शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

विमानतळाच्या नामकरणासाठी डिसेंबर २४ पर्यंत वाट पाहावी - रामशेठ ठाकूर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2024 16:43 IST

या कार्यक्रमाप्रसंगी माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

मधूकर ठाकूर 

उरण : नवीमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांच्या नामकरणासाठी प्रकल्पग्रस्तांनी  डिसेंबर २०२४ पर्यंत वाट पाहाण्याचे आवाहन करतानाच १९८४ साली दिबांच्या नेतृत्वाखाली झालेल्या ऐतिहासिक शेतकरी लढ्यातील आंदोलनात आंदोलनकर्ते मोठ्या संख्येने चणे फुटाणे, लाह्या खाऊन सहभागी झाले होते. माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी दिबांच्या आठवणींना उजाळा देताना उपस्थितांना ही माहिती करून दिली.

नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्थेच्या वतीने दिबांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आयोजित केलेल्या लोकनेते दि. बा.पाटील चळवळ स्पर्धेच्या द्वितीय चरणाचा समारोप शनिवारी (१३) जासई येथील मंगल कार्यालय सभागृहात पार पडला. या कार्यक्रमाप्रसंगी माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. प्रकल्पग्रस्ता़च्या न्याय्य हक्कांसाठी दिबांनी केलेला त्याग, तरुण पिढीला दिबांच्या कामांची माहिती करून देण्याचे अवघड कामही आता सर्वांना करावे लागणार आहे.शिवडी-न्हावा सेतू बाधीत पारंपरिक मच्छीमारांना आर्थिक नुकसान भरपाई मिळाली पाहिजे.यासाठी प्रयत्न सुरु असल्याचेही रामशेठ ठाकूर यांनी सांगितले.

यावेळी नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या लोकनेते दि. बा. पाटील चळवळ स्पर्धेच्या द्वितीय चरणाचा समारोपही करण्यात आला.स्पर्धेत सहभागी होऊन पारितोषिके मिळविणाऱ्या यशस्वी स्पर्धकांचे अभिनंदन करतानारामशेठ ठाकूर यांच्या हस्ते त्यांचा यथोचित सत्कारही रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी कामगार नेते भुषण पाटील यांनीही दिबांच्या आठवणींना उजाळा देताना नवीमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव देण्यासाठी आग्रही भूमिका मांडली. नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष दशरथ भगत यांनी प्रास्ताविकेतुन नवीमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले.यावेळी त्यांनी दिबांनी प्रकल्पग्रस्तांसाठी केलेल्या विविध कामे आणि संघर्षांची माहिती उपस्थितांना करून दिली.   या कार्यक्रमाप्रसंगी आमदार प्रशांत ठाकूर,अतुल पाटील,कामगार नेते महेंद्र घरत, भुषण पाटील,सुरेश पाटील,जासई सरपंच संतोष पाटील, उपसरपंच माई पाटील,नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष दशरथ  भगत,अन्य पदाधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.