शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

रायगडमध्ये राष्ट्रवादीकडे ४८ ग्रामपंचायती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 03:14 IST

रायगड जिल्ह्यातील १२१ पैकी २५ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या निवडणुका बिनविरोध झाल्या होत्या. उर्वरित ९६ ग्रामपंचायतींकरिता बुधवारी झालेल्या मतदानाची मतमोजणी गुरुवारी संबंधित तहसीलदार कार्यालयांत करण्यात आली.

विशेष प्रतिनिधीअलिबाग : रायगड जिल्ह्यातील १२१ पैकी २५ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या निवडणुका बिनविरोध झाल्या होत्या. उर्वरित ९६ ग्रामपंचायतींकरिता बुधवारी झालेल्या मतदानाची मतमोजणी गुरुवारी संबंधित तहसीलदार कार्यालयांत करण्यात आली. सर्वाधिक ४८ ग्रामपंचायती राष्ट्रवादी काँग्रेसने काबीज केल्या आहेत, तर २८ ग्रामपंचायतींवर शिवसेनेने आपला विजयी भगवा फडकावला आहे, तसेच १५ ग्रामपंचायतींवर शेकापक्षाने आपला लाल बावटा फडकावला आहे. काँग्रेसला ८ ग्रामपंचायतीत विजय संपादन करता आला आहे तर १६ ग्रामपंचायतीत स्थानिक राजकीय आघाड्यांनी विजय संपादन केला आहे. भाजपाला मात्र केवळ तीन ग्रामपंचायतीत यश मिळवता आले आहे. तीन ग्रामपंचायतीत नियोजित आरक्षणाचे उमेदवार मिळू शकले नसल्याने या तीन ग्रामपंचायतींची सरपंचपदे रिक्त राहिली आहेत.अलिबाग तालुक्यातील सात ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेस, शेकाप आणि शिवसेना यांना प्रत्येकी दोन तर एका ग्रामपंचायतीत स्थानिक आघाडीला यश मिळाले आहे. मुरुड तालुक्यातील एका ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत स्थानिक आघाडीलाच यश मिळाले आहे. पेणमधील ९ ग्रामपंचायतींपैकी चार शेकापने काबीज केल्या आहेत तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांना प्रत्येकी एका ग्रामपंचायतीत विजय मिळाला आहे.कर्जत, माणगाव, तळा, म्हसळा आणि रोहा तालुक्यात राष्ट्रवादीचे वर्चस्व अबाधितकर्जतमध्ये १२ पैकी सर्वाधिक ७ राष्ट्रवादी काँग्रेसला, शेकाप आणि शिवसेनेला प्रत्येकी २ तर काँग्रेसला एका ग्रामपंचायतीत यश मिळाले आहे. खालापूरमध्ये एकूण तीनपैकी तीनही ग्रामपंचायती शिवसेनेने काबीज केल्या आहेत. माणगावमध्ये १० पैकी सर्वाधिक ६ शिवसेना तर राष्ट्रवादीने ४ जागी विजय मिळवला आहे. तळा तालुक्यातील १३ पैकी सर्वाधिक १२ राष्ट्रवादीने काबीज केल्या तर सेनेला एका ग्रामपंचायतीवरच समाधान मानावे लागले. रोहा तालुक्यात २२ पैकी सर्वाधिक २१ ग्रामपंचायती राष्ट्रवादी काँग्रेसने काबीज केल्या आहेत. म्हसळा तालुक्यात पाचपैकी तीन राष्ट्रवादी तर काँग्रेस व शिवसेना प्रत्येकी एक ग्रामपंचायतीत यश आले आहे.पोलादपूरच्या तीन ग्रामपंचायती शिवसेनेकडे, तर दोन शेकापकडेपोलादपूर : पोलादपूर तालुक्यातील माटवण, सवाद, बोरावळे आणि चरई ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी बुधवारी मतदान झाले. तालुक्यात शेकापचा लाल बावटा फडकला असून बोरावळेसह माटवणमध्ये सरपंचपदी शेकापचे उमेदवार निवडून आले आहेत, तर सवादमध्ये शिवसेनेने वर्चस्व राखले आहे.