शहरं
Join us  
Trending Stories
1
आषाढी एकादशी सोहळा; मुख्यमंत्र्यांची शासकीय महापूजा; नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
2
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
3
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
4
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
5
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
6
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
7
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
8
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
9
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
10
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
11
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
12
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
13
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
14
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
15
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
16
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
17
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
18
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
19
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
20
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...

कोकणातील वाहून जाणाऱ्या पाण्याच्या योग्य नियोजनाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2019 01:46 IST

रायगड जिल्ह्यावर निर्सगाने मुक्त हस्ते पावसाची उधळण केलेली असताना पाणी अडवण्यात मात्र अपयश आल्याचे दिसून येते.

- आविष्कार देसाईअलिबाग : रायगड जिल्ह्यावर निर्सगाने मुक्त हस्ते पावसाची उधळण केलेली असताना पाणी अडवण्यात मात्र अपयश आल्याचे दिसून येते. मोठ्या संख्येने पडणाºया पावसाचे पाणी अडवण्यासाठी नव्याने जिल्ह्यात एकाही धरणाची निर्मिती झालेली नाही. उलट प्रस्तावित असणारी धरणे कागदावरच रखडली आहेत. सरकार, जिल्हा प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या अपयशामुळेच जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये डिसेंबर अखेरपासूनच पाणीटंचाईच्या झळा बसण्यास सुरुवात होते. जिल्हा प्रशासनाला टंचाई दूर करण्यासाठी दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करावे लागतात. त्याचप्रमाणे कोट्यवधी रुपये जलयुक्त शिवार योजनेवर खर्च करत आहे.पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष असताना शेतीला पाणी कोठून मिळणार. जिल्ह्यात पुरेशी धरण नसल्याने शेतांमध्येही शेतकऱ्यांना केवळ एकच पीक घ्यावे लागत आहे. पाण्याची व्यवस्था झाल्यास शेतकºयांना दुबार आणि तिबार पीक आपापल्या शेतात घेता येतील आणि शेतकरीही आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल; परंतु कायमस्वरूपी उपाययोजनांबाबत कोणीच आवाज उठवत नसल्याचे चित्र आहे. नवीन प्रकल्प उभारण्यासाठी सरकारकडे निधीच शिल्लक नसल्याने जिल्ह्यातील मोठी धरण पूर्ण होताना दिसत नाहीत. रायगड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडूनही पाण्याचे योग्य नियोजन होत नाही. प्रशासन, सरकार आणि लोकप्रतिनिधी यांनी याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.आपल्याकडे मोठ्या प्रमाणात पाऊस पडूनही पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. दरवर्षी अशीच परिस्थिती निर्माण होत असल्याने जिल्ह्यातील सांबरकुंड, सारल घोळ यासह अन्य रखडलेली धरणे पूर्ण झाली पाहिजेत, प्रत्येक तालुक्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडतो त्यासाठी प्रत्येक तालुक्यात एक धरण उभारले पाहिजे.- राजन भगत, श्रमिक मुक्ती दल

टॅग्स :konkanकोकणRainपाऊस