शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
2
धक्कादायक! पत्नीने प्रियकरासाठी लग्नाच्या सातव्या दिवशी पतीची हत्या केली
3
बिहारमध्ये भाजपाचा डाव! नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिलं पण, गृहमंत्रीपद BJP कडे ठेवले, २० वर्षांनंतर गृह खाते सोडले
4
कर्नाटकच्या राजकारणात खळबळ! "सर्व १४० आमदार माझ्यासोबत", डी. के. शिवकुमार यांचे थेट विधान
5
तुम्हाला तुमची गाडी खूपच प्यारी आहे...! २० वर्षांहून जुन्या वाहनांच्या फिटनेस टेस्ट शुल्कात १५ पट वाढ
6
फेस्टीव्ह संपला नाही तोच...! फ्लिपकार्ट 'ब्लॅक फ्रायडे सेल २०२५' ची तारीख ठरली, अमेझॉन थांबतेय होय...
7
'G-20 मध्ये सामील होणार नाही', डोनाल्ड ट्रम्प दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर नाराज, कारण...
8
जॉब, इन्व्हेस्टमेंट, WFH च्या नावाने फ्रॉड; ऑपरेशन CyHawk अंतर्गत ४८ तासांत ८७७ जणांना अटक
9
Tejas Fighter Jet Crashed : भारताचे लढाऊ विमान तेजस कोसळले, पायलटचा मृत्यू; दुबई एअर शो दरम्यान मोठी दुर्घटना
10
भाजपा-शिंदे गटात वाद, चंद्रशेखर बावनकुळे थेट बोलले; म्हणाले, “कारवाई करू, आमचे संस्कार...”
11
Travel : अवघ्या ३ दिवसात फिरता येईल 'हा' सुंदर देश; भारताचे १०००० होतील तब्बल ५८०००! फिरण्यासाठी बेस्ट
12
"बँक खात्यात ५ लाख आले, तरीही म्हणाला आणखी पैसे लागतील"; डॉ. आदिलच्या whatsApp चॅटमध्ये काय काय?
13
केरळ, यूपीसह अनेक राज्यात SIR ला आव्हान; सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला मागितले उत्तर...
14
मोठी बातमी! इस्रायलचे पंतप्रधान बेजामिन नेतान्याहून भारत दौऱ्यावर येणार, जुनी दोस्ती आणखी घट्ट होणार
15
Local Body ELection: दोंडाईचा नगरपालिका निवडणुकीत भाजपचा ऐतिहासिक विजय, नगराध्यक्ष आणि सर्वच २६ नगरसेवक बिनविरोध!
16
स्लीपर वंदे भारत देशभर फिरवली, ट्रायलनंतर परत पाठवली; ५ फॉल्ट समोर आले, लोकार्पण लांबणार?
17
रात्री लाईट ऑन करून झोपण्याची सवय असेल तर आताच बदला, आरोग्याचं होईल मोठं नुकसान
18
IND A vs BAN A 1st Semi Final : १२ चेंडूत ५० धावा! बांगलादेशनं भारतीय संघासमोर ठेवलं मोठं टार्गेट
19
ना थांबा, ना विश्रांती… गरुडाचा ६१०० किलोमीटर प्रवास थक्क करणारा; आशियातून आफ्रिकेत ६ दिवसांत पोहोचला
20
पाच वर्ष लपूनछपून डेटिंग, मग भरमैदानात प्रपोज... अशी फुलली स्मृती मंधाना-पलाशची Love Story
Daily Top 2Weekly Top 5

नारवेल बेनवले खारभूमी योजनेला अखेर मुहूर्त मिळाला, ५२ कोटी खर्चाची योजना

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2020 01:12 IST

Narvel Benavale Kharbhumi :

