शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

कचरा वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या देखभालीकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2020 23:41 IST

नवी मुंबईत पर्यावरणाची हानी; निष्काळजीपणा करणाºया ठेकेदाराला प्रशासनाचेच अभय

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : शहरातील कचरा वाहतूक करणाºया वाहनांची दुरवस्था झाली आहे. वाहनांमधून कचरा रस्त्यावर पडू लागला आहे. पर्यावरणाची हानी होत असून, नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ठेकेदार दुरुस्तीकडे दुर्लक्ष करत असूनही मनपा प्रशासन काहीही ठोस कारवाई करत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.नवी मुंबई महानगरपालिकेने २०१५ मध्ये कचरा वाहतुकीचा ठेका खासगी कंपनीला दिला आहे. ठेकेदाराला बांधा, वापरा व हस्तांतर करा, या तत्त्वावर वाहने उपलब्ध करण्यास सांगितले आहे. सद्यस्थितीमध्ये जवळपास ६५ मोठी व ८५ लहान वाहनांमधून कचरा वाहतूक केली जात आहे. ठेकेदाराने सात वर्षे या वाहनांचा वापर करून ती महानगरपालिकेला हस्तांतर करणे अपेक्षित आहे, परंतु पाच वर्षांतच अनेक वाहनांची दुरवस्था झाली आहे. वाहनांमधून कचरा रोडवर पडत आहे. ओला कचºयातून दुर्गंधीयुक्त पाणी रोडवर पडत आहे. काही वाहनांचे आरसे, काचा तुटल्या आहेत. ठेकेदार दुरुस्तीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे. नादुरुस्त वाहनांमधून कचरा वाहतूक केल्यामुळे प्रदुषणात वाढ होत आहे. नागरिकांच्या विशेषत: कचरा वाहतुकीच्या वाहनांवर काम करणाºया कर्मचाऱ्यांच्या आरोग्यावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. समाज समता कर्मचारी संघटनेनेही या प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.वाहनांची नियमित देखभाल, दुरुस्ती करणे ही ठेकेदाराची जबाबदारी आहे. ठेकेदार व्यवस्थित काम करत नसेल, तर महानगरपालिकेने त्याच्यावर कारवाई करणे अपेक्षीत आहे, परंतु प्रशासनान निष्काळजीपणा करणाºया ठेकेदारावर कोणतीही ठोस कारवाई करत नाही. अशीच परिस्थिती राहिली, तर पुढील दोन वर्षांत वाहने खिळखिळी होतील व भंगार वाहनांमधून कचरा वाहतूक करणे अशक्य होईल. पुन्हा कोट्यवधी रुपये खर्च करून नवीन वाहने विकत घ्यावी लागणार आहेत.कामगार संघटनेने हा विषय निदर्शनास आणून दिल्यानंतर घनकचरा विभागाचे उपायुक्त बाबासाहेब राजळे यांनी वाहने दुरुस्त करून घेण्याचे आश्वासन दिले आहे.नागरिक नाराजच्नवी मुंबई महानगरपालिकेला स्वच्छता अभियानात देशात तिसरा क्रमांक आला आहे. घनकचरा व्यवस्थापनात यापूर्वी देशात पहिला क्रमांक आला आहे.च्नवी मुंबईसारख्या स्वच्छ शहरात घनकचरा वाहतूक करणाºया वाहनांची योग्य देखभाल होत नसल्याबद्दल नागरिकांनी ही नाराजी व्यक्त केली आहे.च्महानगरपालिकेने त्वरित याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.