शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
4
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
5
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
6
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
7
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
8
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
9
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
10
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
11
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
12
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
13
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
14
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
15
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
16
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
17
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
18
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
19
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

कोकणातील वाहून जाणाऱ्या पाण्याच्या योग्य नियोजनाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2019 01:46 IST

रायगड जिल्ह्यावर निर्सगाने मुक्त हस्ते पावसाची उधळण केलेली असताना पाणी अडवण्यात मात्र अपयश आल्याचे दिसून येते.

- आविष्कार देसाईअलिबाग : रायगड जिल्ह्यावर निर्सगाने मुक्त हस्ते पावसाची उधळण केलेली असताना पाणी अडवण्यात मात्र अपयश आल्याचे दिसून येते. मोठ्या संख्येने पडणाºया पावसाचे पाणी अडवण्यासाठी नव्याने जिल्ह्यात एकाही धरणाची निर्मिती झालेली नाही. उलट प्रस्तावित असणारी धरणे कागदावरच रखडली आहेत. सरकार, जिल्हा प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या अपयशामुळेच जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये डिसेंबर अखेरपासूनच पाणीटंचाईच्या झळा बसण्यास सुरुवात होते. जिल्हा प्रशासनाला टंचाई दूर करण्यासाठी दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करावे लागतात. त्याचप्रमाणे कोट्यवधी रुपये जलयुक्त शिवार योजनेवर खर्च करत आहे.पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष असताना शेतीला पाणी कोठून मिळणार. जिल्ह्यात पुरेशी धरण नसल्याने शेतांमध्येही शेतकऱ्यांना केवळ एकच पीक घ्यावे लागत आहे. पाण्याची व्यवस्था झाल्यास शेतकºयांना दुबार आणि तिबार पीक आपापल्या शेतात घेता येतील आणि शेतकरीही आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल; परंतु कायमस्वरूपी उपाययोजनांबाबत कोणीच आवाज उठवत नसल्याचे चित्र आहे. नवीन प्रकल्प उभारण्यासाठी सरकारकडे निधीच शिल्लक नसल्याने जिल्ह्यातील मोठी धरण पूर्ण होताना दिसत नाहीत. रायगड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडूनही पाण्याचे योग्य नियोजन होत नाही. प्रशासन, सरकार आणि लोकप्रतिनिधी यांनी याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.आपल्याकडे मोठ्या प्रमाणात पाऊस पडूनही पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. दरवर्षी अशीच परिस्थिती निर्माण होत असल्याने जिल्ह्यातील सांबरकुंड, सारल घोळ यासह अन्य रखडलेली धरणे पूर्ण झाली पाहिजेत, प्रत्येक तालुक्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडतो त्यासाठी प्रत्येक तालुक्यात एक धरण उभारले पाहिजे.- राजन भगत, श्रमिक मुक्ती दल

टॅग्स :konkanकोकणRainपाऊस