शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
3
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
4
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपण"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
5
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
6
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
7
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
8
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
9
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
10
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
11
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
12
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
13
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
14
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
15
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
16
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
17
Crime: पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार; नोकरी सोडल्याच्या रागातून क्रूर कृत्य!
18
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
19
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
20
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागात रस्ते दुरुस्तीकडे दुर्लक्ष; डोक्यावर ओझे घेऊन पायपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2018 03:25 IST

कर्जत तालुक्यातील वारे ग्रामपंचायत हद्दीतील जांभूळवाडी, ह-याची वाडी, नवसूची वाडी आदी परिसरातील रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाल्याने येथील वाहतूक सेवेवर परिणाम होत आहे.

नेरळ : कर्जत तालुक्यातील वारे ग्रामपंचायत हद्दीतील जांभूळवाडी, ह-याची वाडी, नवसूची वाडी आदी परिसरातील रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाल्याने येथील वाहतूक सेवेवर परिणाम होत आहे. त्यामुळे या वाड्यांत राहणाºया ग्रामस्थांना डोक्यावर ओझे घेऊन पायपीट करण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही.कर्जतपासून सुमारे तीस किलोमीटर अंतरावर जांभूळवाडी, हºयाची वाडी, नवसूची वाडी या आदिवासी वस्त्या आहेत. कर्जत- मुरबाड राज्य मार्गालगत असलेला कुरुंग ताडवडी खांडस या रस्त्याला जोडून या वाड्या पाड्यांना जोडणारे हे अंतर्गत रस्ते आहेत. सुमारे वीस वर्षांपूर्वी तत्कालीन आमदार देवेंद्र साटम यांच्या आमदार निधीतून झालेले हे रस्ते बांधण्यात आले होते. जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणाºया या रस्त्यांची अनेक वर्षात देखभाल दुरुस्ती झालेली नाही. त्यामुळे त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. जागोजागी मोठमोठे खड्डे पडले असून रस्त्यावरील खडी उखडली आहे. रस्त्यावर वाहन चालविताना चालकांना तारेवरची कसरत करावी लागते. याठिकाणी परिवहन खात्याची बस सेवाही नसल्याने येथील आदिवासींना दळणवळणाची सोय उपलब्ध नाही. तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी प्रथम त्यांना चार ते पाच किलोमीटर अंतर पायी चालून वारे गाव गाठावे लागते, त्यानंतरच त्यांना उपलब्ध वाहनाच्या साह्याने तालुक्याच्या ठिकाणापर्यंत पोहचता येते.अनेकआदिवासी उपजीविकेसाठी शेती, तसेच भाजीपाला लागवड करीत आहेत. मात्र त्यांनी कष्टाने पिकविलेला भाजीपाला विक्रीसाठी बाजारपेठेत नेण्याकरिता खराब रस्त्याअभावी व अन्य वाहतुकीची साधने उपलब्ध नसल्याने डोक्यावर घेऊन मार्गक्र मण करावे लागते. एखाद्या कुटुंबातील व्यक्ती आजारी झाल्यास किंवा महिला गरोदर असल्यास आरोग्य केंद्रात नेण्याकरिता चादरीची झोळी करून चार ते पाच किमी अंतर पार करावयास लागते. आदिवासीवाडीतील रस्त्यांच्या दुरुस्तीकडे स्थानिक प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.गेल्या दहा बारा वर्षपासून आमच्या वाडीचा रास्ता खराब झालाय पण कोणाचेही त्याच्याकडे लक्ष नाही ,रास्ता दुरीस्ती साठी मी स्वता लोकप्रतिनिधी कडे तक्र ार केली आहे पण त्याकडे दुर्लक्ष केले आहे.- मालू पारधी, ग्रामस्थआमच्या वाडीचा रस्त्या वर खड्डे पडल्याने आम्हाला रहदारी करणे मुश्किल झाले आहे ,रास्ता वळणाचा आणी चढ उताराचा असल्याने वाहन चालविणेही अवघड होतं आहे तातडीने प्रशासनाने लक्ष देऊन रास्ता दुरु स्तकरण्याची गरज आहे- पालू वारे, ग्रामस्थ जांभूळ वाडी

टॅग्स :Raigadरायगड