शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे रमी खेळतानाचा व्हिडिओ काढला तरी कुणी? मंत्री, परममित्र की...? चर्चांना उधाण
2
"एकनाथ शिंदेंची ताकद ८ आमदारांची होती, इतर जे गेले ते..."; संजय राऊतांचा नवा दावा
3
₹८,१०० च्या वर जाऊ शकतो केबल बनवणाऱ्या कंपनीचा स्टॉक; बाजारातील चढ-उतारादरम्यान या ५ स्टॉक्सवर एक्सपर्ट बुलिश
4
आणखी एका मंत्र्याचा आज राजीनामा?; वादामुळे महायुती सरकार बॅकफूटवर, अजित पवारांची कोंडी
5
Jagdeep Dhankhar: भारताच्या उपराष्ट्रपतींना पगार किती मिळतो? पद सोडल्यानंतरही या सुविधा मिळतात
6
'मी दबावाखाली काम करत नाही'; जगदीप धनखड यांनी असे का म्हटले?, राजीनाम्यानंतर व्हिडीओ व्हायरल
7
डॉ निलेश साबळेची 'स्टार प्रवाह'वर दमदार एन्ट्री, 'शिट्टी वाजली रे'च्या अंतिम सोहळ्याला हजेरी; प्रोमो पाहिलात का?
8
आज न्यायाची हत्या झाली... बॉम्ब स्फोटातील जखमीने व्यक्त केली खंत, निर्णयाने धक्का
9
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याचं टायमिंग अनेकांना न पटण्यासारखे; 'त्या' ३ तासांत काय घडले?
10
"ऑपरेशन झाल्यावर २९ गाठी आढळल्या.."; अभिनेते विजय पटवर्धन यांच्या पत्नीला झालेला कॅन्सर, सांगितला अनुभव
11
Stock Market Today: ३२७ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; Zomato मध्ये बंपर तेजी, बँक आणि रियल्टीमध्ये तेजी
12
मुंबई बॉम्बस्फोट: ९ वर्षे जगण्यासाठी झुंजला पराग सावंत, कुटुंबियांना आजही दु:ख
13
राजनाथ सिंह यांच्याकडे राजकीय हालचालींना वेग; भाजपा खासदाराच्या कोऱ्या कागदावर का घेतल्या सह्या?
14
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये फक्त ४ वर्ष भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरंटी, आणखीही बेनिफिट्स मिळणार
15
चातुर्मासातील पहिली शिवरात्री: शिवपूजन कसे करावे? व्रताचरणाची सोपी पद्धत; मिळेल सुख-लाभ!
16
एकदा- दोनदा नाही, एअर इंडियाला सहा महिन्यात ९ कारणे दाखवा नोटीस बजावल्या; सरकारची माहिती
17
२ शत्रू ग्रहांची युती: ९ राशींचे कल्याण, दुपटीने लाभ; पद-पैसा वृद्धी, राजयोगांचा वरदान काळ!
18
४ मुलांच्या आईनं २४ वर्षाच्या युवकाशी केलं कोर्ट मॅरेज; पतीनं सोडला सुटकेचा नि:श्वास, म्हणाला...
19
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
20
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल

अत्यवस्थ रुग्णांना मिळणार नवसंजीवनी , रुग्णवाहिका सागरी बोटींचा प्रस्ताव तयार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2017 02:54 IST

सरकारी रुग्णालयातून अत्यवस्थ असणा-या रुग्णांना आता अत्याधुनिक ‘रुग्णवाहिका सागरी बोटीची’ (बोट अ‍ॅम्ब्युलन्स) सुविधा पुरवण्यावर जिल्हा प्रशासन गांभीर्याने विचार करीत आहे. यासाठी तब्बल दोन कोटी ६७ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

