शहरं
Join us  
Trending Stories
1
World Boxing Championship: जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत जास्मिन लांबोरियाची 'सुवर्ण' कामगिरी!
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
4
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
5
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
6
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
7
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
8
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
9
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
10
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
11
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
12
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
13
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
14
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
15
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
16
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
17
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
18
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
19
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
20
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!

धर्मनिरपेक्ष विचारशक्ती एकत्र येण्याची गरज - सुनील तटकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 01:02 IST

धर्मनिरपेक्ष विचारशक्ती एकत्र येणे काळाची गरज आहे, असे उद्गार गोरेगाव येथे आयोजित प्रचाररॅलीत सुनील तटकरे यांनी काढले.

माणगाव : विचाराची लढाई धर्माच्या नावावर भाजप व शिवसेनेने चालू केली आहे. धर्म आणि जात यांचे भावनिक आवाहन करीत या जिल्ह्यामध्ये मतभेद करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न ज्या वेळी जातीयवादीशक्ती माध्यमातून होत असतो. धर्मनिरपेक्ष विचारशक्ती एकत्र येणे काळाची गरज आहे, असे उद्गार गोरेगाव येथे आयोजित प्रचाररॅलीत सुनील तटकरे यांनी काढले.गेली दहा वर्षे ज्यांना संधी दिली, याच भागातून त्यांना मताधिक्य दिले त्यात देवळी, नागाव, भिंताड, हरकोल, मांजरोणे यांचा सामावेश आहे. मात्र, त्यांनी काढलेल्या सिंहावलोकन विकासपुस्तिकेत एकही काम या भागातील केलेल्याचा उल्लेख नसल्याचा तटकरे यांनी सांगितले. गोरेगावमध्ये मी पक्षाच्या माध्यमातून धारणाचे काम, साडेतीन कोटींचे फिल्टर प्लांट, साडेतीन कोटींचे गाव तलाव सुशोभीकरण, बौद्ध समजासाठी विहार, चर्मकार समाजासाठी समाजभवन आणि सर्वात महत्त्वाचे गोरेगावचे मानबिंदू असलेले विष्णू तलावाकरिता सभागृहात वाद घालून पर्यावरणमंत्री यांच्याकडून विष्णू तलावाचे सुशोभीकरण मंजूर केल्याचे या वेळी तटकरे यांनी आवर्जून सांगितले.या वेळी राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष माजी आमदार माणिकराव जगताप कार्यकर्त्यांना घराघरांत जाऊन प्रचार करीत, दोन लाख मताधिक्यांने निवडून आणू, असे आवाहन करीत गोरेगाव व परिसराचा विकास करून घ्या, असे म्हणाले. प्रचार रॅलीकरिता माजी आमदार माणिक जगताप, राष्ट्रवादी राष्ट्रीय महिला अध्यक्षा चित्रा वाघ, काँग्रेस नेते श्रीनिवास बेंडखळे, जिल्हा अध्यक्ष प्रमोद घोसळकर राष्ट्रवादी जिल्हा प्रवक्ते विजयराव खुळे आदी मान्यवर उपस्थित होते.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019raigad-pcरायगडsunil tatkareसुनील तटकरे