शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

कचरा वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या देखभालीकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2020 23:41 IST

नवी मुंबईत पर्यावरणाची हानी; निष्काळजीपणा करणाºया ठेकेदाराला प्रशासनाचेच अभय

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : शहरातील कचरा वाहतूक करणाºया वाहनांची दुरवस्था झाली आहे. वाहनांमधून कचरा रस्त्यावर पडू लागला आहे. पर्यावरणाची हानी होत असून, नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ठेकेदार दुरुस्तीकडे दुर्लक्ष करत असूनही मनपा प्रशासन काहीही ठोस कारवाई करत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.नवी मुंबई महानगरपालिकेने २०१५ मध्ये कचरा वाहतुकीचा ठेका खासगी कंपनीला दिला आहे. ठेकेदाराला बांधा, वापरा व हस्तांतर करा, या तत्त्वावर वाहने उपलब्ध करण्यास सांगितले आहे. सद्यस्थितीमध्ये जवळपास ६५ मोठी व ८५ लहान वाहनांमधून कचरा वाहतूक केली जात आहे. ठेकेदाराने सात वर्षे या वाहनांचा वापर करून ती महानगरपालिकेला हस्तांतर करणे अपेक्षित आहे, परंतु पाच वर्षांतच अनेक वाहनांची दुरवस्था झाली आहे. वाहनांमधून कचरा रोडवर पडत आहे. ओला कचºयातून दुर्गंधीयुक्त पाणी रोडवर पडत आहे. काही वाहनांचे आरसे, काचा तुटल्या आहेत. ठेकेदार दुरुस्तीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे. नादुरुस्त वाहनांमधून कचरा वाहतूक केल्यामुळे प्रदुषणात वाढ होत आहे. नागरिकांच्या विशेषत: कचरा वाहतुकीच्या वाहनांवर काम करणाºया कर्मचाऱ्यांच्या आरोग्यावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. समाज समता कर्मचारी संघटनेनेही या प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.वाहनांची नियमित देखभाल, दुरुस्ती करणे ही ठेकेदाराची जबाबदारी आहे. ठेकेदार व्यवस्थित काम करत नसेल, तर महानगरपालिकेने त्याच्यावर कारवाई करणे अपेक्षीत आहे, परंतु प्रशासनान निष्काळजीपणा करणाºया ठेकेदारावर कोणतीही ठोस कारवाई करत नाही. अशीच परिस्थिती राहिली, तर पुढील दोन वर्षांत वाहने खिळखिळी होतील व भंगार वाहनांमधून कचरा वाहतूक करणे अशक्य होईल. पुन्हा कोट्यवधी रुपये खर्च करून नवीन वाहने विकत घ्यावी लागणार आहेत.कामगार संघटनेने हा विषय निदर्शनास आणून दिल्यानंतर घनकचरा विभागाचे उपायुक्त बाबासाहेब राजळे यांनी वाहने दुरुस्त करून घेण्याचे आश्वासन दिले आहे.नागरिक नाराजच्नवी मुंबई महानगरपालिकेला स्वच्छता अभियानात देशात तिसरा क्रमांक आला आहे. घनकचरा व्यवस्थापनात यापूर्वी देशात पहिला क्रमांक आला आहे.च्नवी मुंबईसारख्या स्वच्छ शहरात घनकचरा वाहतूक करणाºया वाहनांची योग्य देखभाल होत नसल्याबद्दल नागरिकांनी ही नाराजी व्यक्त केली आहे.च्महानगरपालिकेने त्वरित याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.