आविष्कार देसाईअलिबाग : येथील सरकारी रुग्णालयातून अत्यवस्थ असणा-या रुग्णांना आता अत्याधुनिक ‘रुग्णवाहिका सागरी बोटीची’ (बोट अ‍ॅम्ब्युलन्स) सुविधा पुरवण्यावर जिल्हा प्रशासन गांभीर्याने विचार करीत आहे. यासाठी तब्बल दोन कोटी ६७ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. याबाबतचा प्रस्ताव जिल्हा सरकारी रुग्णालयाने तयार केला आहे. कमी वेळेत मुंबईमधील आरोग्य सेवा उपलब्ध होणार आहे. हीयोजना प्रत्यक्षात सुरू झाल्यास अत्यवस्थ रुग्णांना नवसंजीवनी मिळणार आहे.रायगड जिल्हा हा औद्योगिक तसेच पर्यटनाचा जिल्हा आहे. याच जिल्ह्यातून मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग, मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग, कोकण रेल्वे, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग, अलिबाग-वडखळ राष्ट्रीय महामार्ग जातो. त्याचप्रमाणे येऊ घातलेला समृद्धी मार्ग, दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडोर, ट्रान्स हार्बर लिंक अशा विविध मार्गांचा समावेश आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विकासकामे केली जात आहे, तर काही नजीकच्या कालावधीत सुरू होणार आहेत. जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात एमआयडीसी प्रकल्प आहेत. त्याचप्रमाणे नवरतन कंपन्यांपैकी गेल, एचपी, आयपीसीएल, आरसीएफ अशा कंपन्यांही आहेत. त्यामुळे जिल्ह्याची लोकसंख्या वाढलेली आहे.आरोग्य व्यवस्थेवर त्याचा परिणाम होत असतानाच त्यामध्ये सुधारणा करणे हे अतिशय महत्त्वाचे असल्याचे जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी यांनी सुरुवातीलाच ओळखले होते. त्यानुसार त्यांनी जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सुविधा सुधारण्यावर भर दिला आहे.रायगड जिल्ह्याचे मुख्यालय अलिबाग येथे आहे. त्याच ठिकाणी जिल्हा सरकारी रुग्णालय आहे. या रुग्णालयामध्ये जिल्ह्याच्या विविध भागातून उपचारासाठी रुग्ण येत असतात. त्याचप्रमाणे ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये येथूनही पुढील उपचारासाठी रुग्ण येत असतात. या ठिकाणी येणारे रुग्ण अत्यवस्थ झाले, तर त्यांना अधिक उपचारासाठी मुंबई येथे न्यावे लागते. अलिबाग-मुंबई हे अंतर १२० किलोमीटर आहे. त्यामुळे किमान चार तासांचा अवधी लागतो.रुग्णासाठी तर, प्रत्येक सेकंद महत्त्वाचा असतो. त्यामुळे रुग्णांना लवकरात लवकर उपचार मिळण्यासाठी कमी अवधीमध्ये मुंबई येथे पोचणे गरजेचे आहे. त्यासाठी सागरी मार्गाच्या पर्यायाची संकल्पना जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अजित गवळी यांनी मांडली. त्यानुसार जिल्हा सरकारी रुग्णालयाने त्याबाबतचा प्रस्ताव तयार केला. तो सरकारला मान्यतेसाठी पाठवण्यात आला आहे. शुक्रवारी याबाबतची बैठक पार पडली, त्यावर सकारात्मक चर्चा झाली. यासाठी विविध योजनेतील निधी, तसेच कंपन्यांच्या सीएसआरमधून निधी उभारण्यात येणार आहे.अलिबागवरून रुग्णांना मांडवा जेटीवरून ‘रुग्णवाहिका सागरी बोटीने’ गेटवे आॅफ इंडिया येथूून मुंबईतील रुग्णालयामध्ये सोडण्यात येणार आहे. मांडवा ते गेटवे आॅफ इंडिया हे सागरी अंतर २५ कि.मी. आहे. त्यासाठी एका तासाचा अवधी लागणार आहे. अलिबाग ते मांडवा २१ कि.मी.साठी पाऊण तास असे एकूण पावणे दोन तासांत मुंबईला पोहोेचता येणार आहे.अ‍ॅम्ब्युलन्स बोटचालक (तांडेल) पद संख्या तीन प्रतितांडेल २० हजार रुपये असा एक महिन्याचा खर्च ६० हजार रुपये, बोटीवर तीन खलाशी लागणार आहेत. त्यांना प्रतिखलाशी १५ हजार असा ४५ हजार रुपये खर्च होणार आहेत. दोन वैद्यकीय अधिकारी एमबीबीएस असल्यास ५० हजार प्रतिमहिना, बीएचएमएस असल्यास ३० हजार रुपये प्रतिमहिना, दोन मदतनिसांसाठी प्रतिमहिना २० हजार रुपये खर्च होणार आहेत.अत्याधुनिक सुविधांनी युक्त असणाºया या अ‍ॅम्ब्युलन्स बोटीमध्ये मेडिकल रूम, मेडिकल स्टोर, आॅक्सिजन सिलिंडर, पिण्याचे पाणी, जनरल स्टोर, वॉश रुम, टॉयलेटची सुविधा राहणार आहे. त्याचप्रमाणे ही बोट संपूर्ण वातानुकूलित राहणार आहे. किमान सात व्यक्तींची सोय आहे. त्याचप्रमाणे या बोटीवर जीपीएस ट्रॅकिंग डिव्हाइसही बसवण्यात येणार आहे. तसेच जनरेटची सुविधाही देण्यात येणार आहे.बोट १२ नॉटिकल माईलने पाण्यातून जाणार असल्याने मांडवा ते गेटवे आॅफ इंडिया हे २५ किमीचे अंतर अवघ्या एक तासात पूर्ण करणार आहे. दक्षिण भारतात अशी बोट अ‍ॅम्ब्युलन्स सेवा सुरू आहे. आता रायगड जिल्ह्यात सुरू होणार आहे.सरकारी रुग्णालयातून मुंबई येथे अधिक उपचारासाठी दिवसाला किमान चार अत्यवस्थ रुग्ण पाठवले जातात. २०१२-१३ या कालावधीत ११७६ रुग्ण मुंबईतील रुग्णालयात नेले होते. २०१३-१४ या कालावधीत १२२४, २०१४-१५ मध्ये १२६२, २०१५-१६ या कालावधीत १४१७ आणि २०१६-१७, १२४३ असे एकूण ६३२२ रुग्णांचा समावेश होता.

टॅग्स :Raigadरायगड