- दत्ता म्हात्रेपेण : राष्ट्रीय चक्रीवादळ आपत्ती निवारण प्रकल्पाअंतर्गत पेण तालुक्यातील ३० खारभूमी योजनांपैकी सर्वांत मोठी नारवेल बेनवले खारभूमी योजनेला अखेर मुहूर्त मिळाला आहे. अरबी समुद्राला मिळणाऱ्या काळेश्री तसेच धरमतर खाडीकिनारी असलेल्या तब्बल १३८८ हेक्टर शेतजमिनीला या योजनेतील संरक्षक बंधाऱ्याचे बळकटीकरण, मातीकामावर दोन बाजूंना दगडी पिचिंग बंधाऱ्याच्या माथ्यावर दगडमातीचा मुरुम याप्रमाणे या संरक्षक बंधाऱ्याचे १६.४० किमी लांबीचे काम सुरू झाले आहे.वासखांडीपर्यंतच्या काळेश्री बोर्झे, वढाव, दिव, वाशी या पाच ग्रामपंचायतींमधील ६ महसुली गावे १३ वाड्यांमधील शेतकरी, सामान्य नागरिकांच्या मालमत्तेचे रक्षण व शेती संरक्षणाची मोठी योजना असे या योजनेचे महत्त्व आहे. ५२ कोटी प्रशासकीय खर्चासाठी मंजुरी मिळाली असून ७५ टक्के केंद्र सरकारचा निधी तर २५ टक्के राज्य सरकारचा निधी असे या योजनेचे स्वरूप आहे. चक्रीवादळ व समुद्राला येणाऱ्या उधाण भरतीमुळे खाडीकिनारी असलेल्या शेतघरे, वाड्यावरची लोकवस्ती व नागरिकांच्या मालमत्तेचे संरक्षण व होणारे नुकसान टाळण्यासाठी ही योजना आघाडी सरकार असताना प्रस्तावित करण्यात आली. तत्कालीन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी राष्ट्रीय चक्रीवादळ आपत्ती निवारण प्रकल्पाअंतर्गत रायगड जिल्ह्यातील सात योजनांचा यात समावेश होता. त्यापैकी अलिबाग तालुक्यातील चिपली काचेली खारभूमी योजना व पेणमधील नारवेल बेनवले खारभूमी योजनेला ६४ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. २०१४ साली सत्तांतर झाले आणि भाजप-शिवसेना सरकार आले तेंव्हा खारभूमी मंत्री दिवाकर रावते यांनीही शेतकरी बांधवासांठी या योजनेचे महत्त्व जाणून प्रयत्न केले होते. २०१५-२०१६ या वर्षात पाठवलेल्या प्रस्तावाला अखेर जुलै २०२० वर्षात महाविकास आघाडी सरकारच्या काळात चालना मिळून ही योजना मार्गी लागली आहे. खारभूमी सबडिव्हिजन पेण कार्यालयाच्या कार्यकारी अभियंते दाभीरे, उप अभियंत्या सोनल गायकवाड व साहाय्यक अभियंते दादासाहेब सोनटक्के यांच्या देखरेखीखाली व क्वालिटी कंट्रोल बोर्डाच्या अधिकारी वर्गाने परीक्षण करून योजनेचे काम पूर्ण करावयाचे आहे. या योजनेचे महत्त्व म्हणजे ही योजना शेतकरी बांधवांसाठी मैलाचा दगड ठरेल. या योजनेचा जेथून प्रारंभ होतो त्या काळेश्री बंदर व विठ्ठल वाडी येथून समुद्र मार्गे जलवाहतूक सुरू करण्यासाठी या संरक्षक बंधाऱ्याचा रस्ता वाहतुकीसाठी उपयोग होईल. ८ उघाडीचे नूतनीकरण करण्यासाठी निधीची तरतूदपेणच्या नारवेल बेनवले खारभूमी योजनेसाठी ५१ कोटी ७६ लाख २२ हजार ४१० रुपयांची मंजुरी मिळाली आहे. यामध्ये संरक्षक बंधाऱ्याची उंची ५.६२ मीटर तर, रुंदी ३ मीटर आहे. माथ्यावर दगडी मुरुमाचा थर, मातीच्या बांधाला दोन्ही बाजूंना दगडांची भक्कम पिचिंग असे चार चाकी वाहन जाईल याप्रमाणे बांधकामांचे स्वरूप राहणार आहे. विकास निधीतून ८ उघाडीचे नूतनीकरण करण्यासाठी ७ कोटी ४७ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. योजनेतील मालवाहतूक करण्यासाठी अप्रोच रोड जोडण्यासाठी ८ लाख ४७ हजार रुपयांची विशेष तरतूद करण्यात आली आहे. ३० जुलै २०२० रोजी या योजनेचा कार्यारंभ आदेश देण्यात येऊन दीड वर्षात योजनेचे काम पूर्ण करण्यासाठी या कामाचा ठेका घेतलेल्या ठेकेदार कंपनीला काम मे, २०२२ पर्यंत पूर्ण करावयाचे आहे.

टॅग्स :Raigadरायगड