शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

महाकाय कचऱ्यामुळे जिल्हा आपत्तीच्या उंबरठ्यावर, कचरा विल्हेवाट केंद्र उभारण्याची गरज

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2018 03:18 IST

रायगड जिल्ह्यात मोठ्या संख्येने नागरीकरण वाढत आहे. त्यामुळे जिल्ह्यात निर्माण होणाºया कचºयाचे प्रमाण हे दिवसाला सुमारे १५० टनापेक्षा अधिक आहे.

- आविष्कार देसाईअलिबाग : रायगड जिल्ह्यात मोठ्या संख्येने नागरीकरण वाढत आहे. त्यामुळे जिल्ह्यात निर्माण होणाºया कचºयाचे प्रमाण हे दिवसाला सुमारे १५० टनापेक्षा अधिक आहे. पैकी ८० टन कचºयाचे विघटनच होत नसल्याचे वास्तव असल्याने जिल्हा फार मोठ्या आपत्तीच्या उंबरठ्यावर उभा आहे.जिल्ह्यात निर्माण होणाºया कचºयाची विल्हेवाट लावण्याची सक्षम यंत्रणाच नसल्याने परिस्थिती गंभीर आहे. मध्यंतरी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी विविध नगर पालिकेचे नगराध्यक्ष, मुख्याधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी यांची भेट घेऊन कचºयाच्या प्रश्नी आवश्यक ती मदत करणार असल्याचे सांगितले होते. त्याला प्रतिसाद म्हणून डम्पिंग ग्राउंडच्या जागेसाठी जिल्हा प्रशासनाकडे आतापर्यंत फक्त सातच प्रस्ताव आले आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील स्वच्छ भारत अभियान जिल्ह्यात राबवून सरकारी कार्यालये, विविध आस्थापने चकाचक करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानमार्फत वेळोवेळी जिल्हाभर स्वच्छता मोहीम राबवून मोठ्या प्रमाणात कचरा काढण्यात येतो. या सर्व अभियानातून मोठ्या संख्येने कचरा गोळा केला जातो. मात्र, त्यात्या ठिकाणी डम्पिंग ग्राउंड नसल्यामुळे कचरा टाकायचा कोठे आणि त्याची विल्हेवाट लावायची कशी असा प्रश्न पडतो.जिल्ह्यामध्ये दररोज सुमारे १५० टन कचरा निर्माण होतो. पैकी ८० टन कचºयाचे विघटनच होत नाही. नगर पालिका डम्पिंग ग्राउंडसाठी जागेची मागणी करतात. मात्र, लगतच्या ग्रामपंचायती त्यांच्या प्रस्तावाला विरोध करतात, असे भाजपाचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष सतीश धारप यांनी सांगितले. धारप यांनी तीन वर्षांपूर्वी कचºयाच्या गंभीर समस्येबाबत जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधले होते.डम्पिंग ग्राउंडसाठी जमीन मागण्यापेक्षा जिल्हा परिषदेसाठी एक कचरा विल्हेवाट केंद्र उभारण्याची खरी गरज आहे. त्यानंतर पुढील पाच वर्षांमध्ये ९ जिल्हा परिषद गटासाठी एक याप्रमाणे पाच कचरा विल्हेवाट केंद्र उभारण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याकडेही धारप यांनी लक्ष वेधले. स्वच्छ भारत अभियानांतर्गत या कचरा विल्हेवाट केंद्रासाठी निधी प्राप्त होण्यात कोणतीच अडचण राहणार नाही आणि असे झाले तर वैयक्तिक डम्पिंग ग्राउंडच्या मागणीचा प्रश्नच राहणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.डम्पिंग ग्राउंडच्या जागेच्या मागणीसाठी आलेले प्रस्तावअलिबाग तालुक्यातील आंबेपूर ग्रामपंचायतीने ताडवागळे येथे ६८ गुंठे जागेची मागणी केली आहे. माणगाव तालुक्यातील माणगाव नगर पंचायतीने उतेखोर येथे एक हेक्टर तीन गुंठे जागा मिळावी असा प्रस्ताव दिलेला आहे. तळा तालुक्यातील अंबोली येथील एक हेक्टर चार गुंठे, माथेरान नगर परिषदेने ५९ गुंठे, खालापूर तालुक्यात महड येथील सहा हेक्टर ९५ गुंठे, खालापूर तालुक्यातीलच तुपेगाव ग्रामपंचायतीने १० गुंठे आणि नेरळ ग्रामपंचायतीने नेरळ येथे एक हेक्टर ९० गुंठे जागेच्या मागणीचा प्रस्ताव दिला आहे. नागरी घनकचरा व्यवस्थापन व हाताळणी समिती जागा देण्यासंदर्भात निर्णय घेणार आहे. ते प्रस्ताव पुढील कार्यवाहीसाठी सरकारकडे पाठवणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

टॅग्स :Raigadरायगड