शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
3
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
4
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
5
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
6
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
7
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
8
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
9
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
10
डोनाल्ड ट्रम्प यांचा H-1B व्हिसा बॉम्ब होणार बॅकफायर, अमेरिकेचंच होणार नुकसान, तर भारताचा...
11
सर्वपित्री अमावास्या २०२५: पूर्वज स्मरणासह ‘ही’ कामे अवश्य कराच; पुण्य-वरदान-कृपा लाभेल!
12
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
13
Navratri 2025: नवरात्रीत घट बसवण्याआधी देवघरात 'हे' बदल केले का? नसेल तर आजच करा
14
परदेशात फिरायला जाणाऱ्या प्रवाशांनी शोधली 'ही' नवीन युक्ती; नेमका काय आहे 'फ्लाइंग नेकेड ट्रेंड'?
15
आयडियाची कल्पना! "मला १०० रुपये द्या ना...", गाडी खरेदी करण्यासाठी महिलेचा 'कारनामा'
16
ट्रम्प यांच्या एका निर्णयाने अमेरिकेतील भारतीयांची धाकधूक वाढली; मायक्रोसॉफ्टने कर्मचाऱ्यांना पाठवला तातडीचा ईमेल
17
सर्वार्थ सिद्धी योगात सर्वपित्री अमावास्या २०२५: श्राद्ध विधीचा शुभ मुहूर्त; महत्त्व-मान्यता
18
परदेशी पाहुण्यांशी असलं वागणं शोभतं का? 'टपोरी' मुलाच्या Viral Video वर नेटकरी संतापले
19
Navratri 2025: नवरात्रीला घटस्थापना कशी करावी? जाणून घ्या साहित्य, मुहूर्त आणि शास्त्रोक्त विधी!
20
निलेश साबळेनेच मला बाईचं कॅरेक्टर करायला सांगितलं होतं, भाऊ कदमचा खुलासा

ग्रामीण भागात रस्ते दुरुस्तीकडे दुर्लक्ष; डोक्यावर ओझे घेऊन पायपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2018 03:25 IST

कर्जत तालुक्यातील वारे ग्रामपंचायत हद्दीतील जांभूळवाडी, ह-याची वाडी, नवसूची वाडी आदी परिसरातील रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाल्याने येथील वाहतूक सेवेवर परिणाम होत आहे.

नेरळ : कर्जत तालुक्यातील वारे ग्रामपंचायत हद्दीतील जांभूळवाडी, ह-याची वाडी, नवसूची वाडी आदी परिसरातील रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाल्याने येथील वाहतूक सेवेवर परिणाम होत आहे. त्यामुळे या वाड्यांत राहणाºया ग्रामस्थांना डोक्यावर ओझे घेऊन पायपीट करण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही.कर्जतपासून सुमारे तीस किलोमीटर अंतरावर जांभूळवाडी, हºयाची वाडी, नवसूची वाडी या आदिवासी वस्त्या आहेत. कर्जत- मुरबाड राज्य मार्गालगत असलेला कुरुंग ताडवडी खांडस या रस्त्याला जोडून या वाड्या पाड्यांना जोडणारे हे अंतर्गत रस्ते आहेत. सुमारे वीस वर्षांपूर्वी तत्कालीन आमदार देवेंद्र साटम यांच्या आमदार निधीतून झालेले हे रस्ते बांधण्यात आले होते. जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणाºया या रस्त्यांची अनेक वर्षात देखभाल दुरुस्ती झालेली नाही. त्यामुळे त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. जागोजागी मोठमोठे खड्डे पडले असून रस्त्यावरील खडी उखडली आहे. रस्त्यावर वाहन चालविताना चालकांना तारेवरची कसरत करावी लागते. याठिकाणी परिवहन खात्याची बस सेवाही नसल्याने येथील आदिवासींना दळणवळणाची सोय उपलब्ध नाही. तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी प्रथम त्यांना चार ते पाच किलोमीटर अंतर पायी चालून वारे गाव गाठावे लागते, त्यानंतरच त्यांना उपलब्ध वाहनाच्या साह्याने तालुक्याच्या ठिकाणापर्यंत पोहचता येते.अनेकआदिवासी उपजीविकेसाठी शेती, तसेच भाजीपाला लागवड करीत आहेत. मात्र त्यांनी कष्टाने पिकविलेला भाजीपाला विक्रीसाठी बाजारपेठेत नेण्याकरिता खराब रस्त्याअभावी व अन्य वाहतुकीची साधने उपलब्ध नसल्याने डोक्यावर घेऊन मार्गक्र मण करावे लागते. एखाद्या कुटुंबातील व्यक्ती आजारी झाल्यास किंवा महिला गरोदर असल्यास आरोग्य केंद्रात नेण्याकरिता चादरीची झोळी करून चार ते पाच किमी अंतर पार करावयास लागते. आदिवासीवाडीतील रस्त्यांच्या दुरुस्तीकडे स्थानिक प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.गेल्या दहा बारा वर्षपासून आमच्या वाडीचा रास्ता खराब झालाय पण कोणाचेही त्याच्याकडे लक्ष नाही ,रास्ता दुरीस्ती साठी मी स्वता लोकप्रतिनिधी कडे तक्र ार केली आहे पण त्याकडे दुर्लक्ष केले आहे.- मालू पारधी, ग्रामस्थआमच्या वाडीचा रस्त्या वर खड्डे पडल्याने आम्हाला रहदारी करणे मुश्किल झाले आहे ,रास्ता वळणाचा आणी चढ उताराचा असल्याने वाहन चालविणेही अवघड होतं आहे तातडीने प्रशासनाने लक्ष देऊन रास्ता दुरु स्तकरण्याची गरज आहे- पालू वारे, ग्रामस्थ जांभूळ वाडी

टॅग्स :Raigadरायगड