चरई, देवळे ग्रामपंचायत बिनविरोध करून शिवसेनेकडे ठेवण्यात यश मिळवले आहे. देवळे ग्रामपंचायत सरपंचपदी बबिता दळवी, तर चरई सरपंचपदी अनिता अनिल साळवी या बिनविरोध निवडून आल्या आहेत. निकाल लागताच मुंबई-गोवा महामार्गासह महाबळेश्वर मार्गावर शेकापचा लाल बावटा फडकत असल्याचे दिसून आले.पनवेलमध्ये मतदार स्थानिक आघाड्यांच्या पाठीशी राहिलेपनवेलमधील १० ग्रामपंचायतींपैकी सर्वाधिक चार ग्रामपंचायती स्थानिक आघाडीने काबीज केल्या तर तीन ग्रामपंचायतीत भाजपा, दोनमध्ये शेकाप तर एका ग्रामपंचायतीत शिवसेनेला यश मिळाले आहे. उरणमध्ये ४ ग्रामपंचायतींपैकी सेना एक, आघाडी दोन तर एक ग्रामपंचायत रिक्त राहिली आहे.महाड, पोलादपूरमध्ये शिवसेनेची बाजीमहाडमध्ये १३ पैकी सेना व आघाडीला प्रत्येकी पाच तर काँग्रेसला तीन ग्रामपंचायतीत यश आले आहे. पोलादपूरमध्ये ५ पैकी शिवसेनेला ३ तर शेकापला २ ग्रामपंचायती प्राप्त झाल्या.सुधागडमध्ये शेकापची बाजीराबगाव/पाली : सुधागड तालुक्यात बुधवारी पाली, वाघोशी, उद्धर, कुंभारशेत नागशेत, नेणवली, चिखलगाव या ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या. यामध्ये नागशेत, नेणवली, चिखलगाव या ग्रामपंचायती सरपंचासह बिनविरोध झाल्या तर उर्वरित चार ग्रामपंचायतींमध्ये अटीतटीच्या लढती झाल्या. यामध्ये शेकापने बाजी मारीत सातपैकी तीन ग्रामपंचायतींवर लाल बावटा फडकवला आहे. तर शिवसेनेने दोन ग्रामपंचायतीवर शिक्कामोर्तब केले असून एका ग्रामपंचायतीवर अपक्ष राज आले आहे तर एका ग्रा.पं. वर शेकाप-राष्ट्रवादी आघाडीची सत्ता आली आहे.पाली ग्रामपंचायतीच्या निवडणुकीवर सर्वपक्षीयांनी बहिष्कार टाकला असताना मात्र पाली ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या निवडणुकीत दोन अपक्ष उमेदवारांमध्ये लढत झाली. शेतकरी कामगार पक्षाने उद्धर, नेणवली, नागशेत या ग्रामपंचायतीवर वर्चस्व मिळवले. शेकाप-राष्ट्रवादी आघाडी वाघोशी तर शिवसेनेने कुंभाशेत, चिखलगाव आणि अपक्ष उमेदवारांनी पाली ग्रामपंचायतीवर विजय मिळवला.पेणमध्ये सर्वपक्षीय निकालपेण : पेणमधील सहा ग्रामपंचायतींच्या निवडणूक निकालात प्रत्येक राजकीय पक्षाने आपआपल्या ताब्यातील ग्रामपंचायतीचे वर्चस्व ठेवले. गागोदेवर काँग्रेसचा झेंडा, वरेडीवर शेकापचा लालबावटा, कासूवर शिवसेनेचा भगवा तर कुहीटे ग्रामपंचायतीवर राष्टÑवादी काँग्रेसचा झेंडा फडकल्याने राजकीय पक्षाकडून आपआपले सरपंच निवडून आल्याने निकाल समाधानकारक असाच लागला. गागोदेमध्ये मतदारांनी निकीता शिवाजी पाटील यांना विजयी केले. पेणमधील सहा ग्रा.पं. करिता निवडणूक झाली तर जावळी, करंबेळी, निधवली, बेणसे येथील सरपंच बिनविरोध निवडले. उर्वरित चार ग्रा.पं. सरपंचाची थेट निवडणूक झाली.शेकापने वरेडी ग्रा.पं.मध्ये सरपंचपदाच्या उमेदवार सुरेखा पाटील या विजयी झाल्या. कुहीरे ग्रामपंचायतीमध्ये सरपंचपदाच्या राष्टÑवादी काँग्रेसच्या प्रज्ञा वैभव जवके विजयी झाल्या, कासू ग्रामपंचायतीमध्ये शिवसेनेचे सरपंच पदाचे उमेदवार आकाश भगवान नाईक हे विजयी झाले आहेत. शेकापने वरेडी, जावळी, बेणसे, कटंवेळी, या चार ग्रा.पं. सरपंचपदावर मोहोर उमटवून आघाडी घेतली. त्या खालोखाल शिवसेना, काँगे्रस, राष्ट्रवादीने प्रत्येकी एक याप्रमाणे सरपंचपदावर मोहोर उमटविली. झोनिटवाडा व निधपली ग्रा.पं.मध्ये सरपंचपद रिक्त राहिले आहे.

टॅग्स :Raigadरायगडnewsबातम्या