शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

सुदृढ लोकशाहीसाठी ‘नोटा’ची आवश्यकता

By admin | Updated: February 18, 2017 06:33 IST

भारतीय राज्यघटनेने नागरिकांना मतदानाचा हक्क दिला आहे. सुदृढ लोकशाहीसाठी प्रत्येक नागरिकाने मतदानाचा हक्क बजावावा,

आविष्कार देसाई / अलिबागभारतीय राज्यघटनेने नागरिकांना मतदानाचा हक्क दिला आहे. सुदृढ लोकशाहीसाठी प्रत्येक नागरिकाने मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन करण्यात येते. राजकीय पक्षांचे उमेदवार पसंत नसल्याने अनेक वेळा नागरिक मतदानालाच जात नाहीत. मतदान मोठ्या संख्येने व्हावे, यासाठी मतदान यंत्रावर आता ‘नोटा’चे बटण ठेवण्यात आले आहे. त्याचा प्रचार आणि प्रसार प्रशासनाने करावा, अशी मागणी आता जोर धरत आहे.ज्यांना ‘नोटा’च्या बटणाविषयी माहिती आहे ते ‘नोटा’च्या बटणाचा वापर करतात. गेल्या काही निवडणुकांची आकडेवारी पाहिली असता एक हजार मतदारांमागे किमान एक मतदार ‘नोटा’च्या बटणाचा वापर करतो. त्याबाबत जनजागृती झाली तर वाढ होण्याची शक्यता आहे.निवडणुकीत एखादा उमेदवार आवडीचा नसेल, तर नकारार्थी मतदान करण्याचा अधिकार मतदान यंत्रामध्ये समाविष्ट केला आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने मतदान करण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृतीवर सरकारमार्फत कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जातो. त्यामध्ये किती वर्षाच्या नागरिकाने मतदान करावे, मतदान हे लोकशाहीसाठी पवित्र दान आहे याची माहिती विविध स्तरातून देण्यात येते. त्यामध्ये प्रामुख्याने कार्यशाळा, पथनाट्य, मोठमोठे होर्डिंग्ज, जाहिराती, पँपलेट, सोशल मीडियाचाही वापर जनजागृती करण्यासाठी केला जातो. त्याचबरोबर मतदान यंत्रावर ‘नोटा’चे बटण आहे याची माहिती संबंधित यंत्रणांकडून दिली जात नाही. ‘नोटा’चा वापर एखादा उमेदवार अयोग्य असेल अथवा आवडीचा नसेल, भ्रष्ट असेल, गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असेल, तर त्या विरोधात करता येऊ शकतो. परंतु प्रशासनाकडून ‘नोटा’ च्या बटणाचा वापर करता येऊ शकतो याची माहिती दिली जात नाही. आवडीचा उमेदवार नसल्याने नागरिक मतदान करायला जात नाही. अशा उमेदवाराला मतदान करुन काय उपयोग असा सूर त्यांच्याकडून लावला जातो हे सर्वांना माहिती आहे.त्यासाठी नोटाच्या बटणाबाबत मोठ्या संख्येने जागृती झाल्यास लायक नसलेले उमेदवार घरी बसतील आणि चांगल्या चारित्र्याच्या उमेदवाराला राजकीय पक्ष उमेदवारी देतील. याचा फायदा सुदृढ लोकशाहीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, असे आम आदमी पार्टीचे दिलीप जोग यांनी सांगितले.