शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

महाकाय कचऱ्यामुळे जिल्हा आपत्तीच्या उंबरठ्यावर, कचरा विल्हेवाट केंद्र उभारण्याची गरज

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2018 03:18 IST

रायगड जिल्ह्यात मोठ्या संख्येने नागरीकरण वाढत आहे. त्यामुळे जिल्ह्यात निर्माण होणाºया कचºयाचे प्रमाण हे दिवसाला सुमारे १५० टनापेक्षा अधिक आहे.

- आविष्कार देसाईअलिबाग : रायगड जिल्ह्यात मोठ्या संख्येने नागरीकरण वाढत आहे. त्यामुळे जिल्ह्यात निर्माण होणाºया कचºयाचे प्रमाण हे दिवसाला सुमारे १५० टनापेक्षा अधिक आहे. पैकी ८० टन कचºयाचे विघटनच होत नसल्याचे वास्तव असल्याने जिल्हा फार मोठ्या आपत्तीच्या उंबरठ्यावर उभा आहे.जिल्ह्यात निर्माण होणाºया कचºयाची विल्हेवाट लावण्याची सक्षम यंत्रणाच नसल्याने परिस्थिती गंभीर आहे. मध्यंतरी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी विविध नगर पालिकेचे नगराध्यक्ष, मुख्याधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी यांची भेट घेऊन कचºयाच्या प्रश्नी आवश्यक ती मदत करणार असल्याचे सांगितले होते. त्याला प्रतिसाद म्हणून डम्पिंग ग्राउंडच्या जागेसाठी जिल्हा प्रशासनाकडे आतापर्यंत फक्त सातच प्रस्ताव आले आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील स्वच्छ भारत अभियान जिल्ह्यात राबवून सरकारी कार्यालये, विविध आस्थापने चकाचक करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानमार्फत वेळोवेळी जिल्हाभर स्वच्छता मोहीम राबवून मोठ्या प्रमाणात कचरा काढण्यात येतो. या सर्व अभियानातून मोठ्या संख्येने कचरा गोळा केला जातो. मात्र, त्यात्या ठिकाणी डम्पिंग ग्राउंड नसल्यामुळे कचरा टाकायचा कोठे आणि त्याची विल्हेवाट लावायची कशी असा प्रश्न पडतो.जिल्ह्यामध्ये दररोज सुमारे १५० टन कचरा निर्माण होतो. पैकी ८० टन कचºयाचे विघटनच होत नाही. नगर पालिका डम्पिंग ग्राउंडसाठी जागेची मागणी करतात. मात्र, लगतच्या ग्रामपंचायती त्यांच्या प्रस्तावाला विरोध करतात, असे भाजपाचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष सतीश धारप यांनी सांगितले. धारप यांनी तीन वर्षांपूर्वी कचºयाच्या गंभीर समस्येबाबत जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधले होते.डम्पिंग ग्राउंडसाठी जमीन मागण्यापेक्षा जिल्हा परिषदेसाठी एक कचरा विल्हेवाट केंद्र उभारण्याची खरी गरज आहे. त्यानंतर पुढील पाच वर्षांमध्ये ९ जिल्हा परिषद गटासाठी एक याप्रमाणे पाच कचरा विल्हेवाट केंद्र उभारण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याकडेही धारप यांनी लक्ष वेधले. स्वच्छ भारत अभियानांतर्गत या कचरा विल्हेवाट केंद्रासाठी निधी प्राप्त होण्यात कोणतीच अडचण राहणार नाही आणि असे झाले तर वैयक्तिक डम्पिंग ग्राउंडच्या मागणीचा प्रश्नच राहणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.डम्पिंग ग्राउंडच्या जागेच्या मागणीसाठी आलेले प्रस्तावअलिबाग तालुक्यातील आंबेपूर ग्रामपंचायतीने ताडवागळे येथे ६८ गुंठे जागेची मागणी केली आहे. माणगाव तालुक्यातील माणगाव नगर पंचायतीने उतेखोर येथे एक हेक्टर तीन गुंठे जागा मिळावी असा प्रस्ताव दिलेला आहे. तळा तालुक्यातील अंबोली येथील एक हेक्टर चार गुंठे, माथेरान नगर परिषदेने ५९ गुंठे, खालापूर तालुक्यात महड येथील सहा हेक्टर ९५ गुंठे, खालापूर तालुक्यातीलच तुपेगाव ग्रामपंचायतीने १० गुंठे आणि नेरळ ग्रामपंचायतीने नेरळ येथे एक हेक्टर ९० गुंठे जागेच्या मागणीचा प्रस्ताव दिला आहे. नागरी घनकचरा व्यवस्थापन व हाताळणी समिती जागा देण्यासंदर्भात निर्णय घेणार आहे. ते प्रस्ताव पुढील कार्यवाहीसाठी सरकारकडे पाठवणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

टॅग्स :Raigadरायगड