शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच घेतली
2
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
3
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
4
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
5
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
6
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
7
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
8
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
9
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
10
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
11
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
12
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
13
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
14
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
15
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?
16
युक्रेनसाठी सर्वात भयावह रात्र! रशियाने केला सर्वात मोठा ड्रोन हल्ला, अनेक शहरे उद्ध्वस्त
17
99 टक्क्यांहूनही अधिकने घसरून थेट 60 पैशांवर आला होता हा पॉवर शेअर, आता 2857 टक्क्यांची तुफान तेजी!
18
लॉस एंजेलिसमध्ये भडकला हिंसाचार, पत्रकाराला अचानक लागली गोळी; अंगावर शहारा आणणारं दृष्य कॅमेऱ्यात कैद
19
"पतीला मारले, मग माझं अपहरण करून..." सोनमच्या कहाणीनं राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट

नवेदरबेली, आक्षी पुलाची दुरवस्था

By admin | Updated: June 21, 2016 01:30 IST

अलिबाग तालुक्यातील नवेदरबेली, आक्षी (जुना) आणि साळाव पुलाची दुरवस्था झाली आहे. त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केले आहे. या पुलांची वेळेत डागडुजी केली नाही

बोर्ली मांडला : अलिबाग तालुक्यातील नवेदरबेली, आक्षी (जुना) आणि साळाव पुलाची दुरवस्था झाली आहे. त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केले आहे. या पुलांची वेळेत डागडुजी केली नाही, तर या पट्ट्यातील बहुतांश गावांचा संपर्क अलिबागपासून तुटणार आहे. त्याचप्रमाणे येथील पर्यटन व्यवसायालाही खीळ बसणार आहे. त्यामुळे या पुलाची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.रायगड जिल्ह्यातील साळाव -रेवदंडा खाडीपुलामुळे अलिबाग, मुरु ड आणि रोहा हे तीन तालुके जवळ आले परंतु या पुलाची दुरवस्था झाल्यामुळे पुलाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे पुन्हा परत एकदा या तिन्ही तालुक्यांचा संपर्कतुटण्याचा धोका निर्माण झाला आहे. या पुलाला बारा गाळे आहेत. या पुलामुळे रोहा, मुरु ड, अलिबाग हे तीन तालुके जवळ आले आहेत. साळाव- रेवदंडा खाडी पुलामुळे मुरु ड तालुक्याचा आर्थिक विकास झाला आहे. काही वर्षांपूर्वी या पुलाकडे सार्वजनिक बांधकाम विभाग अलिबाग यांनी दुर्लक्ष केल्यामुळे पुलाला भेग पडून पुलाखालील पाणी स्पष्ट दिसत होते. मात्र त्यावेळी बांधकाम विभागाने लोखंडी पट्टी (पत्रा) लावून त्या ठिकाणी काँक्र ीटीकरण करण्यात आले होते. तसेच त्यावेळी पडलेले खड्डे देखील बुजविण्यात आले होते. परंतु काही महिन्यापूर्वी पुन्हा एकदा भेग पडली होती. त्यावेळीसुद्धा ती बुजविण्यात आली मात्र पुलाचे दोन्ही बाजूचे कठडे यांची दुरवस्था होऊन काही कठड्यांचा भाग हा समुद्रात कोसळला आहे. गेल्या वर्षभरात तीन ते चार वेळा रोहा तालुक्यातील सानेगाव येथील इंडो एनर्जी या जेटीवर जाणाऱ्या दगडी कोळशाच्या बार्जने धडक मारल्याने हा पूल अधिकच कमकुवत झाला आहे. याबाबत अलिबाग सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता दिलीप विडेकर यांनी जोपर्यंत आमच्याकडे तक्र ार येत नाही तोपर्यंत आम्ही कारवाई करणार नाही, असे सांगितले. (वार्ताहर) १९८६ मध्ये साळाव-रेवदंडा खाडी पुलाचे काम करण्यात आले. या पुलाची लांबी ५१० मीटर आहे. या पुलाला बारा गाळे आहेत. या पुलाचे काम माजी मुख्यमंत्री ए. आर. अंतुले यांच्या काळात झाले आहे. त्यामुळे रोहा, मुरु ड, अलिबाग हे तीन तालुके जवळ आले आहेत. साळाव- रेवदंडा खाडी पुलामुळे मुरु ड तालुक्याचा आर्थिक विकास झाला आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाने साखर खाडी पूल नव्याने बांधावे कारण हा जुना पूल पडल्यास जवळपास १० ते १२ गावांचा संपर्कतुटेल. पर्यायाने रेवदंडा-आक्षी या मार्गावर वाहतूक वाढेल, त्यामुळे वाहतूक कोंडी होईल.- नंदकुमार मयेकर, माजी सरपंच, नागाव