शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागात रस्ते दुरुस्तीकडे दुर्लक्ष; डोक्यावर ओझे घेऊन पायपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2018 03:25 IST

कर्जत तालुक्यातील वारे ग्रामपंचायत हद्दीतील जांभूळवाडी, ह-याची वाडी, नवसूची वाडी आदी परिसरातील रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाल्याने येथील वाहतूक सेवेवर परिणाम होत आहे.

नेरळ : कर्जत तालुक्यातील वारे ग्रामपंचायत हद्दीतील जांभूळवाडी, ह-याची वाडी, नवसूची वाडी आदी परिसरातील रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाल्याने येथील वाहतूक सेवेवर परिणाम होत आहे. त्यामुळे या वाड्यांत राहणाºया ग्रामस्थांना डोक्यावर ओझे घेऊन पायपीट करण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही.कर्जतपासून सुमारे तीस किलोमीटर अंतरावर जांभूळवाडी, हºयाची वाडी, नवसूची वाडी या आदिवासी वस्त्या आहेत. कर्जत- मुरबाड राज्य मार्गालगत असलेला कुरुंग ताडवडी खांडस या रस्त्याला जोडून या वाड्या पाड्यांना जोडणारे हे अंतर्गत रस्ते आहेत. सुमारे वीस वर्षांपूर्वी तत्कालीन आमदार देवेंद्र साटम यांच्या आमदार निधीतून झालेले हे रस्ते बांधण्यात आले होते. जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणाºया या रस्त्यांची अनेक वर्षात देखभाल दुरुस्ती झालेली नाही. त्यामुळे त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. जागोजागी मोठमोठे खड्डे पडले असून रस्त्यावरील खडी उखडली आहे. रस्त्यावर वाहन चालविताना चालकांना तारेवरची कसरत करावी लागते. याठिकाणी परिवहन खात्याची बस सेवाही नसल्याने येथील आदिवासींना दळणवळणाची सोय उपलब्ध नाही. तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी प्रथम त्यांना चार ते पाच किलोमीटर अंतर पायी चालून वारे गाव गाठावे लागते, त्यानंतरच त्यांना उपलब्ध वाहनाच्या साह्याने तालुक्याच्या ठिकाणापर्यंत पोहचता येते.अनेकआदिवासी उपजीविकेसाठी शेती, तसेच भाजीपाला लागवड करीत आहेत. मात्र त्यांनी कष्टाने पिकविलेला भाजीपाला विक्रीसाठी बाजारपेठेत नेण्याकरिता खराब रस्त्याअभावी व अन्य वाहतुकीची साधने उपलब्ध नसल्याने डोक्यावर घेऊन मार्गक्र मण करावे लागते. एखाद्या कुटुंबातील व्यक्ती आजारी झाल्यास किंवा महिला गरोदर असल्यास आरोग्य केंद्रात नेण्याकरिता चादरीची झोळी करून चार ते पाच किमी अंतर पार करावयास लागते. आदिवासीवाडीतील रस्त्यांच्या दुरुस्तीकडे स्थानिक प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.गेल्या दहा बारा वर्षपासून आमच्या वाडीचा रास्ता खराब झालाय पण कोणाचेही त्याच्याकडे लक्ष नाही ,रास्ता दुरीस्ती साठी मी स्वता लोकप्रतिनिधी कडे तक्र ार केली आहे पण त्याकडे दुर्लक्ष केले आहे.- मालू पारधी, ग्रामस्थआमच्या वाडीचा रस्त्या वर खड्डे पडल्याने आम्हाला रहदारी करणे मुश्किल झाले आहे ,रास्ता वळणाचा आणी चढ उताराचा असल्याने वाहन चालविणेही अवघड होतं आहे तातडीने प्रशासनाने लक्ष देऊन रास्ता दुरु स्तकरण्याची गरज आहे- पालू वारे, ग्रामस्थ जांभूळ वाडी

टॅग्स :Raigadरायगड