शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

धोकादायक इमारतींसाठी निश्चित धोरणाची आवश्यकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 01:51 IST

जिल्ह्यातील नागरिकांचा सूर : पुनर्विकासाचा प्रकल्प राबविण्याची मागणी

अलिबाग : जिल्ह्यातील ६२९ इमारती या धोकादायक असल्याने त्यामध्ये राहत असणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. प्रशासन आणि सरकारने या इमारतींसाठी पुनर्विकासाचाप्रकल्प राबण्याची मागणी जोर धरत आहे. कल्याणकारी राज्यात नागरिकांना सोयी-सुविधा देण्याची जबाबदारी ही सरकारची आहे. त्यासाठी सरकारने याकडे आपत्ती व्यवस्थापनाचा एक व्यापक भाग म्हणून पाहताना ठोस धोरण आणण्याची गरज निर्माण झाली आहे. यासाठी नागरिकांनी संघटित होऊन आंदोलन करण्याची तयारी ठेवली पाहिजे असा सूर जिल्ह्यात उमटत आहे.

धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आलेला असतानाच रायगड जिल्हा प्रशासनाने ११ नगरपालिका क्षेत्रातील ३९८ आणि पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील २३१ अशा एकूण ६२९ इमारती या धोकादायक असल्याचे जाहीर केले आहे. स्थानिक प्रशासनाने त्यांना नोटिसाही बजावलेल्या आहेत, असे असतानाही या धोकादायक इमारतींमध्ये नागरिक बिनधास्त राहत आहेत. ११ नगरपालिका क्षेत्रातील ३९८ इमारती या धोकादायक आढळल्या आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने कर्जत नगरपालिका क्षेत्रातील २२६ इमारतींचा समावेश आहे. उरणमधील ७४ पैकी ६६ इमारती या खासगी आहेत, तर सहा इमारती सरकारी मालकीच्या आहेत. माथेरान नगरपालिकेच्या हद्दीत चार खासगी आणि दोन सरकारी इमारतींचा समावेश आहे. पनवेल महानगरपालिका २३१, अलिबाग १२, मुरुड ४, पेण ९, खोपोली ३, रोेहे १०, महाड ४३, श्रीवर्धन ११ इमारती या धोकादायक असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.३९८ इमारतींची यादी प्रशासनाने जाहीर केली असली, तरी त्यातील काही इमारती या दुरुस्त करता येण्यासारख्या आहेत. धोकादायक इमारतींचा पुनर्विकास करावा यासाठी प्रशासनाकडून प्रस्ताव तयार करण्यात आलेला नाही अथवा मागणी आलेली नाही, असे निवासी जिल्हाधिकारी पद्मश्री बैनाडे यांनी आधीच स्पष्ट केले आहे.सध्याचे सरकार बिल्डरधार्जिणे आहे. त्यामुळे ते सहजासहजी असे धोरण आणणार नाही. धोकादायक इमारतींसाठी काही ठोस सरकारकडून करून घ्यायचे असेल, तर आधी सर्वांनी संघटित झाले पाहिजे, असे सामाजिक कार्यकर्ते दिलीप जोग यांनी सांगितले. धोकायदायक इमारतींसाठी निश्चित धोरण आणण्यासाठी आंदोलनाचीच गरज आहे, असेही त्यांनी सांगितले.नागरिकांची जबाबदारी सरकारवर - सचिन पाटीलसरकार आणि प्रशासनाने कायद्यावर बोट ठेवत संबंधिताना नोटिसा बजावल्या आहेत. मात्र, हे कल्याणकारी राज्य आहे. त्यामुळे नागरिकांची जबाबदारी घेण्याचे काम हे सरकारचेच आहे.धोकादायक इमारतीमधील काही नागरिकांची परिस्थिती नसेल तर ते स्वत:हून कशी दुरुस्ती करणार, असा सवाल ह्युमन डेव्हलपमेंट अ‍ॅण्ड रिसर्च सेंटरचे अध्यक्ष डॉ. सचिन पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला.धोकादायक इमारतींसाठी निश्चित धोरण आणून त्याची दारिद्र्यरेषेखालील, गरीब, मध्यमवर्गीय अशी वर्गवारी केली पाहिजे. सरकार कर गोळा करतेच ना, मग सरकारने त्यांना घरे बांधून दिली पाहिजेत असेडॉ. पाटील म्हणाले.

टॅग्स :RaigadरायगडBuilding Collapseडोंगरी इमारत दुर्घटना