शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
4
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
5
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
6
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
7
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
8
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
9
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
10
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
11
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
12
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
13
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
14
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
15
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
16
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
17
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
18
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
19
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
20
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल

नवेदरबेली, आक्षी पुलाची दुरवस्था

By admin | Updated: June 21, 2016 01:30 IST

अलिबाग तालुक्यातील नवेदरबेली, आक्षी (जुना) आणि साळाव पुलाची दुरवस्था झाली आहे. त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केले आहे. या पुलांची वेळेत डागडुजी केली नाही

बोर्ली मांडला : अलिबाग तालुक्यातील नवेदरबेली, आक्षी (जुना) आणि साळाव पुलाची दुरवस्था झाली आहे. त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केले आहे. या पुलांची वेळेत डागडुजी केली नाही, तर या पट्ट्यातील बहुतांश गावांचा संपर्क अलिबागपासून तुटणार आहे. त्याचप्रमाणे येथील पर्यटन व्यवसायालाही खीळ बसणार आहे. त्यामुळे या पुलाची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.रायगड जिल्ह्यातील साळाव -रेवदंडा खाडीपुलामुळे अलिबाग, मुरु ड आणि रोहा हे तीन तालुके जवळ आले परंतु या पुलाची दुरवस्था झाल्यामुळे पुलाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे पुन्हा परत एकदा या तिन्ही तालुक्यांचा संपर्कतुटण्याचा धोका निर्माण झाला आहे. या पुलाला बारा गाळे आहेत. या पुलामुळे रोहा, मुरु ड, अलिबाग हे तीन तालुके जवळ आले आहेत. साळाव- रेवदंडा खाडी पुलामुळे मुरु ड तालुक्याचा आर्थिक विकास झाला आहे. काही वर्षांपूर्वी या पुलाकडे सार्वजनिक बांधकाम विभाग अलिबाग यांनी दुर्लक्ष केल्यामुळे पुलाला भेग पडून पुलाखालील पाणी स्पष्ट दिसत होते. मात्र त्यावेळी बांधकाम विभागाने लोखंडी पट्टी (पत्रा) लावून त्या ठिकाणी काँक्र ीटीकरण करण्यात आले होते. तसेच त्यावेळी पडलेले खड्डे देखील बुजविण्यात आले होते. परंतु काही महिन्यापूर्वी पुन्हा एकदा भेग पडली होती. त्यावेळीसुद्धा ती बुजविण्यात आली मात्र पुलाचे दोन्ही बाजूचे कठडे यांची दुरवस्था होऊन काही कठड्यांचा भाग हा समुद्रात कोसळला आहे. गेल्या वर्षभरात तीन ते चार वेळा रोहा तालुक्यातील सानेगाव येथील इंडो एनर्जी या जेटीवर जाणाऱ्या दगडी कोळशाच्या बार्जने धडक मारल्याने हा पूल अधिकच कमकुवत झाला आहे. याबाबत अलिबाग सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता दिलीप विडेकर यांनी जोपर्यंत आमच्याकडे तक्र ार येत नाही तोपर्यंत आम्ही कारवाई करणार नाही, असे सांगितले. (वार्ताहर) १९८६ मध्ये साळाव-रेवदंडा खाडी पुलाचे काम करण्यात आले. या पुलाची लांबी ५१० मीटर आहे. या पुलाला बारा गाळे आहेत. या पुलाचे काम माजी मुख्यमंत्री ए. आर. अंतुले यांच्या काळात झाले आहे. त्यामुळे रोहा, मुरु ड, अलिबाग हे तीन तालुके जवळ आले आहेत. साळाव- रेवदंडा खाडी पुलामुळे मुरु ड तालुक्याचा आर्थिक विकास झाला आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाने साखर खाडी पूल नव्याने बांधावे कारण हा जुना पूल पडल्यास जवळपास १० ते १२ गावांचा संपर्कतुटेल. पर्यायाने रेवदंडा-आक्षी या मार्गावर वाहतूक वाढेल, त्यामुळे वाहतूक कोंडी होईल.- नंदकुमार मयेकर, माजी सरपंच, नागाव