शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
3
सिंधू पाणी करार मोडल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
4
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
5
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
6
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
7
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
8
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
9
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
10
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
11
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
12
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
13
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
14
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
15
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
16
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
17
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
18
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
19
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
20
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली

सोनसावरीला कोण सावरणार? होळीसाठीच्या कत्तलीमुळे संक्रांत

By निखिल म्हात्रे | Updated: April 19, 2024 13:50 IST

चैत्रात सावरीच्या झाडांना सध्या बहर आला आहे.

निखिल म्हात्रे, अलिबाग : चैत्रात सावरीच्या झाडांना सध्या बहर आला आहे. त्यामुळे परिसराचे सौंदर्य खुलून दिसते. मात्र, एकेकाळी मोठ्या संख्येने दिसणाऱ्या पिवळ्या फुलांच्या सावरीचे अर्थात सोनसावरीच्या झाडांची संख्या झपाट्याने कमी होत असल्याने निसर्गप्रेमी चिंता व्यक्त करत आहेत.

साधारणत: लाल काटेसावर सर्वत्र आढळून येते. त्यामुळे सर्वांनाच लाल काटेसावरविषयी माहिती असते. मात्र, पिवळी फुले येणारी काटेसावरीचे झाड क्वचित आढळून येते. अलिबाग तालुक्यातही चांगली वनसंपदा आहे. तालुक्यात लाल काटेसावर आढळून येते. मात्र, तालुक्यातील धोकवडे आणि झिराड परिसरात पिवळी काटेसावरची झाडे आहेत. सध्या ही झाडे पिवळ्या फुलांनी डरडरून गेली आहे.

वाईल्ड लाईफ वॉरियर्स ऑफ अलिबाग संस्थेचे सदस्य समीर पालकर आणि निसर्गप्रेमी रूपेश गुरव यांनी सांगितले की, पिवळ्या काटेसावरी झाडे कमी होत आहेत. दुर्मीळ वनस्पतींचे जतन आणि संवर्धन होण्यासाठी प्रयत्न होण्याची गरज आहे.

सावरीची महती काय?

काटेरी सावर हा वृक्ष पूर्ण भारतभर जंगलात वाढलेला आढळतो. याचे पानझडी वृक्ष जंगल, डोंगरकपारी, रस्त्याच्या कडेला तसेच शेताच्या बांधावर उंच वाढलेले दिसतात. झाडाच्या मुळापासून ते उंच टोकापर्यंत टोकदार काटे असणाऱ्या काटेसावर या झाडाची शाल्मली अशी देखील ओळख आहे. डिसेंबर महिन्यापर्यंत सावरीची सगळी पाने गळून जातात. जानेवारीत अनेक कळ्या पानेविरहित फांदीवर दिसतात. फेब्रुवारी ते मार्चपर्यंत सर्व झाड लाल-गुलाबी फुलांनी बहरून जाते. काटेसावरीची झाडे ३० ते ४५ मीटरपर्यंत उंच वाढतात. हे झाड खोडापासून टोकापर्यंत त्रिकोणी काट्यांनी लगडलेले असते. उन्हाळ्यात पानगळ झाल्यावर काटेसावरला फुले येतात.

अलिबाग परिसरात लाल आणि पांढऱ्या रंगाची फुले येणारी काटेसावर आढळून येते. पिवळी काटेसावर माेठ्या प्रमाणात आढळून येत नाही. पिवळी काटेसावर दुर्मीळ आहे. पिवळ्या काटेसावरीला सोनसावर म्हणतात. सोनसावर महाबळेश्वर परिसरात, पश्चिम घाटाच्या वरच्या पट्ट्यात आढळून येते. अलिबाग परिसरात आढळून आली असेल तर वनविभागाकडून त्या झाडाची माहिती घेतली जाईल. ते झाड सोनसावरीचे असेल तर त्याची रोपे तयार करण्यासाठी बीज जमा करण्यात येतील.-नरेंद्र पाटील, वन परिक्षेत्र अधिकारी, अलिबाग वनविभाग

काटेसावरीची लागते होळी-

काही भागात काटेसावरीची होळी लावून तिचे दहन केले जाते. त्यामुळे होळीनिमित्त मोठ्या प्रमाणात या झाडांची कत्तल करण्यात आली. जंगलात वणवा लागला, तर सगळ्यात शेवटी जळणारं झाड म्हणून देखील काटेसावरची ओळख आहे. यामुळेच काटेसावरीचे झाड तोडून होळीच्या मध्यभागी ठेवून त्याची पूजा केली जाते. दरवर्षी होळीच्या निमित्ताने काटेसावरीची मोठ्या प्रमाणात कत्तल होत आहे. जंगलातील काटेसावर नष्ट होऊ नयेत, होळीत जाण्यासाठी याचा वापर थांबावा, यासाठी जनजागृती आणि प्रयत्नांची गरज आहे.

टॅग्स :alibaugअलिबागRaigadरायगड