शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी हमासला दिला निर्वाणीचा इशारा, म्हणाले, आता आणखी उशीर नको, अन्यथा...
2
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
3
युरोपपर्यंत पोहोचले बंडाचे वारे, या देशात आंदोलक रस्त्यावर, राष्ट्रपती भवनाला घेराव, पोलिसांसोबत संघर्ष
4
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
5
रोहित शर्माच्या कप्तानीसोबत या दोन सिनियर खेळाडूंच्या वनडे कारकिर्दीलाही निवड समितीने दिला पूर्णविराम? 
6
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे शिर्डी विमानतळावर आगमन
7
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
8
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
9
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
10
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
11
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
12
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
13
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
14
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

कचरा वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या देखभालीकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2020 23:41 IST

नवी मुंबईत पर्यावरणाची हानी; निष्काळजीपणा करणाºया ठेकेदाराला प्रशासनाचेच अभय

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : शहरातील कचरा वाहतूक करणाºया वाहनांची दुरवस्था झाली आहे. वाहनांमधून कचरा रस्त्यावर पडू लागला आहे. पर्यावरणाची हानी होत असून, नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ठेकेदार दुरुस्तीकडे दुर्लक्ष करत असूनही मनपा प्रशासन काहीही ठोस कारवाई करत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.नवी मुंबई महानगरपालिकेने २०१५ मध्ये कचरा वाहतुकीचा ठेका खासगी कंपनीला दिला आहे. ठेकेदाराला बांधा, वापरा व हस्तांतर करा, या तत्त्वावर वाहने उपलब्ध करण्यास सांगितले आहे. सद्यस्थितीमध्ये जवळपास ६५ मोठी व ८५ लहान वाहनांमधून कचरा वाहतूक केली जात आहे. ठेकेदाराने सात वर्षे या वाहनांचा वापर करून ती महानगरपालिकेला हस्तांतर करणे अपेक्षित आहे, परंतु पाच वर्षांतच अनेक वाहनांची दुरवस्था झाली आहे. वाहनांमधून कचरा रोडवर पडत आहे. ओला कचºयातून दुर्गंधीयुक्त पाणी रोडवर पडत आहे. काही वाहनांचे आरसे, काचा तुटल्या आहेत. ठेकेदार दुरुस्तीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे. नादुरुस्त वाहनांमधून कचरा वाहतूक केल्यामुळे प्रदुषणात वाढ होत आहे. नागरिकांच्या विशेषत: कचरा वाहतुकीच्या वाहनांवर काम करणाºया कर्मचाऱ्यांच्या आरोग्यावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. समाज समता कर्मचारी संघटनेनेही या प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.वाहनांची नियमित देखभाल, दुरुस्ती करणे ही ठेकेदाराची जबाबदारी आहे. ठेकेदार व्यवस्थित काम करत नसेल, तर महानगरपालिकेने त्याच्यावर कारवाई करणे अपेक्षीत आहे, परंतु प्रशासनान निष्काळजीपणा करणाºया ठेकेदारावर कोणतीही ठोस कारवाई करत नाही. अशीच परिस्थिती राहिली, तर पुढील दोन वर्षांत वाहने खिळखिळी होतील व भंगार वाहनांमधून कचरा वाहतूक करणे अशक्य होईल. पुन्हा कोट्यवधी रुपये खर्च करून नवीन वाहने विकत घ्यावी लागणार आहेत.कामगार संघटनेने हा विषय निदर्शनास आणून दिल्यानंतर घनकचरा विभागाचे उपायुक्त बाबासाहेब राजळे यांनी वाहने दुरुस्त करून घेण्याचे आश्वासन दिले आहे.नागरिक नाराजच्नवी मुंबई महानगरपालिकेला स्वच्छता अभियानात देशात तिसरा क्रमांक आला आहे. घनकचरा व्यवस्थापनात यापूर्वी देशात पहिला क्रमांक आला आहे.च्नवी मुंबईसारख्या स्वच्छ शहरात घनकचरा वाहतूक करणाºया वाहनांची योग्य देखभाल होत नसल्याबद्दल नागरिकांनी ही नाराजी व्यक्त केली आहे.च्महानगरपालिकेने त्वरित याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.