शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाळ्यातील निसर्ग पर्यटनाला पर्यटकांची पसंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2023 12:23 IST

अभयारण्य प्रशासनासह याठिकाणच्या बचत गटांनादेखील रोजगार प्राप्त झाले आहे.

पनवेल : २०२२ मध्ये ऑगस्ट महिन्यात  पनवेल येथील ऐतिहासिक कर्नाळा किल्ला जोरदार पावसामुळे ढासळू लागला असल्याने अभयारण्य प्रशासनाने पर्यटकांसाठी प्रवेश बंदीचा निर्णय घेतला होता. यावर्षी १ जून रोजी हा किल्ला सुरू केल्याने पर्यटकांनी त्याठिकाणच्या निसर्ग पर्यटनाला पसंती देत मोठ्या संख्येने या ठिकाणाला भेट दिल्याने अवघ्या तीन महिन्यांच्या कालावधीत अभयारण्य प्रशासनाच्या तिजोरीत २५ लाखांची भर पडली आहे. 

अभयारण्य प्रशासनासह याठिकाणच्या बचत गटांनादेखील रोजगार प्राप्त झाले आहे. कर्नाळा अभयारण्यातील नैसर्गिक अधिवासासह येथील ट्रेकिंगची संधी ट्रेकर्सना उपलब्ध होत असल्याने मुंबई उपनगर, पुणे, नवी मुंबई, कल्याण, ठाणे येथील ट्रेकर्स याठिकाणी धूम ठोकत आहेत. 

किल्ल्याला ऐतिहासिक महत्त्व अभयारण्य प्रशासनाच्या उत्पनासह स्थानिक बचत गटांवर पडला होता. कर्नाळा किल्ल्याचा उल्लेख यादवकाळातही आढळतो. सन १६५७ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकला. पुढे पुरंदरच्या तहामध्ये तो मोगलांच्या ताब्यात गेला. १६७० मध्ये मराठ्यांनी पुन्हा कर्नाळा किल्ला आपल्या साम्राज्यात आणला. स्वातंत्र्यसैनिक वासुदेव बळवंत फडके यांचे आजोबा अनंतराव फडके या किल्ल्याचे किल्लेदार होते. 

सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अनेक उपाययोजना विशेष म्हणजे पनवेलसारख्या भागाचा झपाट्याने होणारा विकास लक्षात घेता सिमेंटच्या जंगलातून काही क्षणाची फुरसत म्हणूनदेखील शहरी नागरिक या ठिकाणाला भेट देत आहेत.  पनवेलमधील बहुतांशी पर्यटन स्थळांवर पर्यटकांना बंदी आहे. त्यामुळेदेखील पर्यटक आवर्जून कर्नाळा अभयारण्याला भेट देत आहेत. यापूर्वी दुरवस्था झालेल्या किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ वन विभागाने खबरदारी घेत प्रवेशद्वारावर नव्याने रेलिंग बसवली आहे.  त्यामुळे सध्यातरी पर्यटकांच्या सुरक्षेला धोका नसल्याने पुन्हा एकदा ऐतिहासिक कर्नाळा किल्ल्याची सफर पर्यटक, ट्रेकर्स यांना करता येणार आहे. 

पूर्वी बोरघाटमार्गे होणाऱ्या वाहतुकीवर लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याचा वापर होत असे. नंतर हा किल्ला काही काळ मोगलांच्या ताब्यात होता. १६७० मध्ये मराठ्यांनी पुन्हा कर्नाळा किल्ला आपल्या साम्राज्यात आणला. 

कर्नाळा किल्ला सुरू झाल्याने अवघ्या तीन महिन्यांत अभयारण्य प्रशासनाच्या महसुलात २५ लाखांची भर पडली आहे. येथील ट्रेकिंगच्या दृष्टीने इतर पर्यटनाची कामेदेखील लवकरच मार्गी लागतील. - नारायण राठोड, वन परिक्षेत्र अधिकारी, कर्नाळा अभयारण्य

टॅग्स :Raigadरायगड