती अध्यक्ष रामचंद्र मोरे, नारायण सुर्वे, माधवराव गायकवाड, संजय जाधव, तंटामुक्त समिती अध्यक्ष संतोष मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.नेरळ संघर्ष समितीची बैठक गेल्या महिन्यात नेरळ येथील साने सभागृहात घेण्यात आली. नेरळमध्ये रस्त्यांची कामे होत असताना त्यात अनेक दोष आहेत. हे दोष दुरूस्त करण्यासाठी नागरिकांनी एकत्र येण्याची गरज निर्माण होऊन नेरळ संघर्ष समिती सुरू झाली.

टॅग्स :Raigadरायगड