शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

धर्मनिरपेक्ष विचारशक्ती एकत्र येण्याची गरज - सुनील तटकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 01:02 IST

धर्मनिरपेक्ष विचारशक्ती एकत्र येणे काळाची गरज आहे, असे उद्गार गोरेगाव येथे आयोजित प्रचाररॅलीत सुनील तटकरे यांनी काढले.

माणगाव : विचाराची लढाई धर्माच्या नावावर भाजप व शिवसेनेने चालू केली आहे. धर्म आणि जात यांचे भावनिक आवाहन करीत या जिल्ह्यामध्ये मतभेद करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न ज्या वेळी जातीयवादीशक्ती माध्यमातून होत असतो. धर्मनिरपेक्ष विचारशक्ती एकत्र येणे काळाची गरज आहे, असे उद्गार गोरेगाव येथे आयोजित प्रचाररॅलीत सुनील तटकरे यांनी काढले.गेली दहा वर्षे ज्यांना संधी दिली, याच भागातून त्यांना मताधिक्य दिले त्यात देवळी, नागाव, भिंताड, हरकोल, मांजरोणे यांचा सामावेश आहे. मात्र, त्यांनी काढलेल्या सिंहावलोकन विकासपुस्तिकेत एकही काम या भागातील केलेल्याचा उल्लेख नसल्याचा तटकरे यांनी सांगितले. गोरेगावमध्ये मी पक्षाच्या माध्यमातून धारणाचे काम, साडेतीन कोटींचे फिल्टर प्लांट, साडेतीन कोटींचे गाव तलाव सुशोभीकरण, बौद्ध समजासाठी विहार, चर्मकार समाजासाठी समाजभवन आणि सर्वात महत्त्वाचे गोरेगावचे मानबिंदू असलेले विष्णू तलावाकरिता सभागृहात वाद घालून पर्यावरणमंत्री यांच्याकडून विष्णू तलावाचे सुशोभीकरण मंजूर केल्याचे या वेळी तटकरे यांनी आवर्जून सांगितले.या वेळी राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष माजी आमदार माणिकराव जगताप कार्यकर्त्यांना घराघरांत जाऊन प्रचार करीत, दोन लाख मताधिक्यांने निवडून आणू, असे आवाहन करीत गोरेगाव व परिसराचा विकास करून घ्या, असे म्हणाले. प्रचार रॅलीकरिता माजी आमदार माणिक जगताप, राष्ट्रवादी राष्ट्रीय महिला अध्यक्षा चित्रा वाघ, काँग्रेस नेते श्रीनिवास बेंडखळे, जिल्हा अध्यक्ष प्रमोद घोसळकर राष्ट्रवादी जिल्हा प्रवक्ते विजयराव खुळे आदी मान्यवर उपस्थित होते.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019raigad-pcरायगडsunil tatkareसुनील तटकरे