शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
3
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
4
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
5
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
6
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
7
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
8
गणेश मंडळे दंड भरणार नाही, खड्यावर सरकारलाच दंड लावा
9
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
10
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
11
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
12
आधार कार्ड, मतदार ओळखपत्र नागरिकत्वाचा पुरावा नाहीत! मतदार यादीतून वगळण्याचा अधिकार निवडणूक आयोगालाच
13
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
14
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
15
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
16
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
17
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
18
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
19
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
20
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं

नारवेल बेनवले खारभूमी योजनेला अखेर मुहूर्त मिळाला, ५२ कोटी खर्चाची योजना

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2020 01:12 IST

Narvel Benavale Kharbhumi :

- दत्ता म्हात्रेपेण : राष्ट्रीय चक्रीवादळ आपत्ती निवारण प्रकल्पाअंतर्गत पेण तालुक्यातील ३० खारभूमी योजनांपैकी सर्वांत मोठी नारवेल बेनवले खारभूमी योजनेला अखेर मुहूर्त मिळाला आहे. अरबी समुद्राला मिळणाऱ्या काळेश्री तसेच धरमतर खाडीकिनारी असलेल्या तब्बल १३८८ हेक्टर शेतजमिनीला या योजनेतील संरक्षक बंधाऱ्याचे बळकटीकरण, मातीकामावर दोन बाजूंना दगडी पिचिंग बंधाऱ्याच्या माथ्यावर दगडमातीचा मुरुम याप्रमाणे या संरक्षक बंधाऱ्याचे १६.४० किमी लांबीचे काम सुरू झाले आहे.वासखांडीपर्यंतच्या काळेश्री बोर्झे, वढाव, दिव, वाशी या पाच ग्रामपंचायतींमधील ६ महसुली गावे १३ वाड्यांमधील शेतकरी, सामान्य नागरिकांच्या मालमत्तेचे रक्षण व शेती संरक्षणाची मोठी योजना असे या योजनेचे महत्त्व आहे. ५२ कोटी प्रशासकीय खर्चासाठी मंजुरी मिळाली असून ७५ टक्के केंद्र सरकारचा निधी तर २५ टक्के राज्य सरकारचा निधी असे या योजनेचे स्वरूप आहे. चक्रीवादळ व समुद्राला येणाऱ्या उधाण भरतीमुळे खाडीकिनारी असलेल्या शेतघरे, वाड्यावरची लोकवस्ती व नागरिकांच्या मालमत्तेचे संरक्षण व होणारे नुकसान टाळण्यासाठी ही योजना आघाडी सरकार असताना प्रस्तावित करण्यात आली. तत्कालीन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी राष्ट्रीय चक्रीवादळ आपत्ती निवारण प्रकल्पाअंतर्गत रायगड जिल्ह्यातील सात योजनांचा यात समावेश होता. त्यापैकी अलिबाग तालुक्यातील चिपली काचेली खारभूमी योजना व पेणमधील नारवेल बेनवले खारभूमी योजनेला ६४ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. २०१४ साली सत्तांतर झाले आणि भाजप-शिवसेना सरकार आले तेंव्हा खारभूमी मंत्री दिवाकर रावते यांनीही शेतकरी बांधवासांठी या योजनेचे महत्त्व जाणून प्रयत्न केले होते. २०१५-२०१६ या वर्षात पाठवलेल्या प्रस्तावाला अखेर जुलै २०२० वर्षात महाविकास आघाडी सरकारच्या काळात चालना मिळून ही योजना मार्गी लागली आहे. खारभूमी सबडिव्हिजन पेण कार्यालयाच्या कार्यकारी अभियंते दाभीरे, उप अभियंत्या सोनल गायकवाड व साहाय्यक अभियंते दादासाहेब सोनटक्के यांच्या देखरेखीखाली व क्वालिटी कंट्रोल बोर्डाच्या अधिकारी वर्गाने परीक्षण करून योजनेचे काम पूर्ण करावयाचे आहे. या योजनेचे महत्त्व म्हणजे ही योजना शेतकरी बांधवांसाठी मैलाचा दगड ठरेल. या योजनेचा जेथून प्रारंभ होतो त्या काळेश्री बंदर व विठ्ठल वाडी येथून समुद्र मार्गे जलवाहतूक सुरू करण्यासाठी या संरक्षक बंधाऱ्याचा रस्ता वाहतुकीसाठी उपयोग होईल. ८ उघाडीचे नूतनीकरण करण्यासाठी निधीची तरतूदपेणच्या नारवेल बेनवले खारभूमी योजनेसाठी ५१ कोटी ७६ लाख २२ हजार ४१० रुपयांची मंजुरी मिळाली आहे. यामध्ये संरक्षक बंधाऱ्याची उंची ५.६२ मीटर तर, रुंदी ३ मीटर आहे. माथ्यावर दगडी मुरुमाचा थर, मातीच्या बांधाला दोन्ही बाजूंना दगडांची भक्कम पिचिंग असे चार चाकी वाहन जाईल याप्रमाणे बांधकामांचे स्वरूप राहणार आहे. विकास निधीतून ८ उघाडीचे नूतनीकरण करण्यासाठी ७ कोटी ४७ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. योजनेतील मालवाहतूक करण्यासाठी अप्रोच रोड जोडण्यासाठी ८ लाख ४७ हजार रुपयांची विशेष तरतूद करण्यात आली आहे. ३० जुलै २०२० रोजी या योजनेचा कार्यारंभ आदेश देण्यात येऊन दीड वर्षात योजनेचे काम पूर्ण करण्यासाठी या कामाचा ठेका घेतलेल्या ठेकेदार कंपनीला काम मे, २०२२ पर्यंत पूर्ण करावयाचे आहे.

टॅग्स :Raigadरायगड